शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

ही संचारबंदी की टाळेबंदी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:35 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून सायंकाळी सात वाजेनंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याची पूर्वकल्पनाही ...

उस्मानाबाद : जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून सायंकाळी सात वाजेनंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याची पूर्वकल्पनाही दोन दिवस आधीच देण्यात आली. याअनुषंगाने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बरोबर सात वाजता बंद केली. मात्र, रस्त्यावर नागरिकांचा बिनधास्त वावर सुरूच असल्याचे सायंकाळी ७.३० ते ८ वाजेदरम्यान शहराच्या प्रमुख भागात दिसून आले. त्यामुळे ही नक्की संचारबंदी आहे की टाळेबंदी, असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सोमवारपासून जिल्ह्यात सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याची कल्पना जिल्हा प्रशासनाने दोन दिवस आधीच दिली होती. या निर्देशानुसार सोमवारी सायंकाळी लोकमत चमूने एकाच वेळी शहराच्या विविध भागात अर्धा तास पाहणी केली. सायंकाळी ७.३० ते ८ वाजेदरम्यान ही पाहणी केली असता रस्त्यावरील वर्दळ नेहमीप्रमाणेच दिसून आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, सेंट्रल बिल्डिंग, डीआयसी रोड, मां जिजाऊ चौक, बार्शी रोड, काळा मारुती चौक, नेहरू चौक, आदी भागात फेरफटका मारल्यानंतर मेडिकल, हॉस्पिटल्स वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद झालेली दिसून आली. मात्र, रस्त्यावरून धावणारी वाहने, गप्पा मारत थांबलेले नागरिक, क्रीडा संकुलातून सात वाजता बाहेर पडलेली गर्दी हेच चित्र दिसून आले.

पथक थांबले तरीही वर्दळ...

छत्रपती शिवाजी महाराज चौकात ७.३५ वाजता पोहोचल्यानंतर येथे पोलीस तसेच काही कर्मचाऱ्यांचे एक पथक एका बाजूने रस्त्यावर थांबलेले दिसून आले. ते वाहनधारकांना लवकर घरी जाण्याच्या सूचना करीत असल्याचेही पाहायला मिळाले. मात्र, इतर बाजूने गर्दीला आवरण्यासाठी कोणीही नव्हते. दुसऱ्या बाजूला काही तरुण बिनधास्त थांबलेले दिसले. शिवाय, वाहनांची वर्दळ नेहमीप्रमाणेच दिसून आली.

अडवायलाच कोणी नाही...

साडेसात वाजण्याच्याच वेळेला सेंट्रल बिल्डिंग परिसरातही प्रचंड गर्दी दिसली. येथे तर वाहनधारक तसेच पादचाऱ्यांनाही हटकायला कोणी दिसून आले नाही. ऐन चौकालगतच काही नागरिक गप्पा मारत थांबल्याचे दिसले. त्यापैकी बहुतांशजणांकडे मास्कही नव्हता. डीआयसी रोडकडे वळल्यानंतर काही दुकाने उघडीच दिसून आली, तर भाजीपाल्याच्या एका दुकानावर चांगलीच गर्दी पाहायला मिळाली.