शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

‘स्थायी’मध्ये इतिवृत्त, ओपीडीच्या शुल्कावरून विराेधक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:38 IST

उस्मानाबाद - जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत विराेधी बाकावरील सदस्यांनी पुन्हा सताधाऱ्यांना आराेग्य केंद्रातील ओपीडीचे शुल्क तसेच मागील बैठकांच्या ...

उस्मानाबाद - जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत विराेधी बाकावरील सदस्यांनी पुन्हा सताधाऱ्यांना आराेग्य केंद्रातील ओपीडीचे शुल्क तसेच मागील बैठकांच्या इतिवृत्तावरून काेंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. जवळपास तासभर चर्चा झाल्यानंतर संबंधित सदस्यांचा विराेध नाेंदविण्यात आला.

जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या बैठकीला सुरुवात हाेताच काँग्रेसचे सदस्य बाबुराव चव्हाण यांनी मागील बैठकांच्या इतिवृत्ताचा मुद्दा उपस्थित केला. परिपूर्ण नसलेल्या इतिवृत्तास मंजुरी द्यायची कशी, असा सवाल केला. त्यांना राष्ट्रवादीचे सदस्य ज्ञानेश्वर गीते यांची साथ लाभली. सत्ताधाऱ्यांनी मूळ इतिवृत्त मंजुरीसाठी ठेवणे गरजेचे असताना, झेराॅक्स का दिल्या जातात, असा प्रश्न केला. ही चर्चा बराचकाळ चालल्यानंतर विराेधी संबंधित सदस्यांचा विराेध नाेंदवून घेत पुढील विषय चर्चेला घेतले. यानंतर आराेग्य केंद्रांच्या ओपीडी शुल्काचा मुद्दा चव्हाण यांनी मांडला. दीड वर्षापासून मी हा मुद्दा उपस्थित करीत आहे; परंतु सत्ताधारी मंडळी गंभीर नसल्याने आजवर माहिती कळत नाही. मग अर्थसंकल्पातील आकडे येतात काेठून, असा सवाल करीत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र साेडले. त्यावर आठ ते दहा दिवसांत माहिती देण्याचे आदेश अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या वतीने तुळजापूर येथे विश्रामगृह उभारण्यात आले. त्यास १० वर्षांचा कालावधी लाेटला;परंतु आजवर ते भाडेतत्त्वावर दिलेले नाही. काेट्यवधींची इमारत धूळखात पडून आहे. याबाबत सत्ताधारी निर्णय घेणार कधी? असा प्रश्नही चव्हाण यांनी केला. यावेळी अन्य सदस्यांनी विकासकामांच्या अनुषंगाने मुद्दे मांडले.

चाैकट...

अधिकाऱ्यांना धरले धारेवर

जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची बैठकही बुधवारीच झाली. या बैठकीत जलसंधारणाच्या कामास हाेत असलेल्या विलंबावरून सर्वपक्षीय सदस्य आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. बहुतांश सदस्यांनी अधिकाऱ्यांना अक्षरश: धारेवर धरले. त्यावर मंजूर झालेली कामे वेळेत पूर्ण केली जातील, अशी ग्वाही प्रशासनाकडून दिली.