शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:38 IST

लोहारा : चालू हंगामात पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना एसडीआरएफ व एनडीआरएफअंतर्गत मदत करावी, अशी मागणी रायुकाँचे माजी जिल्हा ...

लोहारा : चालू हंगामात पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना एसडीआरएफ व एनडीआरएफअंतर्गत मदत करावी, अशी मागणी रायुकाँचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल जगताप यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात केली आहे.

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा भरूनही जिल्ह्यातील अगदी नगण्य शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे. परिणामी, चालू हंगामात तीस टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याकडे पाठ फिरविली. गेल्या वर्षी उस्मानाबाद जिल्ह्यातील ९ लाख ४८ हजार ९९० अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. तसेच त्यापोटी शेतकरी व शासनाने पीक विमा हप्ता म्हणून ६३९ कोटी रुपये जमा केले होते. मात्र, यावर्षी केवळ ६ लाख ६७ हजार २८७ अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असून, त्यापोटी शेतकरी व शासनाकडून ५८१ कोटी रुपये विमा कंपनीकडे जमा होणार आहेत. यांचा अर्थ गेल्या वर्षीपेक्षा दोन लाख ८१ हजार ७०३ शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही.

दरम्यान, यावर्षी पावसाने सतत २३ दिवसांचा खंड दिल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील तरतुदीनुसार २५ टक्के अग्रीम देण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी ३० ऑगस्ट रोजी काढलेली आहे; परंतु त्याचा फायदा केवळ पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास तीन लाख शेतकरी नुकसान होऊनही मदतीपासून वंचित राहणार आहेत. एसडीआरएफ व एनडीआरएफ अंतर्गत पूर दुष्काळ अतिवृष्टी चक्रीवादळे यापासून होणाऱ्या नुकसानीसाठी मदत करता येते. यावर्षी पावसाच्या खंडामुळे उत्पादनात घट झाली आहे, तसे महसूल व कृषीचे पंचनामेदेखील आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत देण्यास काहीही अडचण येणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.