शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सोयाबीन काढणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST

बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर परिसरातील एकुरगा, कडदोरा, समुद्राळ, रामपूर, जकेकूर, येळी, कलदेव निंबाळा, काळनिंबाळा आदी भागात ऐन सोयाबीनच्या ...

बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर परिसरातील एकुरगा, कडदोरा, समुद्राळ, रामपूर, जकेकूर, येळी, कलदेव निंबाळा, काळनिंबाळा आदी भागात ऐन सोयाबीनच्या काढणीतच मागील चार-पाच दिवसांत मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. यामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही सोयाबीन पाण्यात जाईल या भीतीने शेतकरी सध्या सोयाबीन काढणीसाठी धावपळ करताना दिसत आहेत.

यंदा कधी नव्हे तो सोयाबीनचा ११ हजारांच्या वर गेला असून, सुरुवातीच्या पेरणीनंतर मुबलक पाऊस झाल्याने पिकेही जोमात होती. दर वाढल्याने शेतकऱ्यांनी अडचणीतूनही आर्थिक जुळवाजुळव करीत सोयाबीन पिकाला दोन-तीन वेळी कीटकनाशक फवारणी, अंतर्गत मशागती, खुरपणी करून भरपूर मेहनत घेतली. यानंतर फळधारणेच्या भरात पावसाने उघडीप दिल्याने, रोग पडल्याने फळधारणेवर परिणाम होऊन उत्पन्नातही घट येत आहे. त्यातच आता दरही पाच हजारावर आला. सद्य:स्थितीत सोयाबीन काढणीसाठी मजुरांना एकरी ४ हजार २०० रुपये ते ४ हजार ५०० रुपये द्यावे लागत आहेत. त्या तुलनेत उतारा मात्र एकरी आठ ते नऊ क्विंटल मिळत असून, दरातही मोठी घसरण झाल्याने तूर्तास तरी शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.