शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

कोरोना काळात स्वॅब संकलन ते स्टाफ नर्सची पार पाडली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:30 IST

कळंब : कोरोना वाॅर्डात दाखल झालेल्या त्या चार वर्षाच्या चिमुरडीला एका अधिपरिचारिकेने मायेचा आधार दिला. त्यांच्या सेवाभावामुळे उभयतांमध्ये ...

कळंब : कोरोना वाॅर्डात दाखल झालेल्या त्या चार वर्षाच्या चिमुरडीला एका अधिपरिचारिकेने मायेचा आधार दिला. त्यांच्या सेवाभावामुळे उभयतांमध्ये ऋणानुबंध निर्माण झाला. लळा लागला, डिस्चार्ज होताना त्या चिमुरडीचे डोळे पाणावले. यावेळी त्या निरागस चिमुरडीच्या तोंडातून बाहेर पडले ते शब्द होते 'दीदी...’. कोरोनाच्या भयावह लाटेत धिराने काम करणाऱ्या कळंब येथील महादेवी गोरे या कर्तव्यदक्ष ‘सिस्टर’ हा अनुभव सांगतानाही गहिवरल्या होत्या.

कोरोनाचा प्रकोप गल्ली ते दिल्ली वाढला होता. याकाळी नुसतं कोरोनाचं नाव काढलं तरी घाम फुटत होता. या अपरिचित महामारीने सारं जग स्तब्ध केले होते. सर्व यंत्रणा हतबल झाल्या होत्या. मनुष्यजातीचं मनोबल खचलं होतं. या काळात आरोग्य यंत्रणेतील काही व्यक्ती मात्र 'देवदूत' म्हणून रुग्णसेवा करत होत्या. या कोरोना योध्द्यांपैकीच कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात अधिपरिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या महादेवी अशोक गोरे या एक आहेत. नर्सिंग आणि बेंगलोर येथे ‘मानसशास्त्रीय परिचारिका’ असे विशेष शिक्षण घेत अठरा वर्षांपूर्वी आरोग्य सेवेत दाखल झालेल्या गोरे यांच्यासाठी हा काळ ‘सत्त्वपरीक्षा’ घेणारा असाच होता. नव्या जागतिक महामारीच्या संकटात त्यांनी स्वॅब संकलन ते कोरोना वाॅर्डातील ‘स्टाफ नर्स’ अशी जोखीमभरी कामे पार पाडली. आजही त्या यात अव्याहत कार्यरत आहेत.

आपल्या सेवेप्रती आदरभाव, कर्तव्यनिष्ठा असलेल्या महादेवी यांनी प्रत्यक्ष कोरोना वाॅर्डात पीपीई कीट घालत रुग्णांवर उपचार तर केले, शिवाय ‘घाबरू नका’ हा महत्त्वाचा धीर देत अनेक रुग्णांना आधार दिला. स्वत:ची काळजी घेत रुग्णांच्या जवळ गेल्या, आस्थेनं चौकशी करत सेवा दिली. हा संसर्गजन्य आजार आहे, तो आपल्यापासून दुसऱ्यांना होऊ नये यासाठीच ‘डिस्टन्स’ ठेवला जातो, याची रुग्णांना जाणीव करून देत त्यांच्या मनातील दुरावा दूर केला. यातून त्यांना अनेक रुग्णांनी नावानिशी ओळख ठेवली आहे. ती चार वर्षाची चिमुरडी आजही गोरे यांना फोन करते व दीदी कशी आहेस, असे विचारते. यातूनच गोेरे यांच्या सेवाभावाची प्रचिती येते.

चौकट....

जिव्हाळा आनंद देणारा...

चार वर्षांच्या चिमुरडीनं बहीण मानलं. तसेच सुरुवातीस दाखल झालेल्या एका दांपत्याने तर अक्षरशः देवदुताची उपमा देत लोटांगण घेतलं. योग्य निर्णय घेत अवघ्या दहा मिनिटात स्वॅब ते रेफर असा निर्णय घेतल्यानं जीवदान मिळालेल्या त्या वयस्कांचं ‘नेमकं मला काय झालंय’ हे निरागसतेनं विचारणं अन् यावेळी मला माझ्या अश्रूंना आवरता न येणं, असे काही प्रसंग माझ्या कोरोना ड्युटी काळातील अविस्मरणीय असे आहेत.

मी धीर दिला, त्यांनी आधार दिला...

कोरोना काळात रुग्णांना धीर देणे गरजेचे असते. मी आमच्या स्टाफसह यावर भर दिला. अगदी रक्षाबंधनाचा ‘धागा’ ते दिवाळीचा ‘गोडवा’ याची उणीव कोरोना वाॅर्डात जाणवू दिली नाही. याच काळात या सेवायज्ञात सहभागी असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना समाजाचा आधार मिळत नव्हता. यावेळी मी कळंबच्या संभाजीनगरात एकट्या मुलासह राहत होते. यावेळी स्थानिकांनी मला, मुलाला मोठा आधार दिला. तिरस्कार तर दूर, उलट मी घरी नसल्यावर मुलाला डबा, दुधाचा आग्रह झाला. ‘काही अडचण आली, तर फोन करा’ म्हणून नंबर दिले गेले. यामुळे माझे मनोबल अधिकच वाढले.