शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

तेरणेच्या आखाड्यात आता धाराशिवही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST

उस्मानाबाद : तेरणा सहकारी साखर कारखाना दीर्घमुदतीने भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. विहित मुदतीत केवळ तीनच संस्थांनी अर्ज ...

उस्मानाबाद : तेरणा सहकारी साखर कारखाना दीर्घमुदतीने भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. विहित मुदतीत केवळ तीनच संस्थांनी अर्ज खरेदी केल्यामुळे आता आणखी मुदतवाढ देण्यात आली असून, २४ सप्टेंबरपर्यंत संस्थांना अर्ज घेता येणार आहेत. यादरम्यान, आता चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यानेही तेरणा घेण्याची तयारी सुरू केली असून, त्यासाठी त्यांनी अर्जही नेला आहे.

मराठवाड्यातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून नोंद असलेला तेरणा कारखाना हा केवळ मोठी ऊस गाळपाची क्षमता राखून ठेवणारा नसून, उस्मानाबादच्या राजकारणाचा लगामही हाती ठेवणारा आहे. त्यामुळेच कारखाना बंद असला तरी प्रत्येक निवडणुकीत तो ज्वालामुखीप्रमाणे बाहेर येतोच. तब्बल ३४ हजारांवर सभासद असल्याने स्वाभाविकच या कारखान्याची सूत्रे आपल्याकडे असावीत, असे राजकारण्यांना वाटते. दरम्यान, कर्जाच्या खाईत खोलवर रुतलेल्या या कारखान्याचे धुराडे पेटवून आपले कर्ज फेडून घेण्याच्या अनुषंगाने मोठ मोठे हर्डल्स पार करीत जिल्हा बँकेने अखेर निविदा प्रक्रियेपर्यंत धाव घेतलीच. हा कारखाना दीर्घ मुदतीने भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पहिल्यांदा १४ सप्टेंबरपर्यंत अर्ज विक्री व १५ सप्टेंबर दिवशी निविदा भरण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, या कालावधीत चारच संस्थांनी अर्ज नेले होते. आणखी स्पर्धा वाढावी या हेतूने निविदेत काही बदल करून अर्ज विक्री व स्वीकृतीस मुदतवाढ देण्यात आली आहे. आता इच्छुक संस्थांना २४ सप्टेंबरपर्यंत अर्ज घेता येणार आहे. या वाढीव मुदतीत आणखी कोण इच्छा प्रदर्शित करते हे पाहणे औत्सुक्याचे आहे. शिवाय, हा कारखाना कोणाच्या पदरात जातो, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

चार संस्थांनी नेले अर्ज...

निविदा प्रक्रिया सुरू झाल्यापासून आजतागायत केवळ चार संस्थांनी अर्ज नेले आहेत. यामध्ये मेयर कमोडिटीज, ट्वेंटी वन शुगर्स, डीडीएन एसएफए व चोराखळी येथील धाराशिव कारखान्याने अर्ज नेले आहेत. आता उर्वरित आठवडाभरात आणखी किती जण अर्ज नेतात याकडे सभासदांचे लक्ष असणार आहे. ५ ऑक्टोबरला प्राप्त निविदा उघडल्या जाणार आहेत. त्यामुळे ५ तारखेकडेही नजरा लागून आहेत.

हंगाम लवकर सुरू होणार..?

तेरणा कारखाना याच वर्षीच्या हंगामात सुरू करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू होते. पीएफ कार्यालयाचा मोठा अडथळा दूर झाल्यानंतर लागलीच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, मुदतवाढ मिळाल्याने आणखी १५ दिवस लांबणीवर गेले आहेत. निविदा उघडल्यानंतर ज्या कोण्या संस्थेच्या ताब्यात कारखाना जाईल, त्यांच्याकडून दुरुस्तीची कामे व हंगामाचे नियोजन करण्यास वेळ लागणारच आहे.