शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

अर्धवट काम सोडून कंत्राटदार गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:21 IST

कळंब : लातूर-कळंब या हायब्रिड ॲन्युटीअंतर्गत करण्यात येत असलेल्या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत सोडून कंत्राटदाराची यंत्रणा गायब झाली आहे. ...

कळंब : लातूर-कळंब या हायब्रिड ॲन्युटीअंतर्गत करण्यात येत असलेल्या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत सोडून कंत्राटदाराची यंत्रणा गायब झाली आहे. यामुळे मागच्या काही दिवसांपासून अनेक दुचाकीस्वारांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. दररोज एवढ्या संतापजनक स्थितीला तोंड द्यावे लागत असतानाही बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प असल्याचे दिसून येत आहे.

लातूर-कळंब या राज्यमार्गाची मागच्या तीन वर्षांपूर्वी दर्जोन्नती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याच रस्त्यावर तालुक्यातील सर्वात मोठे गाव शिराढोण येते. याशिवाय राज्यातील प्रमुख असा ‘नॅचरल उद्योग’ समूह याच रस्त्यावर येतो. लगतच्या मुरुड, अंबेजोगाई व लातूर यांना ‘कनेक्टिव्हिटी’ देण्यास हा रस्ता मोठा मदतगार ठरतो. यानुसार, बांधकाम विभागाच्या हायब्रिड ॲन्युटी धोरणांतर्गत या रस्त्याची सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली. यासाठी जवळपास शंभर कोटी रुपयांचा ठेका एका औरंगाबादस्थित कंपनीला देण्यात आला. यानंतर, डिकसळ ते रांजणी इथपर्यंतच्या कळंब तालुका हद्दीतील कामास जोरात सुरुवातही झाली. मात्र, कंपनीच्या रखडपट्टीमुळे अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे मागच्या दोन वर्षांपासून रस्त्याचा होत असलेला ‘विकास’ केवळ बांधकाम खाते, संबंधित ठेकेदार व या सर्वांवर परजीवी वनस्पतीप्रमाणे पोसली जात असलेल्या त्रयस्थ एजन्सीच्या बेफिकीरपणामुळे जीवावर उठला आहे. जवळपास दहा किलोमीटर लांबीचे काम अर्धवट अवस्थेत आहे. काही ठिकाणी एका बाजूचे काम केले आहे, तर काही ठिकाणी दोन्ही बाजू खोदून अर्धवट अवस्थेत काम ठेवले आहे. यामुळे पावसाने हा संपूर्ण भाग चिखलमय झाला आहे. यात वाहनांना अपघात होत आहे, दुचाकीस्वार घसरून जखमी होत आहेत.

चौकट...

काम अर्धवट : गुत्तेदाराची यंत्रणा गायब...

लातूर-कळंब या राज्यमार्गाचे हायब्रिड ॲन्युटीअंतर्गत सुधारणा होत असल्याने, या भागातील नागरिक खूश झाले होते. मात्र, मुदत संपली, तरी काम पूर्ण झालेले नाही. यातच लोहटा (पूर्व) ते डिकसळ या दरम्यानचे काम मागच्या दीड महिन्यापासून बंद आहे. या ठिकाणचे पोटगुत्तेदार गायब आहेत. खोदकाम, भराई व दबाई ठप्प आहे. जवळपास यंत्रणा कोठेच दिसून येत नाही. यामुळे या रस्त्याचा नित्य संबंध येणाऱ्या शिराढोण, लोहटा पूर्व, लोहटा पश्चिम, कोथळा, रांजणी, नायगाव, पाडोळी, घारगाव, हिंगणगाव, आवाड शिरपुरा, ताडगाव आदी गावांतील वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

बांधकाम विभागाचे ‘नरो वा कुंजरो’

दरम्यान, कामाचा दर्जा, केलेली खोदाई, त्यात भरलेला मुरुम, त्याची केलेली दबाई, त्यावर केलेले डांबरीकरण हे ‘क्वॉलिटी’चे मुद्दे तर दूरच. मात्र, साधी कामाची गती व स्थितीही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे ‘अपडेट’ नाही. या संदर्भात काम किती रकमेचे आहे, कालमर्यादा किती, का बंद आहे, याची विचारणा मागच्या पंधरा दिवसांपासून उपविभागीय अभियंता वायकर यांना केली होती. त्यांनी एका कनिष्ठ अभियंत्याकडे बोट दाखविले. त्या अभियंत्यांनी मलाही माहीत नाही, असे सांगितले. आपल्या ताब्यातील राज्यमार्गाचा विकास कसा व कोण करतोय, याची माहिती खुद्द बांधकाम विभागाला नसेल, तर त्या कामावर देखरेख करणाऱ्या त्रयस्थ एजन्सीचे काम किती चोख असेल, याचा विचार न केलेला बरा असे म्हणण्याची वेळ आली आहे.

लोक पडत आहेत, तरी लोकप्रतिनिधी गप्प

या भागातील चार जिल्हा परिषद सदस्य, आठ पं.स. सदस्य, विसेक गावचे सरपंच या रस्त्याशी संबंधित आहेत. या स्थितीत लोक पडत आहेत, त्यांची वाहने घसरगुंडीने अपघाताला तोंड देत आहेत, अनेकांना जखमी व्हावे लागले आहे, तरी उपरोक्त लोकप्रतिनिधी गप्प का आहेत, असा संतप्त सवाल केला जात आहे.

प्रतिक्रिया

चार महिन्यांपासून रस्त्याचे काम बंद आहे. रस्ता जेसीबीने खोदून ठेवला आहे. दबाई व्यवस्थित केली नाही. आम्हाला रोज कळंबला जाताना-येताना त्रास होत आहे. गुत्तेदाराला बोललो, तर ते पैसे नसल्याने काम बंद असल्याचे सांगतात. पावसामध्ये दुचाकीवर ये-जा करणारे अनेक जण घसरून पडत आहेत. त्यामुळे आम्ही त्रस्त आहोत. गुत्तेदाराने एक बाजू तरी पूर्ण करणे गरजेचे आहे. लवकरात लवकर जर काम पूर्ण नाही केले, तर आम्ही करंजकल्ला गावातील गावकरी रस्ता रोको आंदोलन करून संबंधित गुतेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करू.

- विशाल पवार, सरपंच, करंजकल्ला