चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानात अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात यजमान चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने २०४ धावांचा यशस्वी पाठलाग करुन दाखवला. हा सामना ५ विकेट्स राखून जिंकत CSK च्या संघाने प्लेऑफ्सच्या शर्यतीतील आपली आस कायम ठेवली आहे. दुसरीकडे या पराभवासह लखनौ सुपर जाएंट्सचा यंदाच्या हंगामातील प्रवास संपुष्टात आला आहे. लखनौच्या संघाने दिलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ससाठी १८० पेक्षा अधिक धावा करताना पराभवाचा दुष्काळ संपवण्याचे आव्हान होते. उर्विल पटेल याच्या विक्रमी अर्धशतकासह CSK अखेर हा डाव साध्य केला आहे. २०१९ नंतर पहिल्यांदाच चेन्नईच्या संघाने १८० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करुन दाखवत गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
LSG कडून जॉस इंग्लिसचा धमाका
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जॉस इंग्लिस याने ३३ चेंडूत १० चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने केलेल्या ८५ धावा आणि शाहबाझ अहमदने २५ चेंडूत केलेल्या ३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ४३ धावांच्या जोरावर लखनौ सुपर जाएंट्सच्या समघाने निर्धारित २० षटकात ८ बाद २०३ धावा केल्या होत्या. चेन्नईकडून जेमी ओवर्टन याने सर्वाधिक ३ तर अंशुल कंबोज याने २ आणि नूर अहमद याने एक विकेट आपल्या खात्यात जमा केली.
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
CSK समोर होतं मोठं आव्हान
या धावसंख्येचा पाठलाग करणं चेन्नई सुपर किंग्ससाठी मोठं आव्हानच होते. कारण २०१९ पासून CSK चा संघ १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना अडखळताना दिसला होता. संजू सॅमसन १४ चंडूत २८ धावा करून परतल्यावर पुन्हा त्यांच्यावर तिच वेळ येते का? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण उर्विल पटेल याने विक्रमी अर्धशतकी खेळीसह लखनौच्या संघाला बॅकफूटवर ढकणारी खेळी साकारली. त्याने २३ चेंडूत २ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या. याशिवाय ऋुतराज गायकवाडनं २८ चेंडूत ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
एका पाठोपाठ झेल सोडले अन् LSG वर आली स्पर्धेतून आउट होण्याची वेळ
दोघांनी आपली भूमिका बजावल्यावर अखेरच्या षटकात इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात मैदानात उतरलेल्या प्रशांत वीर याने शिवम दुबेच्या साथीनं ४ चेंडू ५ विकेट्स राखून संघाला विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकात लखनौच्या गोलंदाजांनी सामन्यात ट्विस्ट आणले. पण आवेश खानच्या गोलंदाजीवर दिग्वेश राठी आणि निकोलस पूरन यांनी मोक्याच्या क्षणी प्रशांत वीरचे दोन झेल सोडले. परिणामी सामन्यात येण्याची आणि स्पर्धेत टिकून राहण्याची जी शेवटची आस होती ती संपली. या पराभवासह लखनौ हा यंदाच्या हंगामातून प्लेऑफ्सच्या शर्यतीतू नबाद होणारा पहिला संघ ठरला आहे.