शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

जिल्हा परिषद पेन्शनरांच्या हाती मात्र कोहळाच!

By admin | Updated: July 8, 2014 01:05 IST

स.सो. खंडाळकर , औरंगाबाद शासकीय पेन्शनरांना सरकारने दिला लोण्याचा गोळा. मात्र, जिल्हा परिषदेच्या पेन्शनरांच्या हाती मात्र कोहळाच, अशी काहीशी अवस्था सध्या बघावयास मिळत आहे.

स.सो. खंडाळकर , औरंगाबादशासकीय पेन्शनरांना सरकारने दिला लोण्याचा गोळा. मात्र, जिल्हा परिषदेच्या पेन्शनरांच्या हाती मात्र कोहळाच, अशी काहीशी अवस्था सध्या बघावयास मिळत आहे. राज्यातील सहा लाखांहून अधिक पेन्शनधारकांना आता यापुढे दर महिन्याच्या एक तारखेलाच पेन्शनची रक्कम दिली जाणार आहे व ही रक्कम जमा झाल्याचा मोबाईल एसएमएससुद्धा संबंधितांना मिळणार आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या पेन्शनधारकांचे हालच वाईट आहेत. त्यांना पेन्शनची रक्कम कधीही एक तारखेला मिळालेली नाही. यासंदर्भात शासनाने वेळोवेळी आदेशही काढले आहेत; पण उपयोग काही नाही. जिल्हा परिषदेच्या पेन्शनर्स असोसिएशनने जि.प. स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. तरीही एक तारखेला पेन्शनची रक्कम मिळण्याची मागणी मान्य होत नाही. जि.प. पेन्शनधारकांची ही अत्यंत जिव्हाळ्याची व निकडीची मागणी आहे. आता यासंदर्भात आणखी प्रयत्न करण्याचे आम्ही ठरवले असून, विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करून त्यांचे या निष्काळजीपणाकडे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे जि.प. पेन्शनर्स असोसिएशनचे माधव वाघमारे, सुधाकरनाना चव्हाण, शंकरराव जोशी, पी.डी. सोनवणे, बी.के. शिंदे, वाय.पी. पवार, वसंतराव कोरडे, पी.एन. जोशी, एम.ए. वहीद, एस.एस. दाभाडे, काशीनाथ पेरकर, श्रीमती गडप्पा, श्रीमती वडजीकर आदींनी कळविले आहे. या सर्वांनी ठामपणे सांगितले की, आम्ही सारे जण जि.प. पेन्शनधारक असून आम्हाला कधीही एक तारखेला पेन्शन मिळालेली नाही. जिल्हा परिषदेने तीन महिन्यांतून एकदा पेन्शन अदालत भरवून पेन्शनधारकांचे जटिल होत चाललेले प्रश्न सोडवावेत, अशी मागणीही मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांना भेटून करण्यात आली आहे. शासकीय व जि.प. पेन्शनरांना सरकारने १० टक्के महागाई भत्ता मे २०१४ पासून दिलेला आहे; परंतु जानेवारी २०१४ ते एप्रिल २०१४ पर्यंतची थकबाकी अद्यापही पेन्शनरांना मिळालेली नाही. सध्या महागाई कमालीची वाढली आहे. त्यातच शैक्षणिक सत्र सुरू झालेले आहे. नातवंडांना शालेय पुस्तके, वह्या घेऊन देणे गरजेचे आहे. तगडी फी भरणेही अशक्य होत आहे. या पार्श्वभूमीवर थकित महागाई भत्त्याची रक्कम तातडीने उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी माधवराव वाघमारे व सु.गो. चव्हाण यांनी केली आहे.