शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

जिल्हा परिषद पुन्हा युतीच्या ताब्यात

By admin | Updated: September 22, 2014 00:54 IST

जालना : बहुमताच्या जोरावर जिल्हा परिषद शिवसेना-भाजपा युतीच्या ताब्यात राहिली असून अध्यक्षपदी भाजपाचे तुकाराम जाधव तर उपाध्यक्षपदी अनिरुद्ध खोतकर हे ३४ विरुद्ध १५ मतांच्या फरकाने

जालना : बहुमताच्या जोरावर जिल्हा परिषद शिवसेना-भाजपा युतीच्या ताब्यात राहिली असून अध्यक्षपदी भाजपाचे तुकाराम जाधव तर उपाध्यक्षपदी अनिरुद्ध खोतकर हे ३४ विरुद्ध १५ मतांच्या फरकाने विजयी झाले. या दोन्ही पदांसाठीचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुक्रमे अ‍ॅड. पंकज बोराडे व अ‍ॅड. संजय काळबांडे यांना प्रत्येकी १५ मते मिळाली. जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी बी.एल. गिरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत उपस्थित सदस्यांचे हात उंचावून मतदान घेऊन ही निवड प्रक्रिया पार पडली. सकाळी ११ वाजता सदस्यांना अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी अर्ज देण्यास सुरूवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. २ वाजता विशेष सभेला प्रारंभ झाला. त्यात प्रारंभी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष पदासाठी सेनेकडून अनिरुद्ध लक्ष्मणराव खोतकर, भाजपाकडून तुकाराम गोविंदा जाधव तर राष्ट्रवादीकडून अ‍ॅड. पंकज बोराडे यांनी अर्ज दाखल केले. उपाध्यक्षपदासाठी अनिरुद्ध खोतकर व राष्ट्रवादीचे अ‍ॅड. संजय संपतराव काळबांडे यांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी अध्यक्षपदासाठीचा अर्ज खोतकर यांनी मागे घेतला. त्यामुळे दोन्ही पदांसाठी सरळ लढत झाली. शिवसेना-भाजपा युतीचे बहूमत असल्याने या पक्षाचे प्रत्येकी १५ असे एकूण ३० व त्यांना पाठिंबा असलेले चार अपक्ष असे ३४ संख्येचे बलाबल होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ सदस्य असले तरी विमल खैरे या सदस्य आजारी असल्याने हजर नव्हत्या. राकाँच्या आघाडीतील काँग्रेसचे एल.के. दळवी, जिजाबाई गवळी, नरसिंग राठोड व मूळ काँग्रेसचे परंतु अपक्ष म्हणून विजयी झालेले राजेश राठोड हे चारही जण गैरहजर होते. तसेच या आघाडीला पाठिंबा दिलेले मनसेचे रवि राऊत हे देखील गैरहजर होते. त्यामुळे या निवडणुकीत राकाँ उमेदवारांना १५ मते मिळाली. मतदान प्रक्रियेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी पक्षातील सदस्यांसाठी काढलेला व्हीप पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहात वाचून दाखविला. सेना-भाजपाने मात्र व्हीप काढलेला नव्हता. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांचे प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर युतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आपला आनंद व्यक्त केला. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, शिवाजी चोथे, बबनराव लोणीकर, विष्णू पाचफुले आदी उपस्थित होते.पीठासीन अधिकाऱ्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, सोनवणे, वाघचौरे, रवि कांबळे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)