शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

सभापती पदाच्या निवडणुकीबद्दल उत्कंठता

By admin | Updated: September 29, 2014 00:38 IST

संजय कुलकर्णी , जालना जिल्हा परिषदेच्या १ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विषय समित्यांच्या निवडणुकीबद्दल ग्रामीण भागात उत्कंठता निर्माण झाली आहे. कारण जिल्हा परिषदेत भाजपा-सेनेचे बहूमत आहे.

संजय कुलकर्णी , जालनाजिल्हा परिषदेच्या १ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विषय समित्यांच्या निवडणुकीबद्दल ग्रामीण भागात उत्कंठता निर्माण झाली आहे. कारण जिल्हा परिषदेत भाजपा-सेनेचे बहूमत आहे. या बहुमताच्या जोरावरच २१ सप्टेंबर रोजी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत युतीने दोन्ही पदे मिळविली. परंतु आता युतीमध्ये ताटातूट झाल्याने जि.प.च्या निवडणुकीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.एकूण ५५ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत शिवसेना व भाजपाचे प्रत्येकी १५ सदस्य आहेत. ५ अपक्षांपैकी ४ जणांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रसचे १६ व काँग्रेसचे ३ व मनसेचा एक सदस्य आहे. पहिल्या अडीच वर्षांच्या काळात अध्यक्षपद शिवसेनेकडे तर उपाध्यक्षपद भाजपाकडे होते. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या या पदांच्या निवडणुकीसाठी भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा करून अध्यक्षपद आपल्या पक्षाच्या पदरात पाडून घेतले. त्यामुळे उपाध्यक्षपद शिवसेनेला मिळाले. या दोन्ही पक्षांनी अगोदर अंतर्गत बैठका घेऊन अध्यक्ष अथवा उपाध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित केला. त्यानंतर युतीच्या नेत्यांची बैठक होऊन त्यात ही दोन्ही पदे कुणाकडे ठेवायची हे निश्चित झाले. या सर्व बाबी समन्वयाने झाल्या.दोन्ही पक्षातील अध्यक्ष पदासाठी इच्छूक असलेल्या सदस्यांची मनधरणी करण्यात आली. त्यापैकी कुणाला सभापती पदाचे गाजरही दाखविण्यात आले. परंतु राज्यात घटस्थापनेच्या दिवशीच युती आणि त्यापाठोपाठ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचीही ताटातूट झाली. या पार्श्वभूमीवर सभापती पदासाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कारण शिवसेना व भाजपा या दोन्ही पक्षांकडून प्रत्येकी दोन अशा चार पदांसाठी काहीजण इच्छूक आहेत.आता युतीमध्ये फूट पडल्यामुळे इच्छुकांसमोर पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे एकूण संख्याबळ २० एवढेच आहे. मनसेच्या सदस्याने त्यांना पाठिंबा दिला होता. परंतु तो कायम राहणार का, हेही निश्चित नाही. युती आणि आघाडीमध्ये ताटातूट झाल्यानंतर ऐनवेळी विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देताना काही जिल्हा परिषद सदस्यांच्या नातेवाईकांनाही उमेदवारी मिळाली. मात्र सदस्य ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाच्या प्रतिस्पर्धी पक्षाकडून उमेदवारी मिळाली. तर दोन सदस्य स्वत: नशीब आजमावत आहेत. सध्या विधानसभा निवडणुकीची लगीनघाई सुरू असल्याने सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात आहेत. १ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेतील सभापती पदाची निवडणूक होत असल्याने त्याचा विपरित परिणाम विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवारावर होऊ नये, यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. ४त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीत काय होणार, यासाठी ग्रामीण भागातील जनतेमध्ये मोठी उत्कंठता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेत युती कायम राहणार का, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे १ आॅक्टोबर रोजीच्या सभापती पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.