शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

युवा शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:11 IST

पाचोड : सततच्या नापिकीमुळे कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने पैठण तालुक्यातील आंतरवाली खांडी गावातील युवा शेतकऱ्याने गुरुवारी गळफास घेऊन आयुष्य ...

पाचोड : सततच्या नापिकीमुळे कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने पैठण तालुक्यातील आंतरवाली खांडी गावातील युवा शेतकऱ्याने गुरुवारी गळफास घेऊन आयुष्य संपविले आहे. गणेश दत्तात्रय हांडे (३५, रा. आंतरवाली खांडी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचोडपासून जवळ असलेल्या आंतरवाली खांडी येथील गणेश दत्तात्रय हांडे (३५) यांना अडीच एकर शेती आहे. घरात वयोवृद्ध आई, वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. एक भाऊ आहे; पण तो कामासाठी बाहेरगावी असतो. घरचा कारभार गणेश यांच्या हाती होता. तीन वर्षांपासून शेतात काहीच पिकत नव्हते. शेतीत लावलेला खर्चदेखील निघत नसल्याने गणेश हवालदिल झाले होते. त्यात एका बँकेकडून त्यांनी शेतीवर पीककर्ज काढले होते; पण सतत दोन वर्षांपासून नापिकी व आता अतिवृष्टीमुळे शेतातील होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढतच गेला. कर्जाची परतफेड कशी करावी, वर्षभर कसे जगावे, अशी चिंता त्यांना सतावत होती. याबाबत त्यांनी सातत्याने घरच्यासमोर बोलून देखील दाखविले. गुरुवारी सकाळी साडेसात वाजता गणेश हांडे हे शेतात जातो म्हणून घराबाहेर पडले आणि शेतात गेल्यावर एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपविले. सकाळी दहा वाजेच्या सुमारास गणेश हांडे यांचे काका शेतात कामानिमित्त गेले. तेव्हा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत गणेश दिसून आले. त्यांनी त्वरित गावातील लोकांना बोलावले. गावचे सरपंच अरुण कळमकरसह गावकरी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाचोड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह पाचोड ग्रामीण रुग्णालयात हलविला. वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित जैन यांनी शवविच्छेदन केले. पाचोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.