शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

महिलांवरील गुन्ह्याच्या आलेखाने थरकाप !

By admin | Updated: April 4, 2015 00:34 IST

पंकज जैस्वाल , लातूर राज्यात शांत जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या लातूर जिल्ह्यातील गेल्या तीन-चार वर्षाच्या घटनांवर नजर टाकली असता, महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे़

पंकज जैस्वाल , लातूरराज्यात शांत जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या लातूर जिल्ह्यातील गेल्या तीन-चार वर्षाच्या घटनांवर नजर टाकली असता, महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे़ चालू वर्षातील जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात तब्बल १९६ महिलांवर अत्याचार झाले़ वर्ष २०१४ मध्ये ८९६, वर्ष २०१३ मध्ये ६२१ आणि वर्ष २०१२ मध्ये ४६८ महिलांवर अत्याचार झाले आहेत़ खून, बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी, जाच-जुलूम, आत्महत्येस प्रवृत्त करणे, मुलींना व महिलांना पळवून नेण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, याचा आलेख पाहिल्यास थरकाप होतो आहे़ विशेषत: गतवर्षी आणि गेल्या तीन महिन्यातील गुन्ह्याचे आकडे पाहिल्यास महिलांची सुरक्षा हा विषय निश्चितच सामाजिक चिंतेची बाब बनली आहे़गेल्या सव्वातीन वर्षात जिल्ह्यातील १८२ महिलांना प्राणास मुकावे लागले आहे़ तर ८० महिलांच्या खुनाचा प्रयत्न झाल्याची नोंद पोलिस दफ्तरी आहे़ प्राणास मुकलेल्या १८२ पैकी ४३ महिलांचा केवळ हुंड्यासाठी खून झाला़ १७ महिलांनी हुंड्याच्या छळास कंटाळून स्वत:चे जीवन संपविले़ तर आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे ८२ महिलांनी स्वत:चा जीव दिला आहे़ ४० जणींचा विविध कारणांसाठी खून झाला़ खुनाच्या घटनेपाठोपाठ विनयभंगाच्या व बलात्काराच्या घटनांतही लक्षणीय वाढ झालेली आहे़ गेल्या सव्वा तीन वर्षात ११९ महिलांवर बलात्कार झाले़ त्यापैकी मागच्या तीन महिन्यात ११, गतवर्षी ५५, वर्ष २०१३ मध्ये ३३ तर वर्ष २०१२ मध्ये २० महिलांवर बलात्कार झाले आहेत़ विनयभंगाच्या ३९५ घटनांपैकी गेल्या तीन महिन्यात ४३, गतवर्षी १९६, वर्ष २०१३ मध्ये ९८ तर वर्ष २०१२ मध्ये ५८ घटनांची नोंद आहे़ मुलींना व महिलांना पळवून नेण्याच्या घटनेतही वाढ आहे़ तब्बल १३५ महिला गेल्या साडे तीन वर्षात गायब झाल्या आहेत़ त्यापैकी गेल्या तीन महिन्यात १८ मुलींना पळवून नेले़ गतवर्षी ५८, वर्ष २०१३ मध्ये ३२, वर्ष २०१२ मध्ये २७ महिला व मुलींना पळवून नेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत़ गेल्या सव्वा तीन वर्षात ८८० विवाहितांचा जाच-जुलूम करुन छळ केल्याच्या तक्रारी आहेत़ महिलांसोबत बिभत्स कृत्य व अंगविक्षेप केल्याच्या ३२० तक्रारी आहेत़ महिलांचा अनैतिक व्यापार कलमांतर्गत ११, कौटुंबीक हिंसाचार कायदा २००५ अंतर्गत १, बालविवाह लातूरच्या पोलिस दलातील गृह विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ़ अश्विनी पाटील म्हणाल्या की, घटना यापूर्वीही घडत होत्या़ परंतु बदनामीच्या भितीने व कायद्याचे अज्ञान असल्यामुळे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी होते़ जनजागृती झाल्यामुळे व कायद्यात केलेल्या बदलामुळे पीडित महिला त्यांच्या अत्याचारावरील गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी पुढे येत आहेत़ पोलिसांकडून न्याय मिळेल, असा आशावाद महिलांना वाटतो आहे़ तसेच महिलांच्या घटनेतील नोंदीबाबत महिला व मुलींचे नाव गुपीत ठेवण्याचे कायद्याचे अभय असल्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत़ टीव्ही संस्कृती आणि मोबाईलचा वापर चांगला जितका तितका वाईटही आहे़ तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करायचा, हे ज्यांनी त्यांनी ठरविले पाहिजे़ तंत्रज्ञानाचा योग्य वापर हितकारक असतो़ परंतु गैरवापर महिलांसाठी धोकादायक ठरत असल्याचेही त्या म्हणाल्या़ स्वयंसिद्धा महिला मंडळाच्या अध्यक्षा अ‍ॅड़ स्मिता परचुरे म्हणाल्या, महिलांच्या खुनांच्या घटना पाहिल्यास बहुतांश खून हुंडाबळीशी निगडीत असल्याचे दिसून येते़ त्यातही महिलांच्या चारित्र्याबाबत संशयाचे भूत डोक्यात असल्यामुळे व लहानसहान कारणावरुन अनेक महिलांना प्राणास मुकावे लागले आहे़ मानपान व आर्थिक मागण्यांवरुनही महिलांचा नाहक छळ होतो़ सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षा धोक्यात आहे़ भोगलालसा वाढल्याने आणि निराधार, निराश्रीत महिलांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याची मानसिकता वाढल्याने महिलांवरील अत्याचार वाढले आहेत़ समाजातील विकृतींवर अंकूश ठेवणे गरजेचे आहे़ आई-वडिलांनी मुलींशी सुसंवाद ठेवून सार्वजनीक ठिकाणी तिच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या़