शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

दर स्थिर राहावेत हीच महिलांची अपेक्षा...

By admin | Updated: July 8, 2014 01:04 IST

औरंगाबाद : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून नागरिकांना बऱ्याच अपेक्षा आहेत.

औरंगाबाद : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून नागरिकांना बऱ्याच अपेक्षा आहेत. दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भडकलेले दर कमी होत नाहीत की, स्थिरही राहत नाहीत, त्यामुळे मर्यादित उत्पन्न असलेल्यांचे जगणेच कठीण झाले आहे. धान्य, भाजीपाला, पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढल्यामुळे कुटुंबाचे मासिक बजेट बिघडले आहे, अशा प्रतिक्रिया गृहिणींनी व्यक्त केल्या. भाजी घेतानाही विचार केला जात आहे. ५० रुपयांत एक वेळची भाजी होत असल्याचे या गृहिणींनी सांगितले.सर्वसामान्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला जावा. वेतनात वाढ झाल्यास महागाईला तोंड देता येईल. महिलांचे आरोग्य आणि शिक्षण यांना प्राधान्य देण्यात यावे. महागाई कमी करण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशा त्यांच्या अपेक्षा आहेत.केंद्र सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प ९ जुलै रोजी सादर होणार आहे. मोदी सरकार कोणत्या घोषणा करणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. महिलांचेही लक्ष त्याकडे लागले आहे. कारण महागाई वाढली की, खर्चाची तोंडमिळवणी त्यांनाच करावी लागते.गरिबांची कोंडीअर्थसंकल्पात जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले की, गरिबांसाठी एक वेळचे जेवणही खूप खर्चिक होते. त्यामुळे सरकारने या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांची परिस्थिती विचारात घ्यावी. - रूपाली करपे महिलांचा विचार व्हावाकेंद्रीय अर्थसंकल्पात महिलांच्या अडचणींचा विचार केला जावा. महिलांना तुटपुंजा पैशांत घर चालवणे कठीण होते. त्यामुळे महिलांची मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता असते. म्हणून अर्थसंकल्पात जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवू नयेत. - सुधा मुसांडे आम्ही खायचे काय?गॅस, पेट्रोल, भाज्या, धान्याचे भाव आकाशाला पोहोचले असल्यामुळे आम्ही काय खायचे, असा प्रश्न आहे. भाव वाढल्यामुळे प्रत्येक वस्तू घरी आणण्याचे प्रमाणही घटले आहे. - विजयमाला गनकवार नियोजन बिघडलेमहागाई थांबत नसल्यामुळे महिन्याचे नियोजन करण्यात अडचणी येतात. एका महिन्यासाठी केलेले आर्थिक नियोजन वाढत्या महागाईमुळे बिघडले आहे. - जयश्री तिवारीशिक्षणावरील खर्च कमी झालावाढत्या महागाईमुळे मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेला खर्चही करता येत नाही. शैक्षणिक बाबींवरील खर्चही भरमसाठ वाढत आहेत. या सगळ्यांची सांगड घालणे अवघड झाले आहे. - मनीषा तांगडे