शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

महिलांना संधीच नाही

By admin | Updated: September 29, 2014 00:06 IST

हिंगोली : विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही मतदारसंघातून केवळ एका महिलेने उमेदवारी दाखल केली आहे. कोणत्याच प्रमुख पक्षाने महिलेला या जिल्ह्यात उमेदवारी दिली नाही. हे विशेष.

हिंगोली : विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही मतदारसंघातून केवळ एका महिलेने उमेदवारी दाखल केली आहे. कोणत्याच प्रमुख पक्षाने महिलेला या जिल्ह्यात उमेदवारी दिली नाही. हे विशेष. एकमेव अर्ज दाखल करणाऱ्यांत वसमतमधील बहुजन मुक्ती पार्टीच्या मीनाक्षी गिते यांचा समावेश आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण दिल्यामुळे त्यांचा टक्का वाढला आहे. मात्र राजकीय घराणेशाहीमुळे निकोप राजकारणातून एखादी महिला पुढे आल्याचे क्वचितच पहायला मिळते. त्यामुळे पुरुषांची राजकारणातील मक्तेदारी अजूनही कायम आहे. जि.प.तच डोकावून पाहिले तर महिला तर अनेक दिसतात. मात्र त्यातील बोटावर मोजण्याइतक्याही स्वबळावर निवडून आलेल्या नाहीत. घराण्याचा वारसाच पुढे चालविणाऱ्यांची संख्या अधिक आहे. हाच कित्ता पं.,स., न.प., ग्रामपंचायतींतही गिरवला जातो. त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण होणे दूरच राहात आहे. महिला पदाधिकारी असतानाही बहुतेकवेळा पतीच कारभारी होऊन बसतो. त्यामुळे त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून स्वतंत्रपणे काम करण्याची संधीही मिळत नाही. परिणामी, महिला राजकारणापासून दूरच राहात असल्याचे दिसते. (जिल्हा प्रतिनिधी)महिलेला संधी देणाऱ्या कळमनुरीतही तीच गतकळमनुरी : विधानसभा निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. २७ उमेदवारांनी ४९ अर्ज भरले. मात्र २७ उमेदवारांपैकी एकही महिला उमेदवार नाही.कळमनुरी विधानसभेचे यापूर्वी माजी मंत्री रजनीताई सातव यांच्या रुपाने महिलेने प्रतिनिधित्व केलेले आहे. मात्र यावेळी या मतदारसंघात महिलेचा अर्जही नाही. २९ सप्टेंंबर रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी तर १ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने एकाही महिला उमेदवाराला संधी दिली नाही. कळमनुरी विधानसभेसाठी २७ उमेदवारांनी अर्ज भरले. अनेक मातब्बरांनी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज भरले. या मतदारसंघात बहुरंगी लढत अपेक्षित आहे. २७ उमेदवारांपैकी पक्षाचे १० च्या जवळपास उमेदवार आहेत. उर्वरित सर्व उमेदवार करीत आहेत. आपल्या उमेदवारीत अडसर नको म्हणून अपक्षांना अर्ज मागे घेण्यासाठी सांगत आहेत. (वार्ताहर)चारदा लाल दिवाजिल्हा परिषदेच्या माध्यमातून आतापर्यंत सुलोचना काळे, सरोजिनी खाडे, मीनाक्षी बोंढारे व आता लक्ष्मीबाई यशवंते यांच्या रुपाने चौथ्या महिलेला संधी मिळाली आहे. मात्र महिलांची कारकिर्द या संस्थांपर्यंतच सीमित राहात आहे. पं.स., न.प. व ग्रा.पं.तही अशाचप्रकारे महिलांना संधी मिळते. पुढे त्यांच्या राजकीय कारकिर्दीची घडणच होत नसल्याचे यावरून दिसून येत आहे. त्यामुळेच विधानसभेचे रण पेटलेले असताना महिला मात्र बाहेरच राहून केवळ मतदानाचे कर्तव्य पूर्ण करणार असल्याचे दिसते.