शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

‘त्या’ महिलेचा ‘स्वॅब पॉझिटीव्ह’

By admin | Updated: March 5, 2015 00:01 IST

उस्मानाबाद : तालुक्यातील तेर येथील एका महिलेचा श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्याने जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला होता़

उस्मानाबाद : तालुक्यातील तेर येथील एका महिलेचा श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्याने जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला होता़ या महिलेचा ‘स्वाईन’ तपासणीसाठी घेण्यात आलेला ‘स्वॅब’चा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे़ तर तालुक्यातीलच पानवाडी येथील एका महिलेचा निमोनियाने मृत्यू झाला असून, त्यांचेही स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत़तेर येथील कविता काळे (वय-२७) या महिलेस मंगळवारी सकाळच्या सुमारास श्वासोच्छवास घेताना त्रास होवू लागल्याने गावातीलच ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ प्रथमोपचारानंतर रूग्णवाहिकेतील व्हेंटीलेटर लावून त्यांना जिल्हा रूग्णालयात पुढील उपचारासाठी आणण्यात आले होते़ मात्र, त्यावेळी ‘स्वाईन’ची तपासणी करण्यासाठी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता़ तसेच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते़ मात्र, दुपारच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता़ बुधवारी सायंकाळी त्यांच्या स्वॅबचा अहवाल जिल्हा रूग्णालयास प्राप्त झाला असून, तो पॉझिटीव्ह आल्याचे रूग्णालयीन सूत्रांनी सांगितले़ तर तालुक्यातील पानवाडी नम्रता मोहिते (वय-३२) या महिलेस उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ चाचणीनंतर निमोनिया झाल्याचा अहवाल आला होता़ मात्र, उपचार सुरू असताना काही काळातच त्यांचा मृत्यू झाला़ त्या उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्यांचाही ‘स्वॅब’ घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले़ दरम्यान, दोन महिलांच्या मृत्यूनंतर स्वाईनचे स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत़ चाचणी अहवालानंतर त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे़