शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

मराठवाड्याचा विकास सिंचनाशिवाय अशक्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:46 IST

देशातील, राज्यातील कोणताही एखादा भाग इतरांच्या तुलनेत मागास राहिलेला असेल, तर तो असमतोल कमी करण्यासाठी कृषी क्षेत्र अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. औद्योगिक असमतोलाच्या अगोदर कृषी क्षेत्रातील असमतोल कमी केल्यास विकासाला चालना मिळते. यासाठी कृषी आणि जलसिंचनाच्या सुविधा वाढविणे गरजेचे असते. यामुळे मराठवाड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जलसिंचनाशिवाय पर्याय नसल्याचे मत इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च आॅन इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स रिलेशन इन्स्टिट्यूटमधील प्रोफेसर गायत्री मोहन यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देगायत्री मोहन : सामाजिकशास्त्रे विभागात आंतरराष्ट्रीय परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशातील, राज्यातील कोणताही एखादा भाग इतरांच्या तुलनेत मागास राहिलेला असेल, तर तो असमतोल कमी करण्यासाठी कृषी क्षेत्र अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. औद्योगिक असमतोलाच्या अगोदर कृषी क्षेत्रातील असमतोल कमी केल्यास विकासाला चालना मिळते. यासाठी कृषी आणि जलसिंचनाच्या सुविधा वाढविणे गरजेचे असते. यामुळे मराठवाड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जलसिंचनाशिवाय पर्याय नसल्याचे मत इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च आॅन इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स रिलेशन इन्स्टिट्यूटमधील प्रोफेसर गायत्री मोहन यांनी व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र विभागाच्या एकत्रित सॅप-२ कार्यक्रमांतर्गत ‘मराठवाड्याचा विकास : संधी आणि आव्हाने’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्घाटन जपानमधील कागावा विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. रवींद्र रानडे, प्राचार्य डॉ. सर्जेराव ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. संजय साळुंके, विभागप्रमुख डॉ. धनश्री महाजन, डॉ. अशोक पवार, डॉ. सुनील नरवडे आदींच्या उपस्थितीत झाले. उद्घाटनानंतरच्या दुसऱ्या सत्रात प्रो. गायत्री मोहन यांनी संशोधन पेपरचे सादरीकरण केले. यात त्यांनी कृषी असमतोलावर भाष्य केले. याच चर्चासत्रात दिल्ली येथील सामाजिक विकास केंद्राच्या डॉ. अनन्या वाजपेयी यांनी सीमांतिक घटकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच समस्या निर्माण होत असल्याचे सांगितले. तत्पूर्वी उद्घाटन समारंभात डॉ. रवींद्र रानडे यांनी बीजभाषण केले. यात त्यांनी जपानमधील इतर प्रदेशांच्या तुलनेत मागास असलेल्या भागात शिक्षण आणि अभियांत्रिकी उद्योग यांच्यात समन्वय निर्माण करून प्रगती साध्य केल्याचे सांगितले. हेच मॉडेल अमेरिकासह जगातील इतर प्रगत राष्ट्रांनी स्वीकारल्याचेही डॉ. रानडे यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ. वाल्मीक सरवदे यांनीही मनोगत व्यक्त केले. अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. धनश्री महाजन यांनी प्रास्ताविक केले. यात त्यांनी तीन विभागांच्या सहकार्यातून सुरू असलेल्या प्रकल्पासह संशोधनावर प्रकाश टाकला. डॉ. शूजा शाकीर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सोनल उबाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला तिन्ही विभागातील विद्यार्थी, परदेशी संशोधक उपस्थित होते.