शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

वादळी पावसाने पुन्हा झोडपले

By admin | Updated: May 31, 2014 00:56 IST

किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारी व परिसराला गुरुवारी रात्री वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने झोडपून काढले.

किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारी व परिसराला गुरुवारी रात्री वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने झोडपून काढले. त्यात परिसरातील ठिकठिकाणी वृक्ष व महावितरणचे विद्युत खांब उन्मळून पडले आहेत. तर या भागातील केळी व द्राक्ष बागांनाही मोठा फटका बसला आहे. औसा तालुक्यातील बहुतांश भागात गुरुवारी रात्री पुन्हा वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने हजेरी लावली. वार्‍याचा वेग प्रचंड असल्याने किल्लारी भागातील वृक्ष व खांब उन्मळून पडले. विद्युत ताराही तुटल्याच्या घटना घडल्या आहेत. गावातील घरांवरील तसेच शेतातील शेडचे पत्रेही उडाले. या पावसामुळे शेतकर्‍यांसह महावितरणचेही मोठे नुकसान झाले आहे. येथील सहाय्यक अभियंता खान व कनिष्ठ अभियंता पोतदार यांनी किल्लारी गावात चार खांब उन्मळून पडल्याची माहिती सांगितली. परिसरातही खांब कोसळले आहेत. त्याची माहिती एकत्र करणे सुरू असल्याचेही ते म्हणाले. खांब कोसळल्यामुळे बर्‍याच भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. दरम्यान, किल्लारी येथील महादेव शिवहार पाटील यांच्या अडीच एकर केळीच्या बागेला वादळी वारा व पावसाचा फटका बसला. त्यात ५ लाखांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. गुंडाप्पा चंद्रकांत बालकुंदे या शेतकर्‍याच्या केळी बागेतील अडीचशे रोप मोडून पडल्याचे त्यांनी सांगितले. बळीराम बालकुंदे यांच्या अडीच एकर द्राक्ष बागेलाही फटका बसून मोठे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)औसा : औसा तालुक्यातील काही भागात गुरुवारी रात्री तर काही भागांत शुक्रवारी सकाळीही पाऊस झाला आहे. ३० मे रोजी लग्नाचा मुहूर्त असल्याने या भागात मोठ्या संख्येने विवाह सोहळे सुरू होते. परंतु, अचानक लावलेल्या पावसाच्या हजेरीने समारंभात वºहाडींची तारांबळ उडाली. शुक्रवारी सकाळी औसा शहरासह किल्लारी, दापेगाव, जवळगा (पो.) व इतरही भागांत पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच या ठिकाणी ढगाळ वातावरण होते. भादा परिसरातही शुक्रवारी सकाळी पाऊस झाला.