शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

क्यों न कहें हम, इससे तो अच्छे पुराने दिन ही थे

By admin | Updated: July 9, 2014 00:52 IST

औरंगाबाद : रेल्वे अर्थसंकल्पातून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा होती मात्र ती फोल ठरल्याचे औरंगाबादकरांना वाटत आहे.

औरंगाबाद : प्रवासी वाहतुकीत कोणताच दिलासा न देणारा तसेच मालवाहतुकीच्या दरात वाढ करणारे रेल्वे बजेट असल्याने येत्या काही दिवसांत महागाई आणखीन वाढेल, अशा प्रतिक्रिया आज शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या. रेल्वे अर्थसंकल्पातून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा होती मात्र ती फोल ठरल्याचे औरंगाबादकरांना वाटत आहे. महागाईत वाढमालवाहतूक दरात काही दिवसांपूर्वीच वाढ झाली आहे. त्यामुळे रेल्वेतून येणारे खत, अन्नधान्यासह इतर साहित्याच्या किमतीत वाढ होईल. यातून महागाई वाढेल.- मोहंमद अस्लम मोतीवाला, अध्यक्ष, हँडलिंग अँड ट्रान्सपोर्टेशन अँड हुंडेकर असोसिएशनसुविधेत वाढ व्हावीमालवाहतुकीत ४.९ टक्के वाढीचे उद्दिष्ट आहे; परंतु आधी सुविधा मिळाल्या पाहिजेत. रेल्वे अधिकाऱ्यांना अधिकारशाहीची भूमिका बदलावी लागेल तरच मालवाहतुकीत वाढ होऊ शकते.- फय्याज खान, अध्यक्ष, औरंगाबाद गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनसुरक्षितता महत्त्वाचीरेल्वेचा प्रवास बसच्या तुलनेत स्वस्त आणि सोयीचा ठरतो. सुरक्षेसाठी हेल्पलाईन सुरू केली जाईल, आरपीएफमध्ये भरती होणार असल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे त्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी.- छाया पिंपळे, गृहिणी सुविधा मिळत नाहीतअर्थसंकल्पात केवळ घोषणा करून चालणार नाही, तर त्या प्रत्यक्षात सुविधा मिळाव्यात.- सचिन जगताप, प्रवासीबोगींमध्ये वाढ व्हावीविमानतळासारख्या सुविधा देणार असल्याचे जाहीर झाले; परंतु प्राधान्याने स्थानक आणि रेल्वेगाडीतील स्वच्छतेवर भर दिला जावा. तसेच विविध रेल्वेगाड्यांच्या बोगींमध्ये वाढ होण्याची आवश्यकता आहे.- प्रसाद माने, प्रवासी दरवाढ कमी व्हावीदरवाढ कमी होण्याची आशा होती. अधिक पैसे मोजूनही सुविधा मिळत नाहीत. बोगींची संख्या वाढविली पाहिजे.- के.के. यादव, प्रवासी खाजगीकरणाने मनमानीरेल्वेत खासगीकरणाचा प्रवेश होता कामा नये. असे झाल्यास प्रत्येक सेवेचे दर वाढतील. मनमानी वाढू शकते.- जी.आर. कुलकर्णी, प्रवासी व्यापारी दृष्टिकोन ठेवून अर्थसंकल्पस्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच व्यापारी दृष्टिकोन ठेवून रेल्वे अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे, याचे मी स्वागत करतो. जसजसे डिझेलचे भाव वाढतील तसतसे रेल्वेचे प्रवासभाडे वाढेल, अशी घोषणा केल्याने आता रेल्वेची तूट कमी होणार आहे. -अजय शहा, उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघरेल्वेच्या विकासासाठी चांगला प्रयत्नसर्व रेल्वेस्थानकांवर पीपीपीच्या माध्यमातून पूल, लिफ्ट व एस्केलेटर बनविण्यात येणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे रेल्वेस्थानकांचा विकास होईल. सुविधांमध्ये वाढ होईल. मुंबई- अहमदाबाद मार्गावर पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. -सुनील काला, करसल्लागार‘लोकमत’च्या प्रयत्नांना यशसोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर औरंगाबाद- चाळीसगावदरम्यान समांतर रेल्वेमार्ग सुरू करण्यात यावा, या प्रश्नाला सर्वप्रथम ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. औरंगाबाद- चाळीसगाव रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची घोषणा आता करण्यात आली आहे. -अजय तलरेजा, व्यापारीदेशी पर्यटकांची संख्या वाढेलनांदेड- बिकानेर रेल्वे सुरू केल्याने त्याचा सर्वाधिक फायदा औरंगाबादला होणार आहे. कारण, या पर्यटनाच्या राजधानीत, सर्वाधिक पर्यटक राजस्थानमार्गेच येत असतात. विशेषत: देशी पर्यटक आता या रेल्वेने थेट औरंगाबादेत येतील, पर्यटकांची संख्या वाढेल. -जसवंतसिंग, अध्यक्ष, ट्रॅव्हल्स असोसिएशनपायाभूत सुविधांकडे लक्ष द्यावेबुलेट ट्रेन सुरू करण्यापूर्वी केंद्र सरकारने रेल्वेस्टेशनवर देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांकडे लक्ष द्यावे. कारण, नुकतेच औरंगाबादेत पावसाने सिमेंटच्या बॅगांचे नुकसान झाले. रेल्वेस्टेशनवर गोदामाची सुविधा नाही. माल उचलण्याची सुविधा नाही.-मनोज रुणवाल, सिमेंटचे वितरक महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हाताळलारेल्वे प्रवासात महिलांच्या सुरक्षतेसाठी ४ हजार महिला कॉन्स्टेबलची भरती करण्यात येणार आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेविषयी केंद्र सरकार किती गंभीर आहे याची प्रचीती येते. औरंगाबाद- अहमदाबाद रेल्वे सुरू करण्यात यावी, अशी जुनी मागणी आहे; पण ती पूर्ण झाली नाही.-लालाभाई पारीख, सचिव, औरंगाबाद कुरिअर असोसिएशन