शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

पाणी चोरी थांबणार कधी?

By admin | Updated: April 23, 2016 23:47 IST

भोकरदन : मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पद्मावती मध्यम प्रकल्पातील पाणी चोरी थांबविण्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार केल्यानंतरही पाणी चोरी सुरूच आहे.

भोकरदन : मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पद्मावती मध्यम प्रकल्पातील पाणी चोरी थांबविण्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार केल्यानंतरही पाणी चोरी सुरूच आहे. प्रशासनाचे अधिकारी सदरील प्रकल्प कोरडा पडल्यावर पाणी चोरी थांबविण्यासाठी कागदी घोडे नाचविणार आहेत काय? असा सवाल वालसांवगीच्या सरपंच रंजना बालूसेठ आहेर, पारधच्या सरपंच वीणाताई शेखर श्रीवास्तव व वाढोण्याचे सरपंच शालिकराम गवळी यांनी केला आहे़पद्मावती मध्यम प्रकल्पात यावर्षी ८० टक्के पाणीसाठा झाला होता. मात्र सदरील धरण हे बुलडाणा जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असल्यामुळे लघुपाटबंधारे विभागाने दोन ते तीन वेळा शेतीसाठी पाणी सोडले होते. मात्र, त्यानंतर सुध्दा या धरणातून पारध खुर्द, पारध बु, पद्मावती, वालसावंगी, मासरूळ, धामणगाव, तराडखेड आदी गावातील शेतकऱ्यांनी वीजपंपांद्वारे अवैध पाणी उपशामुळे पाणीसाठा अर्धा टक्का सुद्धा नाही. त्यामुळे या धरणावरून पाणीपुरवठा असलेल्या गावाना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. याची पूर्व सूचना सुध्दा या गावच्या सरपंचांनी तहसील, पंचायत समिती व लघू पाटबंधारे विभागासह महावितरण कंपनीला सुध्दा दिली. परिसरातील वीजपुरवठा खंडित करून पाणी चोरी थांबविण्याची विनंती केली. प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी सुरूच असल्याचे चित्र आहे. प्रशासनाबाबत संतापाची लाट निर्माण झाली आहे़ त्यामुळे प्रशासन काय धरण कोरडे पडल्यावर पाणी चोरी थांबविण्यासाठी पथकाची नेमणूक करणार आहे काय, असा प्रश्न तीन गावातील सरपंच उपस्थित करीत आहेत. प्रशासन कारवाई कधी करणार असा सवाल वरील गावांतील सरपंचांनी केला.