शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
4
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
5
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
6
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
7
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
8
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
9
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
11
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
12
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
13
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
14
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
15
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
16
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
17
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
18
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

वामनदादा कर्डक यांच्या स्मारकाचे काय?

By admin | Updated: May 16, 2014 00:40 IST

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहरात महाकवी वामनदादा कर्डक यांच्या यथोचित स्मारकाचे काय झाले? असा सवाल आज येथे उपस्थित करण्यात आला.

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहरात महाकवी वामनदादा कर्डक यांच्या यथोचित स्मारकाचे काय झाले? असा सवाल आज येथे वामनदादा कर्डक यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित करण्यात आला. विपश्यना बुद्धविहारात सकाळी दशरथ बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली हा अभिवादनाचा कार्यक्रम झाला. वामनदादांचे मानसपुत्र व प्रसिद्ध गायक गौतमकुमार जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वामनदादा कर्डक यांचे निधन होऊन आज दहा वर्षे झाली. वामनदादांचे औरंगाबादवर खूप प्रेम होते. औरंगाबादेत त्यांचा शिष्यवर्गही मोठा आहे. येथील मनपाने वामनदादांच्या पुतळ्याचा ठरावही संमत केला; परंतु या पुतळ्याचा पत्ता नाही. या कामाच्या झारीतले शुक्राचार्य दुसरे- तिसरे कुणी नाहीत, याकडे यावेळी स्वत: गौतमकुमार जाधव यांनी लक्ष वेधले व पुतळा होईपर्यंत संघर्ष चालूच ठेवण्यात येईल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. बुद्धप्रिय कबीर यांनी वामनदादांची गाणी गाणार्‍या गायकांना गुन्हेगार ठरविण्याच्या प्रवृत्तीचा यावेळी निषेध केला. रतनकुमार भालेराव यांनी वामनदादांच्या समवेत आपण वाद्यांची साथसंगत कशी करीत होतो याविषयीच्या आठवणी सांगितल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने वामनदादांना मरणोत्तर डी.लिट. पदवी द्यावी, वामनदादांच्या नावाने विद्यापीठात अध्यासन केंद्र सुरू करण्यात यावे, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या व त्यासाठी पुन्हा नव्याने पाठपुरावा करण्याचे ठरले. यावेळी अर्जुन मगरे, कडुबा तुपे, अमोल जाधव, गणेश लोखंडे, अनिल काळे, संदीप अहिरे, रवीभाई तायडे, अ‍ॅड. बी.एन. जाधव, अशोक खरात, गोकुळ भुजबळ, अ‍ॅड. संतोष लोखंडे, डॉ. नागसेन दवणे, विजय बचके, विजय खोतकर, नाथा वखरे, जयपाल दवणे, शंकर तीनगोटे, जी.एन. खंडाळे, संदीपान कांबळे, अण्णासाहेब पठारे, प्रभू बनकर, विनोद साबळे, सुशील भालेराव व महिला मंडळाची उपस्थिती होती. रमानगरात... रमानगर येथील कवी सिद्धार्थ जाधव यांच्या निवासस्थानी वामनदादा कर्डक यांना अभिवादन करण्यात आले. महाकवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात गायक संभाजी गायकवाड यांनी गायिलेल्या गीताने झाली. प्रास्ताविक सिद्धार्थ जाधव यांनी केले. ढोलकीपटू सुरडकर गुरुजींचे अलीकडेच निधन झाले. त्यांनी वामनदादांना ढोलकीची साथ दिली होती. वामनदादांबरोबर साथसंगत करणारे कलावंत आता हळूहळू संपुष्टात येत आहेत. जे हयात आहेत, त्यांच्या आठवणींचे एखादे पुस्तक काढावे, असा मतप्रवाह यावेळी आढळून आला. मधुकर भोळे व बुद्धप्रिय कबीर यांची यावेळी भाषणे झाली. वीर कडेठाणकर गुरुजी, शाहीर सखाराम साळवे, बाबूराव जुंबडे आदींची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.