शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नळदुर्गकरांना भारनियमनाचे चटके

By admin | Updated: September 24, 2014 00:45 IST

नळदुर्ग : विद्युत वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे नळदुर्ग शहराचा वसूलीचा दर्जा जी-३ मध्ये तर विद्युत गळती ७४.०७ टक्के पर्यंत पोहचल्याने शहरात

नळदुर्ग : विद्युत वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे नळदुर्ग शहराचा वसूलीचा दर्जा जी-३ मध्ये तर विद्युत गळती ७४.०७ टक्के पर्यंत पोहचल्याने शहरात दररोज सव्वा नऊ तास भारनियमन होत सुरु झाले आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्यांतून संताप व्यक्त होत आहे.येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रातून नळदुर्ग अर्बनसह साखर कारखाना, वसंतनगर, चिकुंद्रा व मानेवाडी आदी गावांना विद्युत पुरवठा होतो. मागच्या तीन-चार महिन्यापासून विद्युत वितरणातील गळतीने ७४.०७ टक्के चा उच्चांक गाठला आहे. तर वसुली केवळ ४० टक्के झालेली आहे. या कारभारामुळे जिल्हा कार्यकारी अभियंत्याने नळदुर्ग शहरात १४ सप्टेंबरपासून सकाळी ५.३० ते ८.३० (३ तास), सकाळी ११.३० ते दुपारी २.४५ (३.१५ तास) तर सायंकाळी ७ ते रात्री १० (३ तास) असे भारनियमन करण्याचे आदेश दिल्याने मंगळवारपासून भारनियमनास प्रारंभ झालेला आहे. मिटर रिडींगप्रमाणे बिल न देणे, सार्वजनिक उत्सव व सणात विद्युत चोरीकडे दुर्लक्ष करणे, अनधिकृत कर्मचारी व अनधिकृत विद्युत पुरवठा यामुळे या उपकेंद्राच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बिलावर फोटो मिटरचा असतो, रिडींगमध्ये युनिटऐवजी दिनांक दिसतो. असे असतानाही वापर युनिट लिहून बिल दिले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. ग्राहकांच्या तक्रारीचा निपटाराही वेळेवर होत नसल्याने ग्राहक बिल भरत नाहीत. या सर्वच परिस्थितीत नियमित बिल भरणा करणारा मात्र संकटात सापडला आहे. याशिवाय वितरण कंपनी गळतीची तुट भरुन काढण्यासाठी ज्यादा बिल आकारणी करीत असल्याची ओरडही ग्राहकातून वाढत आहे. दिवसा ९ तासाचे विद्युत भारनियमन झाल्यास लघु उद्योजकांना दिवसभर रिकामे बसून रहावे लागणार आहे. शहरात अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे विद्युत भार नियमनाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणार आहे.याशिवाय सेतू कार्यालय, बँका, पोस्ट आॅफीस, महाविद्यालये यांचा कारभार बहुतांश आॅनलाईन आहे. विविध स्पर्धा परीक्षांचे फॉर्म कर्मचाऱ्यांच्या पगाराची माहितीही आॅनलाईन द्यावी लागते. अशा परिस्थितीत ९ तास भारनियमन झाल्यास सर्व स्तरातील नागरिकांची होरपळ होणार आहे. संबंधितांनी शहराचे भारनियमन रद्द करुन भोंगळ कारभार सुधारावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (वार्ताहर)