शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

जकापूर प्रकल्पातून शेतीसाठी पाणी उपसा !

By admin | Updated: August 11, 2014 01:53 IST

गुंजोटी : सध्या पावसाने ओढ दिल्यामुळे बहुतांश तलाव कोरडेठाक पडले आहेत. याला जकापूर प्रकल्पही अपवाद नाही. या प्रकल्पात आज घडीला ३०

गुंजोटी : सध्या पावसाने ओढ दिल्यामुळे बहुतांश तलाव कोरडेठाक पडले आहेत. याला जकापूर प्रकल्पही अपवाद नाही. या प्रकल्पात आज घडीला ३० टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असतानाही शेतीसाठी पाणी उपसा सुरु आहे. या प्रकाराकडे संबंधित प्रशासनाकडून पद्धतशीरपणे डोळेझाक केली जात आहे.गुंजोटी परिसरामध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला असला तरी प्रकल्पाची पाणी पातळी वाढेल असा एकही दमदार पाऊस पडलेला नाही. जकापूर येथील प्रकल्पात आजघडीला ३० टक्केच्या आसपास पाणीसाठा आहे. असे असले तरी गुंजोटी गावाला मात्र आजही पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पळसगाव साठवण तलाव क्षेत्रात विहीर खोदून पाणी योजना राबविली. परंतु सध्या विहिरीमध्येच पाणी नसल्याने ही योजनाच कुचकामी ठरणार आहे. असे असतानाच दुसरीकडे संबंधित प्रकल्पातून शेतीसाठी पाणी उपसा केला जात आहे. गुंजोटी ग्रामपंचायतीच्या वतीने शेतीसाठी पाणी उचलण्यास मनाई केली आहे. असे असले तरी काही शेतकरी रात्रीच्या वेळी पाणी उपसा करीत आहेत. यासंदर्भात ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे तक्रार केली असली तरी संबंधिात विभाागाचे अधिकारी इकडे फिरकत नाहीत. त्यामुळे अवैधरित्या पाणी उपशाला पायबंद बसू शकला नाही. (वार्ताहर)