शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

पाणी, कामांवर बैठकीत खल

By admin | Updated: December 5, 2014 00:52 IST

उदगीर : उदगीर व जळकोट तालुक्यात पर्जन्यमान ५० टक्केही झाले नाही़ त्यामुळे टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे़ अशा संकटाच्या वेळी काय उपाय योजना करता येतील,

उदगीर : उदगीर व जळकोट तालुक्यात पर्जन्यमान ५० टक्केही झाले नाही़ त्यामुळे टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे़ अशा संकटाच्या वेळी काय उपाय योजना करता येतील, याअनुषंगाने गुरुवारी उदगीरात बैठक घेण्यात आली़ त्यात पिण्याचे पाणी अन् कामे उपलब्ध करुन देण्यासंदर्भात खल झाला़तोंडार पाटीजवळील साईधाममध्ये आमदार डॉ़सुधाकर भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही तालुक्यातील टंचाईचा आढावा घेण्यात आला़ व्यासपीठावर जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, अतिरिक्त सीईओ मेघमाळे, उपविभागीय अधिकारी डॉ़विकास खरात, नागनाथ निडवदे यांची उपस्थिती होती़ प्रारंभी उदगीर तालुक्यातील टंचाईचा आढावा तहसीलदार गजानन शिंदे यांनी घेतला़ त्यानंतर जळकोटचे तहसीलदार कांबळे यांनी जळकोटचा आढावा मांडला़ प्रास्ताविक गटविकास अधिकारी डी़बी़ गिरी यांनी केले़ त्यावर आमदार भालेराव यांनी उपस्थित सरपंच, ग्रामस्थांना मुद्देसूद पद्धतीने आपापल्या गावातील नेमकी अडचण मांडण्याची सूचना केली़ त्याअनुषंगाने विविध गावांतून जमलेल्या नागरिकांनी आपापल्या गावांतील अडचणींची माहिती सादर केली़ त्यावर आवश्यक असणाऱ्या उपाय योजना करण्यासाठी प्रशासनास साकडे घातले़ सामान्यत: विहिरीतील गाळ काढणे, कामे उपलब्ध करुन देणे, बंद बोअर, हातपंपाची माहिती घेऊन ते दुरुस्त करणे, जनावरांना मोफत चारा उपलब्ध करुन देणे अशा सूचना नागरिकांनी मांडल्या़ भालेराव यांनी लिंबोटी धरणातून कायमस्वरुपी योजनेचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याची सूचना नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना केली़ यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी प्रशासन टंचाईचा सामना करण्यास तत्पर असल्याचे सांगितले़ या काळात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अनावश्यक सुट्या टाळण्याची सूचना करुन आवश्यक असेलच तर उपविभागीय अधिकाऱ्यांना त्याची माहिती देणे बंधनकारक केल्याचे सांगितले़ सीईओ दिनकर जगदाळे यांनीही कोणत्याही परिस्थितीत टंचाई सामना करण्यास सज्ज असल्याचे सांगितले़ यावेळी जि़प़ सदस्य चंदन पाटील व गटनेते रामचंद्र तिरुके यांनीही सूचना मांडल्या़ अध्यक्षीय समारोपात आमदार भालेराव यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले़ (वार्ताहर)४आमदार सुधाकर भालेराव यांच्या अध्यक्षतेखालील टंचाई आढावा बैैठकीस उदगीर, जळकोट तालुक्यातील बहुतांश काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविली़ बैैठकीची जागा ही आडवळणाची असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे काँग्रेस लोकप्रतिनिधींनी यावेळी केली़ भाषणांना चढला जोऱ़़४दोन तास उशिरा सुरु झालेल्या बैैठकीत लोकप्रतिनिधींकडून मुद्देसूद मांडणीऐवजी भाषणबाजीच होऊ लागली़ नेमकी कोणत्या गावी, काय अडचण आहे, याची मांडणी करण्यास सांगितल्यानंतरही मोघम मागण्या मांडून त्यावरच्या उपायांचा सल्ला देण्यात आला़ एकाही सदस्याने आपल्या मतदारसंघातील नेमक्या कोणत्या गावी काय उपाययोजना करायची, याचा साधा उल्लेखही केला नाही़पंधरा दिवसांत ग्रामदिन संकल्पना़़़४सरकारी कर्मचारी गावात दिसत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामदिन ही संकल्पना राबवीत असल्याचे सांगितले़ त्यानुसार ग्रामस्तरावरील तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व अन्य कर्मचारी ठराविक वारी पूर्णवेळ त्या-त्या गावांमध्ये हजर राहतील़ पंधरा दिवसांत हे काम सुरु करण्याचे संकेत दिले़