शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

पाणी, कामांवर बैठकीत खल

By admin | Updated: December 5, 2014 00:52 IST

उदगीर : उदगीर व जळकोट तालुक्यात पर्जन्यमान ५० टक्केही झाले नाही़ त्यामुळे टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे़ अशा संकटाच्या वेळी काय उपाय योजना करता येतील,

उदगीर : उदगीर व जळकोट तालुक्यात पर्जन्यमान ५० टक्केही झाले नाही़ त्यामुळे टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे़ अशा संकटाच्या वेळी काय उपाय योजना करता येतील, याअनुषंगाने गुरुवारी उदगीरात बैठक घेण्यात आली़ त्यात पिण्याचे पाणी अन् कामे उपलब्ध करुन देण्यासंदर्भात खल झाला़तोंडार पाटीजवळील साईधाममध्ये आमदार डॉ़सुधाकर भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही तालुक्यातील टंचाईचा आढावा घेण्यात आला़ व्यासपीठावर जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, अतिरिक्त सीईओ मेघमाळे, उपविभागीय अधिकारी डॉ़विकास खरात, नागनाथ निडवदे यांची उपस्थिती होती़ प्रारंभी उदगीर तालुक्यातील टंचाईचा आढावा तहसीलदार गजानन शिंदे यांनी घेतला़ त्यानंतर जळकोटचे तहसीलदार कांबळे यांनी जळकोटचा आढावा मांडला़ प्रास्ताविक गटविकास अधिकारी डी़बी़ गिरी यांनी केले़ त्यावर आमदार भालेराव यांनी उपस्थित सरपंच, ग्रामस्थांना मुद्देसूद पद्धतीने आपापल्या गावातील नेमकी अडचण मांडण्याची सूचना केली़ त्याअनुषंगाने विविध गावांतून जमलेल्या नागरिकांनी आपापल्या गावांतील अडचणींची माहिती सादर केली़ त्यावर आवश्यक असणाऱ्या उपाय योजना करण्यासाठी प्रशासनास साकडे घातले़ सामान्यत: विहिरीतील गाळ काढणे, कामे उपलब्ध करुन देणे, बंद बोअर, हातपंपाची माहिती घेऊन ते दुरुस्त करणे, जनावरांना मोफत चारा उपलब्ध करुन देणे अशा सूचना नागरिकांनी मांडल्या़ भालेराव यांनी लिंबोटी धरणातून कायमस्वरुपी योजनेचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याची सूचना नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना केली़ यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी प्रशासन टंचाईचा सामना करण्यास तत्पर असल्याचे सांगितले़ या काळात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अनावश्यक सुट्या टाळण्याची सूचना करुन आवश्यक असेलच तर उपविभागीय अधिकाऱ्यांना त्याची माहिती देणे बंधनकारक केल्याचे सांगितले़ सीईओ दिनकर जगदाळे यांनीही कोणत्याही परिस्थितीत टंचाई सामना करण्यास सज्ज असल्याचे सांगितले़ यावेळी जि़प़ सदस्य चंदन पाटील व गटनेते रामचंद्र तिरुके यांनीही सूचना मांडल्या़ अध्यक्षीय समारोपात आमदार भालेराव यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले़ (वार्ताहर)४आमदार सुधाकर भालेराव यांच्या अध्यक्षतेखालील टंचाई आढावा बैैठकीस उदगीर, जळकोट तालुक्यातील बहुतांश काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविली़ बैैठकीची जागा ही आडवळणाची असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे काँग्रेस लोकप्रतिनिधींनी यावेळी केली़ भाषणांना चढला जोऱ़़४दोन तास उशिरा सुरु झालेल्या बैैठकीत लोकप्रतिनिधींकडून मुद्देसूद मांडणीऐवजी भाषणबाजीच होऊ लागली़ नेमकी कोणत्या गावी, काय अडचण आहे, याची मांडणी करण्यास सांगितल्यानंतरही मोघम मागण्या मांडून त्यावरच्या उपायांचा सल्ला देण्यात आला़ एकाही सदस्याने आपल्या मतदारसंघातील नेमक्या कोणत्या गावी काय उपाययोजना करायची, याचा साधा उल्लेखही केला नाही़पंधरा दिवसांत ग्रामदिन संकल्पना़़़४सरकारी कर्मचारी गावात दिसत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामदिन ही संकल्पना राबवीत असल्याचे सांगितले़ त्यानुसार ग्रामस्तरावरील तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व अन्य कर्मचारी ठराविक वारी पूर्णवेळ त्या-त्या गावांमध्ये हजर राहतील़ पंधरा दिवसांत हे काम सुरु करण्याचे संकेत दिले़