शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

पाण्यासाठी मनपाकडून चाचपणी !

By admin | Updated: November 25, 2014 00:57 IST

लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा असल्याने मनपा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे़

लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा असल्याने मनपा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे़ पावसाळ्यातही पाणीटंचाईचे चटके सहन करणाऱ्या लातूरकरांना उन्हाळ्यात तीव्र टंचाईचा सामोरे जावे लागणार आहे़ टंचाई कमी करण्यासाठी मनपा प्रशासन पाणीसाठ्यांची चाचपणी करीत आहे़ सोमवारी माजी मंत्री आ़ अमित देशमुख यांच्यासह मनपा पदाधिकाऱ्यांनी लिंबोटी धरणाची पाहणी केली आहे़ भविष्यात लातूरचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी लिंबोटी किंवा उजनी येथून पाणी मिळू शकेल काय, याची चाचपणी केली जात आहे़ पावसाळ्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा मांजरा प्रकल्पात शिल्लक नसल्याने पर्यायी मार्गाचा शोध घेतला जात आहे़ मांजरा नदीवर असलेल्या बॅरेजसचे पाणी शहरासाठी राखीव ठेवण्यात आले आहे़ एकंदरीत शहराची गरज लक्षात घेता पाणीटंचाई वाढणार हे लक्षात आल्यामुळे मनपा प्रशासन कामाला लागले आहे़ लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील मन्याड प्रकल्पातून कायमस्वरूपी पाणी योजना करण्यासाठी मनपाने ३५० कोटींचा आराखडा तयार केला आहे़ मात्र, सदरील प्रकल्पातून लातूरला पाणी आणता येईल की नाही, याबाबत निश्चितता नसल्याने उजनीच्या पर्यायावरही विचार केला जात आहे़ समुद्र सपाटीपासून लातूर शहर ६२४ मीटर उंच तर उर्ध्व मन्याड प्रकल्प ४३० मीटर उंचीवर आहे़ या प्रकल्पातून किती पाणी लातूरला मिळू शकते यावर चाचपणी केली जात आहे़ सोमवारी माजी मंत्री अमित देशमुख, महापौर अख्तर मिस्त्री, उपमहापौर कैलास कांबळे, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष ज्योती पवार, शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, गटनेते नरेंद्र अग्रवाल, रिपाइचे गटनेते चंद्रकांत चिकटे, अ‍ॅड़ दीपक सूळ, असगर पटेल, रविशंकर जाधव, राजेंद्र इंद्राळे, नवनाथ आल्टे, रवी सुडे, विष्णूपंत साठे, अहेमदखाँ पठाण यांच्यासह गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)४लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात गेल्या तीन वर्षांपासून पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे पाणीसाठा अत्यल्प आहे़ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी पुरक पाणीपुरवठा योजना करण्यात येणार आहे़ त्यामुळे लिंबोटी व उजनी येथून पाणी आणण्याचा प्रयत्न आहे़ महानगरपालिका, राज्य शासन व केंद्र शासनाच्या माध्यमातून पुर्णत्वास आणण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती माजी मंत्री आ़ अमित देशमुख यांनी यांनी प्रकल्प पाणीनंतर अहमदपूर येथील विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली़ यावेळी महापौर अख्तर शेख, आयुक्त सुधाकर तेलंग यांनी पाणीपुरवठा योजनेसंदर्भात माहिती दिली़ ४महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने लातूर शहराचा पाणीपुरवठा महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यामुळे आता पाणीपुरवठा मनपालाच करावा लागणार आहे़ त्यासाठी जलवाहिन्याची दुरूस्ती, आवश्यक तिथे जलवाहिनीचे नवे जाळे, पाणी गळती, वितरण व्यवस्था सक्षम करावी लागणार आहे़ अद्याप सदरील योजना एमजीपीकडे असली लवकरत तिचे हस्तांतरण होणार आहे़