शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

परभणी शहरात जलदिंडीतून पाणी बचतीचा संदेश

By admin | Updated: March 23, 2016 00:23 IST

परभणी : ‘जल है तो कल है’ चा नारा देत शहरातून राष्ट्रीय जल दिनाच्यानिमित्ताने जलदिंडी काढण्यात आली़

परभणी : ‘जल है तो कल है’ चा नारा देत शहरातून राष्ट्रीय जल दिनाच्यानिमित्ताने जलदिंडी काढण्यात आली़ शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी दिंडीत सहभागी होवून पाणी बचतीचा संदेश सर्वांपर्यंत पोहचविण्याचे काम केले़ राष्ट्रीय जलदिनाच्या निमित्ताने २२ मार्च रोजी परभणी शहरातून जलदिंडी काढण्यात आली़ जलमित्र संघटनेच्या वतीने ही दिंडी काढण्यात आली होती़ शहरातील शिवाजी चौक येथून मंगळवारी सकाळी ८ वाजता दिंडीस सुरुवात झाली़ महापौर संगीता वडकर, उपमहापौर भगवान वाघमारे, आयुक्त राहुल रेखावार, जलमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ़ राजगोपाल कालानी, उपायुक्त रणजीत पाटील, ह़भ़प़ अच्युत महाराज दस्तापूरकर, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, मनपाच्या विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे यांच्या हस्ते दिंडीस हिरवा झेंडा दाखविण्यात आला़ ही दिंडी शिवाजी चौक येथून गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभुजा देवी मंदिर, आऱआऱ टॉवर, नारायण चाळ, स्टेशन रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली़ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दिंडीचा समारोप करण्यात आला़ समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी महिवाल यांनी उपस्थितांना जलप्रतिज्ञा देऊन पाण्याचे महत्त्व विशद केले़ आयुक्त रेखावार, महापौर वडकर, उपमहापौर वाघमारे, राजगोपाल कालानी यांनी मनोगत व्यक्त केले़ सुनील तुरूकमाने यांनी सभेच्या समारोपप्रसंगी सूत्रसंचालन केले़ जलदिंडीमध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला, विद्यार्थी, युवक यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता़ प्रत्येकाच्या हातामध्ये पाण्याचे महत्त्व विशद करणारे फलक होते़ जलदिनाच्यानिमित्ताने पाण्याचे महत्त्व सांगणारे घोषवाक्य उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते़ (प्रतिनिधी)