शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

‘बिंदुसरा’तील पाणी गळती सुरूच

By admin | Updated: November 24, 2014 00:36 IST

सोमनाथ खताळ, बीड यावर्षी जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पाण्याची भीषण टंचाई. एवढी गंभीर परिस्थिीती उद्भवलेली असतानाही आजही पालीच्या

सोमनाथ खताळ, बीडयावर्षी जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पाण्याची भीषण टंचाई. एवढी गंभीर परिस्थिीती उद्भवलेली असतानाही आजही पालीच्या बिंदुसरा धरणातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे या पाण्याचा सर्रास शेतीसाठी वापर केला जात आहे. याकडे मात्र संबंधित विभाग ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.बीड शहराला तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र या धरणाची पाणीपातळीही सध्या जोत्याखाली आहे. त्यामुळे बीडकरांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेची पळापळ सुरू आहे. अशातच बिंदुसरा धरणातून राहिलेले पाणीही लवकरच संपण्याची भिती पालिकेने वर्तविली होती. मागील वर्षभरापासून धरणाच्या भिंतीला तीन भलेमोठे भगदाड पडले होते. यातून दररोज पंधरा लिटर पाणी वाया जात होते. याबाबत ‘लोकमत’मधून वृत्तही प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत काही वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून पाणीगळती थांबविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सध्या पुन्हा या धरणातून पाणी गळती सुरू झाली आहे. त्यामुळे झालेले काम निकृष्ठ झाले की, भिंत धोक्यात आली आहे, याचे उत्तर मात्र संबंधितांना देता येत नाही. धरणाच्या भिंतीचे भगदाड हे मुद्दामहून बुजविले जात नाही, असा आरोप मनविसेचे जिल्हाध्यक्ष शैलश जाधव यांनी केला आहे.लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता डी.एम.कोकणे म्हणाले, आम्ही धरणाचे भगदाड सिमेंट काँक्रीट करून बुजविलेले आहेत. भिंतीतून वाया जात असलेल्या पाण्याचा फारसा फरक पडत नाही. ही तांत्रिक समस्या आहे.बिंदूसरा धरणाची पातळी जोत्याखाली गेल्यामुळे शहराला माजलगावच्या धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे.४माजलगाव धरणातूनही सध्या मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा होत असल्याने धरणातील पाणी लवकरच संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे.४धरणातील पाणी आरक्षित करण्यात यावे, या संदर्भात मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही पाठविलेले आहे.४या संदर्भात अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही.