शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

‘बिंदुसरा’तील पाणी गळती सुरूच

By admin | Updated: November 24, 2014 00:36 IST

सोमनाथ खताळ, बीड यावर्षी जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पाण्याची भीषण टंचाई. एवढी गंभीर परिस्थिीती उद्भवलेली असतानाही आजही पालीच्या

सोमनाथ खताळ, बीडयावर्षी जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पाण्याची भीषण टंचाई. एवढी गंभीर परिस्थिीती उद्भवलेली असतानाही आजही पालीच्या बिंदुसरा धरणातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे या पाण्याचा सर्रास शेतीसाठी वापर केला जात आहे. याकडे मात्र संबंधित विभाग ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.बीड शहराला तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र या धरणाची पाणीपातळीही सध्या जोत्याखाली आहे. त्यामुळे बीडकरांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेची पळापळ सुरू आहे. अशातच बिंदुसरा धरणातून राहिलेले पाणीही लवकरच संपण्याची भिती पालिकेने वर्तविली होती. मागील वर्षभरापासून धरणाच्या भिंतीला तीन भलेमोठे भगदाड पडले होते. यातून दररोज पंधरा लिटर पाणी वाया जात होते. याबाबत ‘लोकमत’मधून वृत्तही प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत काही वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून पाणीगळती थांबविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सध्या पुन्हा या धरणातून पाणी गळती सुरू झाली आहे. त्यामुळे झालेले काम निकृष्ठ झाले की, भिंत धोक्यात आली आहे, याचे उत्तर मात्र संबंधितांना देता येत नाही. धरणाच्या भिंतीचे भगदाड हे मुद्दामहून बुजविले जात नाही, असा आरोप मनविसेचे जिल्हाध्यक्ष शैलश जाधव यांनी केला आहे.लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता डी.एम.कोकणे म्हणाले, आम्ही धरणाचे भगदाड सिमेंट काँक्रीट करून बुजविलेले आहेत. भिंतीतून वाया जात असलेल्या पाण्याचा फारसा फरक पडत नाही. ही तांत्रिक समस्या आहे.बिंदूसरा धरणाची पातळी जोत्याखाली गेल्यामुळे शहराला माजलगावच्या धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे.४माजलगाव धरणातूनही सध्या मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा होत असल्याने धरणातील पाणी लवकरच संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे.४धरणातील पाणी आरक्षित करण्यात यावे, या संदर्भात मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही पाठविलेले आहे.४या संदर्भात अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही.