शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

‘बिंदुसरा’तील पाणी गळती सुरूच

By admin | Updated: November 24, 2014 00:36 IST

सोमनाथ खताळ, बीड यावर्षी जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पाण्याची भीषण टंचाई. एवढी गंभीर परिस्थिीती उद्भवलेली असतानाही आजही पालीच्या

सोमनाथ खताळ, बीडयावर्षी जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पाण्याची भीषण टंचाई. एवढी गंभीर परिस्थिीती उद्भवलेली असतानाही आजही पालीच्या बिंदुसरा धरणातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे या पाण्याचा सर्रास शेतीसाठी वापर केला जात आहे. याकडे मात्र संबंधित विभाग ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.बीड शहराला तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र या धरणाची पाणीपातळीही सध्या जोत्याखाली आहे. त्यामुळे बीडकरांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेची पळापळ सुरू आहे. अशातच बिंदुसरा धरणातून राहिलेले पाणीही लवकरच संपण्याची भिती पालिकेने वर्तविली होती. मागील वर्षभरापासून धरणाच्या भिंतीला तीन भलेमोठे भगदाड पडले होते. यातून दररोज पंधरा लिटर पाणी वाया जात होते. याबाबत ‘लोकमत’मधून वृत्तही प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत काही वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून पाणीगळती थांबविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सध्या पुन्हा या धरणातून पाणी गळती सुरू झाली आहे. त्यामुळे झालेले काम निकृष्ठ झाले की, भिंत धोक्यात आली आहे, याचे उत्तर मात्र संबंधितांना देता येत नाही. धरणाच्या भिंतीचे भगदाड हे मुद्दामहून बुजविले जात नाही, असा आरोप मनविसेचे जिल्हाध्यक्ष शैलश जाधव यांनी केला आहे.लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता डी.एम.कोकणे म्हणाले, आम्ही धरणाचे भगदाड सिमेंट काँक्रीट करून बुजविलेले आहेत. भिंतीतून वाया जात असलेल्या पाण्याचा फारसा फरक पडत नाही. ही तांत्रिक समस्या आहे.बिंदूसरा धरणाची पातळी जोत्याखाली गेल्यामुळे शहराला माजलगावच्या धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे.४माजलगाव धरणातूनही सध्या मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा होत असल्याने धरणातील पाणी लवकरच संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे.४धरणातील पाणी आरक्षित करण्यात यावे, या संदर्भात मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही पाठविलेले आहे.४या संदर्भात अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही.