शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

पाण्यासाठी जनजागर

By admin | Updated: September 5, 2014 00:56 IST

सितम सोनवणे , लातूर येथील दीपज्योती नगर व श्री नगरातील नमो नमो गणेश मंडळाच्या वतीने पाण्यासाठी जन जागर करण्यात येत आहे़ या अंतर्गत जल पुनर्भरण, पाणी आडवा पाणी जिरवा,

सितम सोनवणे , लातूरयेथील दीपज्योती नगर व श्री नगरातील नमो नमो गणेश मंडळाच्या वतीने पाण्यासाठी जन जागर करण्यात येत आहे़ या अंतर्गत जल पुनर्भरण, पाणी आडवा पाणी जिरवा, नळाला तोट्या बसवा आणि पाण्याचे महत्व सांगणारा उपक्रम हाती घेतला आहे़ ‘पाण्यासाठी जागर’ या उपक्रमा अंतर्गत दररोज व्याख्यांनाचे अयोजन करण्यात येत आहे़लातूर शहरातील एमआयडीसी परिसराच्या जवळच असलेल्या दिपज्योती नगर व श्री नगर भागास नेहमीच पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत़ तसेच लातूरकरांना ही पाणी टंचाई जाणवत आहे़ या टंचाईच्या काळात नमो नमो गणेश मंडळाच्या वतीने जन प्रबोधन करण्याचा महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे़ या प्रबोधनामुळे जनतेस पाणी टंचाईच्या कारणांचा शोध व बोध करुन देण्यासाठी दररोज व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे़ शैलेश लाहोेटी, अ‍ॅड़ बळवंत जाधव, नगरसेविका वनिता काळे, नगरसेवक महादेव बरुरे, सपोउपनि़ वैजनाथ आडे यांनी पाणी आडवा पाणी जिरवा, पाणी वाचवा या या विषयावर मार्गदर्शन केले़ तसेच अनंत चथुर्थी पर्यत हा उपक्रम चालणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे़ हा उपक्रम गणेश उत्सवापर्यंतच नाहीतर पुर्ण वर्षभर राबवला जाणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे़ या अंतर्गत आपल्या परिसरात वृक्षारोपण, जल पुनर्भरण, नळाला तोट्या बसवणे या सर्व बाबींकडे मंडळाच्या वतीने लक्ष दिले जाणार आहे़ ज्यामुळे भविष्यात पाणी टंचाईची समस्या भेडसावणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे़ हे मंडळाचे पहिलेच वर्ष आहे़ दीपज्योती नगर, श्री नगर भागातील तरूणांनी यावर्षी गणेश मंडळाची स्थापना केली आहे़ पहिले वर्ष असल्याने जलपुनर्भरणाचा उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले़ पाणी टंचाई ही नागरी समस्या असून याकडे काळजीपूर्वक बघावे लागणार आहे़ लातूर शहर हे गेल्या तीन वर्षांपासून पाणीटंचाईच्या झळा सहन ्रकरीत आहे़ त्यामुळे शहरात जनजागर होणे गरजेचे आहे़