शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

५१ गावे, ९ वाड्यांत ५६ टँकरद्वारे पाणी

By admin | Updated: May 20, 2014 01:14 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात चालू वर्षात ५१ गावे व ९ वाड्यात ५६ टँकरने पाणी पुरवठा होत आहे. तर ८६ गावातील ११९ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

उस्मानाबाद : जिल्ह्यात चालू वर्षात ५१ गावे व ९ वाड्यात ५६ टँकरने पाणी पुरवठा होत आहे. तर ८६ गावातील ११९ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. भविष्यात पाणीटंचाई भासू नये, यासाठी पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात सोमवारी पालकमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई व रोजगार हमी योजनेची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, गोदावरी खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा आ. राहुल मोटे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, तुळजापूरच्या नगराध्यक्षा विद्याताई गंगणे, अतिरिक्त जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे, उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे व अरविंद लाटकर, जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तांगडे यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, न.प. चे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी संबंधितांचे विहीर अधिग्रहण, टँकरसाठी वापरण्यात आलेल्या डिझेलची प्रलंबित रक्कम संबंधितांना तात्काळ देण्यात यावी. टँकरची मागणी आल्यास तीन दिवसात मंजुरी द्यावी. शिंगोली व रुईभर प्रकल्पातील पाणी गळती थांबविण्यासाठी पाईपलाईनची तात्काळ दुरुस्ती करुन घ्यावी. तात्पुरत्या नळ योजनेतील परंडा तालुक्यातील डोंजा, सोनारी व विशेष दुरुस्ती पाणी पुरवठा योजनेतील खामसवाडी येथील मंजूर कामे तात्काळ सुरु करावी. अपूर्ण विंधन विहिरींच्या कामाचा आढावा घेवून सदर कामे तात्काळ सुरु करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. (प्रतिनिधी)