दिलीप सारडा ल्ल बदनापूरतालुक्यातील १५ गावांमध्ये प्रथमच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प होणार आहे. याबाबत पंचायत समिती गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यांचे आदेश मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. तालुक्यात प्रथमच हा प्रकल्प राबविण्यात येणार असुन या प्रकल्पा अंतर्गत संबंधित गावांत एक गांडुळखत निर्मिती शेड उभारण्यात येणार आहे. संपुर्ण गावातील कचरा या शेडमध्ये टाकण्यात येईल व त्याचे खत बनविण्यात येईल. तसेच गावातील नाल्यांचे व चार हौदांचे बांधकाम करून गावातील सांडपाणी मोठ्या नालीतून चार हौदात टप्प्या टप्प्याने घेण्यात येईल. नंतर स्वच्छ झालेले हे पाणी गावाच्या परसबागेसाठी वापरण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बदनापूर तालुक्यात १५ गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प
By admin | Updated: February 2, 2015 01:12 IST