शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

वालुरात डेंग्यूची साथ

By admin | Updated: September 14, 2014 23:38 IST

वालूर : सेलू तालुक्यातील वालूर येथे डेंग्यूची लागण झाली आहे़ त्यामुळे गावातील बालके व ज्येष्ठ नागरिक तापाच्या आजाराने त्रस्त झाले आहेत़

वालूर : सेलू तालुक्यातील वालूर येथे डेंग्यूची लागण झाली आहे़ त्यामुळे गावातील बालके व ज्येष्ठ नागरिक तापाच्या आजाराने त्रस्त झाले आहेत़ साथीचा आजार गावात फैलावत असतानाही आरोग्य विभाग झोपेत असल्याचे दिसून येत आहे़ वालूर गावामध्ये डासांचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे़ डासांची पैदास होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय आरोग्य विभागाकडून केले जात नाहीत़ त्यामुळे डासांमुळे ग्रामस्थांना मलेरिया, डेंग्यू आदी आजाराची लागण होत आहे़ याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीने लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबवावी व डास निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घेऊन डेंग्यू साथरोगावर नियंत्रण करता येईल, मात्र याचे सोयरसूतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे़ गेल्या आठ दिवसांपासून गावातील बालक व ज्येष्ठ नागरिक तापाने त्रस्त झाले आहेत़ त्यामुळे गावातील खाजगी व शासकीय रुग्णालयात रुग्णांची उपचारासाठी गर्दी होत आहे़ रुग्णांची संख्या वाढत असतानाही आरोग्य विभाग याकडे डोळेझाक करीत आहे़ एखाद्याचा जीव गेल्यानंतरच आरोग्य विभागास जाग येते की काय, असा सवाल केला जात आहे़ (वार्ताहर)औरंगाबाद येथे बालिकेवर उपचारवालूर येथील गौरी रमेश बिऱ्हाडे या बालिकेस आठ दिवसांपूर्वी ताप आली होती़ तिच्यावर वालूर व सेलू येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले़ परंतु, ताप कमी होत नसल्याने या बालिकेस औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तिला डेंग्यूचा आजार असल्याचे निष्पन्न झाले़ तिच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, सध्या तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे़ मोहीम नावालाचजिल्हा प्रशासनाच्या वतीने पावसाळ्यापूर्वी डासांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावोगाव मोहीम राबविली होती़ परंतु, ही मोहीम कागदोपत्रीच राबविली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे़