शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण खेळाडूंचाच मिळाला कबड्डीला आधार

By admin | Updated: July 15, 2014 00:57 IST

भास्कर लांडे, हिंगोली ग्लॅमर व व्यावसायिकतेचा ‘टच’ नसल्यामुळे क्रीडा संघटनेसहीत क्रीडा कार्यालय आणि प्रेक्षकांनी देखील कबड्डीकडे पाठ फिरविली;

भास्कर लांडे, हिंगोलीग्लॅमर व व्यावसायिकतेचा ‘टच’ नसल्यामुळे क्रीडा संघटनेसहीत क्रीडा कार्यालय आणि प्रेक्षकांनी देखील कबड्डीकडे पाठ फिरविली; परंतु अस्सल देशी खेळावर जीवापाड प्रेम करणाऱ्या ग्रामीण भागातील गुणवत्तापुर्ण खेळाडूचांच आधार मिळाल्याने हिंगोली जिल्ह्यात कबड्डी हा खेळ जिवंत राहिला आहे. आजघडीला कोणत्याही प्रकारे व्यवसायिकतेचा बाज नसताना केवळ प्रेमापोटी ग्रामीण भागात कबड्डी खेळली जाते; पण शहरी भागातून अधोगतीला लागलेल्या या खेळाच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.एकेकाळी हिंगोली जिल्ह्याने कबड्डीची पताका राज्यभरात फडकाविली होती. २००२ मध्ये राज्यात उपविजेता ठरल्याने हिंगोलीचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचले होते. तद्नंतर या खेळाचा विकास होण्याऐवजी अधोगती होत गेल्याने जिल्हा संघाला उल्लेखणीय कामगिरी करण्यात अपयश आले. परिणामी शहरी भागातून हा खेळ मागे पडत गेल्याने काही गावापुरताच आज कबड्डी हा खेळ सिमीत राहिलेला आढळतो. अशा विपरित परिस्थितीत जिल्ह्यातील दांडेगाव, खरबी, सावा, भांडेगाव, इसापूर रमना, पेडगाव, भांडेगाव, केंद्रा खु, मुर्तजापूर सावंगी, वाखरी, रामेश्वर तांडा वाईतील खेळाडूंनी हा खेळ जिवंतच ठेवला नसून तर तो फुलविला देखील आहे. ताकद आणि गुणवत्तेचा खजाना असलेल्या येथील खेळांडूकडे कोणाचेही लक्ष नाही. क्रीडा संघटना आणि खेळाडूंचा विसंवाद असताना क्रीडा कार्यालयाला त्याचे सोयरसुतक राहिलेले नाही. ओतप्रोत गुणवत्ता असलेल्या येथील खेळाडूंना करिअरकडे पाहण्याची दृष्टी नाही. तशी जाणीव करून देणाऱ्या प्रशिक्षकांचा अभाव असल्याचे राष्ट्रीय कबड्डीपटू समीर अमोदी यांनी सांगितले. केवळ यात्रा-जत्रा आणि राजकीय मंडळींचे वाढदिवस सोडले तर व्यावसायिक स्पर्धा, शालेय स्पर्धा, शासनस्तरावरील संधीची माहिती येथील खेळाडूंना नसते. केवळ खेळावर प्रेम आणि आनंदापोटी ग्रामीण भागात कबड्डी खेळली जाते. खेळता खेळता करिअरचे वय निघून गेलेले या खेळाडंूना कळत नाही. वर्षानुवर्ष असेच निघून जात असताना क्रीडा संघटना आणि क्रीडा कार्यालयाने या खेळांडूकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याची गरज असल्याचे क्रीडा शिक्षक कैलास शैव यांनी सांगितले. क्रीडा व युवक कल्याणचा फंड संघटना आणि खेळाडूंच्या विकासासाठी द्यावा, तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करावी, नियमित अंतराने खेळाडूंसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत, नवनवीन बाबीचा स्वीकार केल्याशिवाय कबड्डीचा विकास होणार नाही. सद्य:स्थितीत जिल्ह्यात उलट परिस्थीती असल्याने जिल्हा क्रीडा संकुलाची दयनीय अवस्था झालेली आहे. त्यातच दरवर्षी येणारे अनुदान व्यायाम शाळेला देवून क्रीडा कार्यालय मोकळे होते. दुसरीकडे अगणित खेळांचा समावेश शालेय क्रीडा प्रकारात केल्याने कबड्डीकडे पहायला शिक्षकांना वेळ नाही. जरी वेळ असला तरी वसमत सोडले तर एकाही तालुक्याच्या ठिकाणी कबड्डीचे मैदान नाही. एकदाच सर्व संकटे ओढवल्याने कबड्डीची अवस्था बिकट झाली. परिणामी बोटावर मोजता येतील एवढी गावांनी कबड्डी खेळ जिवंत ठेवला. लवकर या भागाकडे पाहिले नसल्यास कबड्डी जिल्ह्यातून इतिहास जमा होण्याची भीती आहे. नव्या बदलांचा अंगीकार जिल्ह्यातील कबड्डी मागे पडू नये, म्हणून नव्या बदलांचा अंगीकार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानुरूप खेळाडूंच्या सरावासाठी दोन मॅट उपलब्ध झाल्या आहेत. हिंगोलीतील आदर्श महाविद्यालयात असलेल्या या मॅटचा वापर स्पर्धांमध्ये केला जातो. जिल्हा संघटनेकडून खेळाडूंसाठी ७ दिवसांचे सराव शिबीर घेण्यात येते. वर्षभरात विविध स्पर्धा घेण्यात येतात. जिल्ह्यातील संघही परजिल्ह्यात तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळासाठी पाठविले जातात. गतवर्षी २ खेळाडूंनी राज्य पातळीवर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले. दुसरीकडे कुमार गटाने राष्ट्रीय पातळीवर उपविजेते पदापर्यंत मजल मारली होती. पाच वर्षांपूर्वी आयपीएलच्या धरतीवर जिल्ह्यात कबड्डी प्रिमीयर लीगचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सध्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा सत्कार दरवर्षी केला जातो. खेळाडूंना नवीन स्पर्धांची माहिती, संधी दिली जाते. म्हणून आजही जिल्ह्यात कबड्डी जीवंत असून अधिक विकासासाठी संघटनेची धडपड चालू असते, असे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माजी खा. अ‍ॅड. शिवाजीराव माने यांनी सांगितले.