शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

ग्रामीण खेळाडूंचाच मिळाला कबड्डीला आधार

By admin | Updated: July 15, 2014 00:57 IST

भास्कर लांडे, हिंगोली ग्लॅमर व व्यावसायिकतेचा ‘टच’ नसल्यामुळे क्रीडा संघटनेसहीत क्रीडा कार्यालय आणि प्रेक्षकांनी देखील कबड्डीकडे पाठ फिरविली;

भास्कर लांडे, हिंगोलीग्लॅमर व व्यावसायिकतेचा ‘टच’ नसल्यामुळे क्रीडा संघटनेसहीत क्रीडा कार्यालय आणि प्रेक्षकांनी देखील कबड्डीकडे पाठ फिरविली; परंतु अस्सल देशी खेळावर जीवापाड प्रेम करणाऱ्या ग्रामीण भागातील गुणवत्तापुर्ण खेळाडूचांच आधार मिळाल्याने हिंगोली जिल्ह्यात कबड्डी हा खेळ जिवंत राहिला आहे. आजघडीला कोणत्याही प्रकारे व्यवसायिकतेचा बाज नसताना केवळ प्रेमापोटी ग्रामीण भागात कबड्डी खेळली जाते; पण शहरी भागातून अधोगतीला लागलेल्या या खेळाच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.एकेकाळी हिंगोली जिल्ह्याने कबड्डीची पताका राज्यभरात फडकाविली होती. २००२ मध्ये राज्यात उपविजेता ठरल्याने हिंगोलीचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचले होते. तद्नंतर या खेळाचा विकास होण्याऐवजी अधोगती होत गेल्याने जिल्हा संघाला उल्लेखणीय कामगिरी करण्यात अपयश आले. परिणामी शहरी भागातून हा खेळ मागे पडत गेल्याने काही गावापुरताच आज कबड्डी हा खेळ सिमीत राहिलेला आढळतो. अशा विपरित परिस्थितीत जिल्ह्यातील दांडेगाव, खरबी, सावा, भांडेगाव, इसापूर रमना, पेडगाव, भांडेगाव, केंद्रा खु, मुर्तजापूर सावंगी, वाखरी, रामेश्वर तांडा वाईतील खेळाडूंनी हा खेळ जिवंतच ठेवला नसून तर तो फुलविला देखील आहे. ताकद आणि गुणवत्तेचा खजाना असलेल्या येथील खेळांडूकडे कोणाचेही लक्ष नाही. क्रीडा संघटना आणि खेळाडूंचा विसंवाद असताना क्रीडा कार्यालयाला त्याचे सोयरसुतक राहिलेले नाही. ओतप्रोत गुणवत्ता असलेल्या येथील खेळाडूंना करिअरकडे पाहण्याची दृष्टी नाही. तशी जाणीव करून देणाऱ्या प्रशिक्षकांचा अभाव असल्याचे राष्ट्रीय कबड्डीपटू समीर अमोदी यांनी सांगितले. केवळ यात्रा-जत्रा आणि राजकीय मंडळींचे वाढदिवस सोडले तर व्यावसायिक स्पर्धा, शालेय स्पर्धा, शासनस्तरावरील संधीची माहिती येथील खेळाडूंना नसते. केवळ खेळावर प्रेम आणि आनंदापोटी ग्रामीण भागात कबड्डी खेळली जाते. खेळता खेळता करिअरचे वय निघून गेलेले या खेळाडंूना कळत नाही. वर्षानुवर्ष असेच निघून जात असताना क्रीडा संघटना आणि क्रीडा कार्यालयाने या खेळांडूकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याची गरज असल्याचे क्रीडा शिक्षक कैलास शैव यांनी सांगितले. क्रीडा व युवक कल्याणचा फंड संघटना आणि खेळाडूंच्या विकासासाठी द्यावा, तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करावी, नियमित अंतराने खेळाडूंसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत, नवनवीन बाबीचा स्वीकार केल्याशिवाय कबड्डीचा विकास होणार नाही. सद्य:स्थितीत जिल्ह्यात उलट परिस्थीती असल्याने जिल्हा क्रीडा संकुलाची दयनीय अवस्था झालेली आहे. त्यातच दरवर्षी येणारे अनुदान व्यायाम शाळेला देवून क्रीडा कार्यालय मोकळे होते. दुसरीकडे अगणित खेळांचा समावेश शालेय क्रीडा प्रकारात केल्याने कबड्डीकडे पहायला शिक्षकांना वेळ नाही. जरी वेळ असला तरी वसमत सोडले तर एकाही तालुक्याच्या ठिकाणी कबड्डीचे मैदान नाही. एकदाच सर्व संकटे ओढवल्याने कबड्डीची अवस्था बिकट झाली. परिणामी बोटावर मोजता येतील एवढी गावांनी कबड्डी खेळ जिवंत ठेवला. लवकर या भागाकडे पाहिले नसल्यास कबड्डी जिल्ह्यातून इतिहास जमा होण्याची भीती आहे. नव्या बदलांचा अंगीकार जिल्ह्यातील कबड्डी मागे पडू नये, म्हणून नव्या बदलांचा अंगीकार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानुरूप खेळाडूंच्या सरावासाठी दोन मॅट उपलब्ध झाल्या आहेत. हिंगोलीतील आदर्श महाविद्यालयात असलेल्या या मॅटचा वापर स्पर्धांमध्ये केला जातो. जिल्हा संघटनेकडून खेळाडूंसाठी ७ दिवसांचे सराव शिबीर घेण्यात येते. वर्षभरात विविध स्पर्धा घेण्यात येतात. जिल्ह्यातील संघही परजिल्ह्यात तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळासाठी पाठविले जातात. गतवर्षी २ खेळाडूंनी राज्य पातळीवर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले. दुसरीकडे कुमार गटाने राष्ट्रीय पातळीवर उपविजेते पदापर्यंत मजल मारली होती. पाच वर्षांपूर्वी आयपीएलच्या धरतीवर जिल्ह्यात कबड्डी प्रिमीयर लीगचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सध्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा सत्कार दरवर्षी केला जातो. खेळाडूंना नवीन स्पर्धांची माहिती, संधी दिली जाते. म्हणून आजही जिल्ह्यात कबड्डी जीवंत असून अधिक विकासासाठी संघटनेची धडपड चालू असते, असे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माजी खा. अ‍ॅड. शिवाजीराव माने यांनी सांगितले.