शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पॅकहाऊसमुळे भाजीपाला,फळपिकांना सुरक्षितता

By admin | Updated: July 18, 2014 01:51 IST

रामेश्वर काकडे , नांदेड राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातंर्गत शेतकऱ्यांच्या अर्थिक उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने पॅकहाऊसची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

रामेश्वर काकडे , नांदेडराष्ट्रीय फलोत्पादन अभियानातंर्गत शेतकऱ्यांच्या अर्थिक उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने पॅकहाऊसची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला नांदेड जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद असून गत नऊ वर्षात ११३ लाभार्थ्यांनी पॅकहाऊसची उभारणी केली आहे. शेतकऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेता २०१४-१५ या वर्षात २५ पॅकपाऊस उभारणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून फळे व भाजीपाला उत्पादकांना पॅकहाऊस आधारवड ठरणार आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियन योजना २००५-६ या वर्षापासून कार्यान्वित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली फळे व भाजीपाला सुरक्षीत ठेवणे फलोत्पादनाच्या मूल्यवर्धीमध्ये वाढ करणे, तसेच त्यांच्या अर्थिक उत्पादनात वाढ करण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पॅकहाऊससाठी पूर्वी शेतकऱ्यांना ६२५०० रुपये अनुदान म्हणून दिले जात होते. मात्र २०१०-११ मध्ये त्यात वाढ करुन १ लाख ५० हजार रुपये ऐवढे केले. आजघडीला बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये भरमसाठ वाढ झाल्यामुळे २०१४-१५ या वर्षापासून २ लाख रुपये अनुदान मिळणार आहे.शेतकऱ्यांना २० बाय ३० किंवा १५ बाय ४० या आकाराच्या जागेत बांधकाम करावे लागते. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या भाजीपाला, फळांना स्वच्छ धूवून त्याची ग्रेडींग, पॅकींग जागेवरच करता येत असल्यामुळे भाजीपाला, फळांच्या गुणवत्तेतही वाढ होते.जिल्ह्यात २००५ ते २०१० या कालावधीत एकूण ४५ पॅकहाऊसची उभारणी करण्यात आली. तर २०११-१२ या वर्षात ४६, २०१२-१३ मध्ये २२ याप्रमाणे एकूण ११३ पॅकहाऊसचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. शेतकऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेता २०१४-१५ या वर्षामध्ये जिल्ह्यात २५ पॅकहाऊस उभारण्यात येणार आहेत.नांदेड, मुदखेड, हदगांव, धर्माबाद, देगलूर, किनवट, अर्धापूर आदि तालुक्यात फळबागा असून भाजीपाल्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पॅकहाऊससाठी किचकट प्रक्रिया पॅकहाऊसचा शेतकऱ्यांना लाभ घ्यावयाचा असल्यास अतिशय किचकट प्रक्रिया असल्यामुळे अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेणे टाळतात. शेतकऱ्यांकडे स्वत:ची शेतजमीन असावी, प्रस्तावासाठी सातबारा व आठ अ चा उतारा जोडावा लागतो. फळबाग लागवड प्रमाणपत्र, अंदाजपत्रक, खर्चाचे अंदाजपत्रक, बांधकाम अंदाजपत्रक, १०० रुपयाच्या बाँडवर शपथपत्र, बँकेचे कर्जमंजुरी पत्र, जिल्हा फलोत्पादन समितीचे शिफारसपत्र आदी कागपत्रे द्यावी लागतात. या किचकट प्रक्रियेमुळे अनेक शेतकरी पॅकहाऊस घेणे टाळत आहेत. यामुळे आजपर्यंत जिल्ह्यातील अनेक शेतकरी लाभापासून दूर राहिले आहेत.