शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

पॅकहाऊसमुळे भाजीपाला,फळपिकांना सुरक्षितता

By admin | Updated: July 18, 2014 01:51 IST

रामेश्वर काकडे , नांदेड राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातंर्गत शेतकऱ्यांच्या अर्थिक उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने पॅकहाऊसची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

रामेश्वर काकडे , नांदेडराष्ट्रीय फलोत्पादन अभियानातंर्गत शेतकऱ्यांच्या अर्थिक उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने पॅकहाऊसची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला नांदेड जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद असून गत नऊ वर्षात ११३ लाभार्थ्यांनी पॅकहाऊसची उभारणी केली आहे. शेतकऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेता २०१४-१५ या वर्षात २५ पॅकपाऊस उभारणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून फळे व भाजीपाला उत्पादकांना पॅकहाऊस आधारवड ठरणार आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियन योजना २००५-६ या वर्षापासून कार्यान्वित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली फळे व भाजीपाला सुरक्षीत ठेवणे फलोत्पादनाच्या मूल्यवर्धीमध्ये वाढ करणे, तसेच त्यांच्या अर्थिक उत्पादनात वाढ करण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पॅकहाऊससाठी पूर्वी शेतकऱ्यांना ६२५०० रुपये अनुदान म्हणून दिले जात होते. मात्र २०१०-११ मध्ये त्यात वाढ करुन १ लाख ५० हजार रुपये ऐवढे केले. आजघडीला बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये भरमसाठ वाढ झाल्यामुळे २०१४-१५ या वर्षापासून २ लाख रुपये अनुदान मिळणार आहे.शेतकऱ्यांना २० बाय ३० किंवा १५ बाय ४० या आकाराच्या जागेत बांधकाम करावे लागते. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या भाजीपाला, फळांना स्वच्छ धूवून त्याची ग्रेडींग, पॅकींग जागेवरच करता येत असल्यामुळे भाजीपाला, फळांच्या गुणवत्तेतही वाढ होते.जिल्ह्यात २००५ ते २०१० या कालावधीत एकूण ४५ पॅकहाऊसची उभारणी करण्यात आली. तर २०११-१२ या वर्षात ४६, २०१२-१३ मध्ये २२ याप्रमाणे एकूण ११३ पॅकहाऊसचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. शेतकऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेता २०१४-१५ या वर्षामध्ये जिल्ह्यात २५ पॅकहाऊस उभारण्यात येणार आहेत.नांदेड, मुदखेड, हदगांव, धर्माबाद, देगलूर, किनवट, अर्धापूर आदि तालुक्यात फळबागा असून भाजीपाल्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पॅकहाऊससाठी किचकट प्रक्रिया पॅकहाऊसचा शेतकऱ्यांना लाभ घ्यावयाचा असल्यास अतिशय किचकट प्रक्रिया असल्यामुळे अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेणे टाळतात. शेतकऱ्यांकडे स्वत:ची शेतजमीन असावी, प्रस्तावासाठी सातबारा व आठ अ चा उतारा जोडावा लागतो. फळबाग लागवड प्रमाणपत्र, अंदाजपत्रक, खर्चाचे अंदाजपत्रक, बांधकाम अंदाजपत्रक, १०० रुपयाच्या बाँडवर शपथपत्र, बँकेचे कर्जमंजुरी पत्र, जिल्हा फलोत्पादन समितीचे शिफारसपत्र आदी कागपत्रे द्यावी लागतात. या किचकट प्रक्रियेमुळे अनेक शेतकरी पॅकहाऊस घेणे टाळत आहेत. यामुळे आजपर्यंत जिल्ह्यातील अनेक शेतकरी लाभापासून दूर राहिले आहेत.