शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

पॅकहाऊसमुळे भाजीपाला,फळपिकांना सुरक्षितता

By admin | Updated: July 18, 2014 01:51 IST

रामेश्वर काकडे , नांदेड राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातंर्गत शेतकऱ्यांच्या अर्थिक उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने पॅकहाऊसची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

रामेश्वर काकडे , नांदेडराष्ट्रीय फलोत्पादन अभियानातंर्गत शेतकऱ्यांच्या अर्थिक उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने पॅकहाऊसची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला नांदेड जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद असून गत नऊ वर्षात ११३ लाभार्थ्यांनी पॅकहाऊसची उभारणी केली आहे. शेतकऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेता २०१४-१५ या वर्षात २५ पॅकपाऊस उभारणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून फळे व भाजीपाला उत्पादकांना पॅकहाऊस आधारवड ठरणार आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियन योजना २००५-६ या वर्षापासून कार्यान्वित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली फळे व भाजीपाला सुरक्षीत ठेवणे फलोत्पादनाच्या मूल्यवर्धीमध्ये वाढ करणे, तसेच त्यांच्या अर्थिक उत्पादनात वाढ करण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पॅकहाऊससाठी पूर्वी शेतकऱ्यांना ६२५०० रुपये अनुदान म्हणून दिले जात होते. मात्र २०१०-११ मध्ये त्यात वाढ करुन १ लाख ५० हजार रुपये ऐवढे केले. आजघडीला बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये भरमसाठ वाढ झाल्यामुळे २०१४-१५ या वर्षापासून २ लाख रुपये अनुदान मिळणार आहे.शेतकऱ्यांना २० बाय ३० किंवा १५ बाय ४० या आकाराच्या जागेत बांधकाम करावे लागते. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या भाजीपाला, फळांना स्वच्छ धूवून त्याची ग्रेडींग, पॅकींग जागेवरच करता येत असल्यामुळे भाजीपाला, फळांच्या गुणवत्तेतही वाढ होते.जिल्ह्यात २००५ ते २०१० या कालावधीत एकूण ४५ पॅकहाऊसची उभारणी करण्यात आली. तर २०११-१२ या वर्षात ४६, २०१२-१३ मध्ये २२ याप्रमाणे एकूण ११३ पॅकहाऊसचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. शेतकऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेता २०१४-१५ या वर्षामध्ये जिल्ह्यात २५ पॅकहाऊस उभारण्यात येणार आहेत.नांदेड, मुदखेड, हदगांव, धर्माबाद, देगलूर, किनवट, अर्धापूर आदि तालुक्यात फळबागा असून भाजीपाल्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पॅकहाऊससाठी किचकट प्रक्रिया पॅकहाऊसचा शेतकऱ्यांना लाभ घ्यावयाचा असल्यास अतिशय किचकट प्रक्रिया असल्यामुळे अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेणे टाळतात. शेतकऱ्यांकडे स्वत:ची शेतजमीन असावी, प्रस्तावासाठी सातबारा व आठ अ चा उतारा जोडावा लागतो. फळबाग लागवड प्रमाणपत्र, अंदाजपत्रक, खर्चाचे अंदाजपत्रक, बांधकाम अंदाजपत्रक, १०० रुपयाच्या बाँडवर शपथपत्र, बँकेचे कर्जमंजुरी पत्र, जिल्हा फलोत्पादन समितीचे शिफारसपत्र आदी कागपत्रे द्यावी लागतात. या किचकट प्रक्रियेमुळे अनेक शेतकरी पॅकहाऊस घेणे टाळत आहेत. यामुळे आजपर्यंत जिल्ह्यातील अनेक शेतकरी लाभापासून दूर राहिले आहेत.