शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

जलकुंभाखाली वॉल्व्हची गळती

By admin | Updated: August 3, 2014 00:58 IST

मानवत : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाखालच्या वॉल्व्हची गळती झाली आहे. या गळतीने टाकीतील अंदाजे चार लाख लिटर पाण्याची नासाडी झाली.

मानवत : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाखालच्या वॉल्व्हची गळती झाली आहे. या गळतीने टाकीतील अंदाजे चार लाख लिटर पाण्याची नासाडी झाली. कर्मचाऱ्यांच्या गाफीलपणामुळे हा प्रकार २ आॅगस्टच्या पहाटे अडीच्या सुमारास घडला. मानवतला पाणीपुरवठा करणारा जलशुद्धीकरण प्रकल्पावरील जलकुंभ ११ लक्ष लिटरचा आहे. हा जलकुंभ शहरात असणाऱ्या सर्वच जलकुंभापेक्षा उंचीवर आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्पातून शुद्ध झालेले पाणी याच जलकुंभामध्ये साठविल्या जाते आणि त्यानंतर शहरातील इतर जलकुंभामध्ये वितरित करण्यात येते. १ आॅगस्ट रोजी जलशुद्धीकरण प्रकल्पातून शुद्ध झालेले पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पातील जलकुंभामध्ये साठविण्यात आले. हे पाणी जलकुंभामध्ये सहा मीटर म्हणजे सुमारे ८ लक्ष लिटर एवढे होते. जलकुंंभाखालच्या वॉल्व्हमधून सातत्याने पाणी गळती होत असल्याने नगराध्यक्षांनी जलकुंभाच्या खाली १ आॅगस्ट रोजी १ लाख १२ हजार ५०० रुपयांचा नवीन वॉल्व्ह टाकला. परंतु याची फिटिंग योग्य प्रकारे झाली नाही. न.प.च्या पाणीपुरवठा विभागाने या वॉल्व्हची खरे तर जलकुंभात पाणी साठवित असताना चाचणी घेणे गरजेचे होते. परंतु अशी कोणतीही चाचणी पाणीपुरवठा विभागाने घेतली नाही. परिणामी जलकुंभात ८ लक्ष पाणी साठल्यानंतर पाण्याचा दाब वॉलवर पडला आणि नव्यानेच बसविण्यात आलेल्या वॉल्व्हमधून पाईप एक इंच बाजूला सरकला. परिणामी पाणी मोठ्या प्रमाणावर गळती झाले. परंतु याचा अंदाज गाफील कर्मचाऱ्यांना येईपर्यंत सुमारे ४ लाख लिटरपेक्षा अधिक पाणी वाहून गेले होते. जलकुंभावरील कर्मचाऱ्यांना जाग आल्यानंतर उर्वरित पाणी आठवडी बाजारातील जलकुंभात साठविण्यासाठी सोडले. परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता. मानवतला पाणीपुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्पावरील जलकुंभ भरण्यासाठी ९ तासाचा अवधी लागतो. सदरील जलकुंभ साधारणपणे ७५ टक्के भरलेला असताना गळतीमुळे रिकामा झाला आणि नागरिकांची तहानही भागली नाही. नागरिक मात्र आपल्याला पाणी येणार, या आशेने नळाकडे पाहतच राहिले. जलकुंभातील पाणी गळती झाल्यानंतर उपनगराध्यक्ष बाबूराव हळनोर, डॉ. अंकुश लाड व इतर नगरसेवकांनी येऊन वॉल्व्हची पाहणी केली आणि तत्काळ वॉल्व्हची दुरुस्ती करून जलकुंभाचे पुनर्रभरण चालू केले. नवीन टाकलेल्या वॉल्व्हची पाणीपुरवठा विभागाने चाचणी घेतली नाही आणि त्याचा परिणाम मात्र शहरवासियांना पाण्याच्या भटकंतीने सहन करावा लागला. (वार्ताहर)पाण्याचा साचला डोह जलकुंभातील पाणी गळती झाल्यानंतर त्याचा वेग एवढा होता की, जलकुंभाच्या बाजूला असणारी माती चक्क वाहून जाऊन तिचा आकार नालीसारखा झाला. तर शासकीय मुलांच्या वसतिगृहाकडे मोठमोठे असणारे खड्डे या पाण्यामुळे तुडुंब भरून जाऊन या परिसराला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. या ठिकाणाहून शासकीय वसतीगृहातील मुले शहरातील शाळा, महाविद्यालयात ये-जा करतात. त्यांचा रस्ता या पाण्यामुळे बंद झालाच शिवाय दिवसा म्हशींंनीही या पाण्यात शिरून स्नाचा आनंद घेतला. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही काळापर्यंत मिटला आहे.