शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभाखाली वॉल्व्हची गळती

By admin | Updated: August 3, 2014 00:58 IST

मानवत : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाखालच्या वॉल्व्हची गळती झाली आहे. या गळतीने टाकीतील अंदाजे चार लाख लिटर पाण्याची नासाडी झाली.

मानवत : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाखालच्या वॉल्व्हची गळती झाली आहे. या गळतीने टाकीतील अंदाजे चार लाख लिटर पाण्याची नासाडी झाली. कर्मचाऱ्यांच्या गाफीलपणामुळे हा प्रकार २ आॅगस्टच्या पहाटे अडीच्या सुमारास घडला. मानवतला पाणीपुरवठा करणारा जलशुद्धीकरण प्रकल्पावरील जलकुंभ ११ लक्ष लिटरचा आहे. हा जलकुंभ शहरात असणाऱ्या सर्वच जलकुंभापेक्षा उंचीवर आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्पातून शुद्ध झालेले पाणी याच जलकुंभामध्ये साठविल्या जाते आणि त्यानंतर शहरातील इतर जलकुंभामध्ये वितरित करण्यात येते. १ आॅगस्ट रोजी जलशुद्धीकरण प्रकल्पातून शुद्ध झालेले पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पातील जलकुंभामध्ये साठविण्यात आले. हे पाणी जलकुंभामध्ये सहा मीटर म्हणजे सुमारे ८ लक्ष लिटर एवढे होते. जलकुंंभाखालच्या वॉल्व्हमधून सातत्याने पाणी गळती होत असल्याने नगराध्यक्षांनी जलकुंभाच्या खाली १ आॅगस्ट रोजी १ लाख १२ हजार ५०० रुपयांचा नवीन वॉल्व्ह टाकला. परंतु याची फिटिंग योग्य प्रकारे झाली नाही. न.प.च्या पाणीपुरवठा विभागाने या वॉल्व्हची खरे तर जलकुंभात पाणी साठवित असताना चाचणी घेणे गरजेचे होते. परंतु अशी कोणतीही चाचणी पाणीपुरवठा विभागाने घेतली नाही. परिणामी जलकुंभात ८ लक्ष पाणी साठल्यानंतर पाण्याचा दाब वॉलवर पडला आणि नव्यानेच बसविण्यात आलेल्या वॉल्व्हमधून पाईप एक इंच बाजूला सरकला. परिणामी पाणी मोठ्या प्रमाणावर गळती झाले. परंतु याचा अंदाज गाफील कर्मचाऱ्यांना येईपर्यंत सुमारे ४ लाख लिटरपेक्षा अधिक पाणी वाहून गेले होते. जलकुंभावरील कर्मचाऱ्यांना जाग आल्यानंतर उर्वरित पाणी आठवडी बाजारातील जलकुंभात साठविण्यासाठी सोडले. परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता. मानवतला पाणीपुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्पावरील जलकुंभ भरण्यासाठी ९ तासाचा अवधी लागतो. सदरील जलकुंभ साधारणपणे ७५ टक्के भरलेला असताना गळतीमुळे रिकामा झाला आणि नागरिकांची तहानही भागली नाही. नागरिक मात्र आपल्याला पाणी येणार, या आशेने नळाकडे पाहतच राहिले. जलकुंभातील पाणी गळती झाल्यानंतर उपनगराध्यक्ष बाबूराव हळनोर, डॉ. अंकुश लाड व इतर नगरसेवकांनी येऊन वॉल्व्हची पाहणी केली आणि तत्काळ वॉल्व्हची दुरुस्ती करून जलकुंभाचे पुनर्रभरण चालू केले. नवीन टाकलेल्या वॉल्व्हची पाणीपुरवठा विभागाने चाचणी घेतली नाही आणि त्याचा परिणाम मात्र शहरवासियांना पाण्याच्या भटकंतीने सहन करावा लागला. (वार्ताहर)पाण्याचा साचला डोह जलकुंभातील पाणी गळती झाल्यानंतर त्याचा वेग एवढा होता की, जलकुंभाच्या बाजूला असणारी माती चक्क वाहून जाऊन तिचा आकार नालीसारखा झाला. तर शासकीय मुलांच्या वसतिगृहाकडे मोठमोठे असणारे खड्डे या पाण्यामुळे तुडुंब भरून जाऊन या परिसराला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. या ठिकाणाहून शासकीय वसतीगृहातील मुले शहरातील शाळा, महाविद्यालयात ये-जा करतात. त्यांचा रस्ता या पाण्यामुळे बंद झालाच शिवाय दिवसा म्हशींंनीही या पाण्यात शिरून स्नाचा आनंद घेतला. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही काळापर्यंत मिटला आहे.