लातूर : संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र योजनेंतर्गत कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेऊन औसा तालुक्यातील दोन ग्रामसेवकांवर गुरुवारी निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे़ तत्पूर्वी त्यांना नोटिस देऊनही त्याकडे कानाडोळा केल्याने निलंबनाच्या कार्यवाहीचे पाऊल उचलावे लागल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी दिली़ संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) योजनेंतर्गत सर्व ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड अद्ययावत करुन त्यांच्या नोंदी संगणकांवर घेतल्या जात आहेत़ या कामाला गती देण्याची सूचना ग्रामसेवकांना करण्यात आली. परंतु, पं.स. अंतर्गत कार्यरत असलेले धानोरा व गोंद्रीचे ग्रामसेवक एम़आऱथळकरी व लोदग्याचे ग्रामसेवक एम़एस़ बनसुडे यांनी काम गांभिर्याने घेतले नाही़ त्यांच्या ग्रा.पं.तील नोंदी संगणकीकृत करण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरु होते़ यासंदर्भात ग्रामसेवक थळकरी व बनसुडे यांना जिल्हा परिषदेच्या वतीने १४ मे रोजी लेखी नोटिस जारी करुन १५ दिवसांच्या आत नोटिसीचे उत्तर देण्यास सूचित करण्यात आले होते़ मात्र या दोघांनीही नोटिसीकडे कानाडोळा करुन उत्तर देणे टाळले़ शिवाय संग्रामच्या कामातही प्रगती दर्शविली नाही़ जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी गुरुवारी औसा पंचायत समितीला भेट देऊन संग्रामच्या कामाचा आढावा घेतला असता त्यात थळकरी व बनसुडे यांचे कार्य समाधानकारक नसल्याचे दिसून आले़ त्यामुळे त्यांनी या दोघांवरही निलंबनाची कारवाई केली़ (प्रतिनिधी)
दोन ग्रामसेवकांवर निलंबनाची कुºहाड
By admin | Updated: May 30, 2014 00:24 IST