शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

बारा दिवसांचे युद्ध घनघोरच!

By admin | Updated: October 3, 2014 00:31 IST

जालना : विधानसभा निवडणुकीतील दसऱ्यापासून बारा दिवसांचे युद्ध घनघोरच होणार असून

जालना : विधानसभा निवडणुकीतील दसऱ्यापासून बारा दिवसांचे युद्ध घनघोरच होणार असून उमेदवारांसमोर प्रचाराची मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. वातावरण पेटविण्याचा प्रयत्न सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून होत आहे. आज दसरा. उद्या सकाळपासून विधानसभेचे युद्ध चांगलेच रंगणार आहे. जिल्ह्यात पाचही मतदारसंघांमधील राजकीय लढतीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. युती आणि आघाडीची ताटातूट झाल्याने शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या चारही प्रमुख पक्षांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी व अन्य घटक पक्षांमधील उमेदवार जोरदार प्रचाराला लागले आहेत. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत प्रचारदौरे सुरू आहेत. मतदारांच्या गाठीभेटी, बैठका, कॉर्नर सभा, छोटेखानी व मोठया सभा, सेलिब्रिटींच्या सभा यात सर्वजण दंग झाले आहेत. व्यवस्थापनाची कामेही खूप असल्याने प्रत्येक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्तेही त्यात व्यस्त आहेत. विशेषत: वाहन, कार्यालय, साहित्य, जेवणावळी, बुथनिहाय तयारी यामध्ये अधिक वेळ जात आहे. या सर्व बाबींमध्ये उमेदवारांचीही संमती घ्यावी लागत असल्याने सभा, बैठका याशिवाय प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत सकाळ, सायंकाळ चर्चेसाठीचा वेळ उमेदवारांना द्यावा लागत आहे. निवडणुकीतील वेळ अल्प आहे. त्यामुळे सगळी सोंगे करावी लागत आहेत. उमेदवारांना झोपेसाठी प्रत्यक्षात दोन-चार तासांचाच अवधी मिळत आहे. पहाटेपासून शहर व ग्रामीण भागात प्रचार दौऱ्यावर जावे लागत असल्याने अन्नपाणीही वेळेवर मिळेल किंवा नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागातील प्रचारावर प्रमुख उमेदवार जोर देत आहेत. बहुतांश उमेदवारांची पहिली फेरी पूर्ण झाली असून शहरात विविध भागात कॉर्नर बैठकाही घेण्यात येत आहेत.