शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

जनजागृतीतून क्षयरोग निर्मूलन..!

By admin | Updated: March 24, 2017 00:33 IST

जालना : प्रभावी जनजागृती सोबतच योग्य आणि वेळेत उपचार यामुळे क्षयरोग निर्मूलनाचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे.

जालना : प्रभावी जनजागृती सोबतच योग्य आणि वेळेत उपचार यामुळे क्षयरोग निर्मूलनाचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. क्षयरोग हा मायकोबक्टेरियम नावाच्या जीवानूमुळे होतो. हा आजार माणसाला फार पूवीर्पासून माहीत असून प्रचीन काळी त्याला राजयक्ष्मा या नावाने संबोधले जायचे. क्षयरोग प्रामुख्याने फुफुसांना होत असला तरी तो शरीराच्या लसीकाग्रंथी, मेंदू, हाडे, मूत्रपिंड, यासारख्या अवयवांनासुद्धा होऊ शकतो. क्षयरोगाचा प्रसार हवेद्वारे होतो. जेव्हा फुफुसाच्या क्षयरोगाणे आजारी असणारी व्यक्ति शिकते किंवा खोकते तेव्हा क्षयरोगच्या जिवाणूंचा प्रसार होतो. डॉ. रॉबर्ट कॉच यांनी या जीवाणूंचा शोध लावला. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. योगेश सुरळकर म्हणाले, क्षयरोगावर डॉटस प्रणालीचा वापर केल्यास क्षयरोग शंभर टक्के बरा होतो. सहा ते आठ महिन्यांचा पूर्ण कोर्स न झाल्यास क्षयरोग बरा होण्या उशिर लागतो. या रोगींनी डॉटस उपचार पद्धतीचा पूर्ण वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.२०१६ मध्ये १३५२ क्षयरोगी आढळले. त्यांच्यावर डॉटसचा उपचार करण्यात आला. यातील सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक रूग्ण ठणठणीत झाले आहेत. डॉ. राजेश सेठिया यांनी क्षयरोग दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्धपत्रक काढून क्षयरोगाबाबत मार्गदर्शन केले. योग्य उपचार आणि काय काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचे डॉ. सेठिया यांनी सांगितले. हा रोग शंभर टक्के बरा होऊ शकतो.