शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पर्यटन राजधानी समस्यांच्या गर्तेत

By admin | Updated: November 27, 2014 01:10 IST

औरंगाबाद : अजिंठा, वेरूळ लेण्यांचा जागतिक वारसा, सोबतीला दक्षिणेचा ताज, पाणचक्की आणि अनेक लहान-मोठी पर्यटन स्थळे,

औरंगाबाद : अजिंठा, वेरूळ लेण्यांचा जागतिक वारसा, सोबतीला दक्षिणेचा ताज, पाणचक्की आणि अनेक लहान-मोठी पर्यटन स्थळे, धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, पैठणचे संतपीठ आणि वाळूज, शेंद्र्यासह आता होऊ घातलेल्या दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमुळे औद्योगिकनगरी म्हणून नावलौकिकास येत असलेले औरंगाबाद महानगर मात्र दर्जेदार मूलभूत सुविधांच्या अभावामुळे समस्यांच्या खोल-खोल गर्तेत रुतत चालले आहे. शहर धुरा वाहणारी महापालिका आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्यामुळे विकासकामे ठप्प झाली आहेत. रस्ते खड्डेमय आहेत. पाण्याची समस्या गंभीर होत आहे. अतिक्रमणे वाढत आहेत. शहर सौंदर्यीकरणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. गुंठेवारी वसाहतीच्या समस्या वाढत आहेत. ही कामे मार्गी लावण्यासाठी पालिकेला १ हजार ५७१ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. १३ लाख लोकसंख्येचा भार वाहण्यासाठी शहरात सार्वजनिक वाहुतकीची साधने नाहीत. शहर बससेवा नसल्यातच जमा आहे. शहराला किमान २०० नव्या बसगाड्यांची गरज असून, या गाड्या उपलब्ध करून देण्यास महामंडळ सक्षम नाही.शहरातील वाढती वाहतूक कमी करण्यासाठी शहराबाहेरून वळण मार्ग काढण्याची योजना वर्षानुवर्षे रखडलेली आहे. त्यात दररोज नवनवी वाहने रस्त्यावर येत आहेत. परजिल्ह्यातून होणारी अवजड वाहतूकही शहरातूनच होत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. या शहराकडे कामगार, कष्टकरी व नागरिकांचा असलेला ओढा पाहता, शहराची वाढ सुनियोजित करण्यासाठी महानगर प्रदेशाची घोषणा झाली. महानगर नियोजन समितीच्या निवडणुकाही झाल्या. त्यानंतर महानगर प्रदेशचे घोडे कशात अडकले, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मराठवाड्याचे आरोग्य बहुअंशी घाटी रुग्णालयावरच अवलंबून आहे. मराठवाड्यालगतच्या जळगाव व अहमदनगर जिल्ह्यांतूनही मोठ्या संख्येने रुग्ण येथे येतात. घाटीला निधीची गरज आहे. शहरात महापालिकेचे स्वतंत्र रुग्णालय नाही. सिव्हिल हॉस्पिटलची उभारणीही धीम्यागतीने सुरू आहे. हे २०० खाटांचे रुग्णालय पूर्णत्वास येण्यासाठी फक्त १८ कोटींची गरज आहे. या प्रदेशाला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते; परंतु संतपीठाची घोषणा होऊन चाळीस वर्षे उलटली, तरीही संतपीठाचे काम पूर्णत्वास येत नाही. संतपीठाची इमारत उभी झाली; परंतु त्यातून अभ्यासक्रम सुरू व्हायला आणखी किती वर्षे लागतील, हे आज तरी सांगता येत नाही.