शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

पर्यटन राजधानी समस्यांच्या गर्तेत

By admin | Updated: November 27, 2014 01:10 IST

औरंगाबाद : अजिंठा, वेरूळ लेण्यांचा जागतिक वारसा, सोबतीला दक्षिणेचा ताज, पाणचक्की आणि अनेक लहान-मोठी पर्यटन स्थळे,

औरंगाबाद : अजिंठा, वेरूळ लेण्यांचा जागतिक वारसा, सोबतीला दक्षिणेचा ताज, पाणचक्की आणि अनेक लहान-मोठी पर्यटन स्थळे, धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, पैठणचे संतपीठ आणि वाळूज, शेंद्र्यासह आता होऊ घातलेल्या दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमुळे औद्योगिकनगरी म्हणून नावलौकिकास येत असलेले औरंगाबाद महानगर मात्र दर्जेदार मूलभूत सुविधांच्या अभावामुळे समस्यांच्या खोल-खोल गर्तेत रुतत चालले आहे. शहर धुरा वाहणारी महापालिका आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्यामुळे विकासकामे ठप्प झाली आहेत. रस्ते खड्डेमय आहेत. पाण्याची समस्या गंभीर होत आहे. अतिक्रमणे वाढत आहेत. शहर सौंदर्यीकरणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. गुंठेवारी वसाहतीच्या समस्या वाढत आहेत. ही कामे मार्गी लावण्यासाठी पालिकेला १ हजार ५७१ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. १३ लाख लोकसंख्येचा भार वाहण्यासाठी शहरात सार्वजनिक वाहुतकीची साधने नाहीत. शहर बससेवा नसल्यातच जमा आहे. शहराला किमान २०० नव्या बसगाड्यांची गरज असून, या गाड्या उपलब्ध करून देण्यास महामंडळ सक्षम नाही.शहरातील वाढती वाहतूक कमी करण्यासाठी शहराबाहेरून वळण मार्ग काढण्याची योजना वर्षानुवर्षे रखडलेली आहे. त्यात दररोज नवनवी वाहने रस्त्यावर येत आहेत. परजिल्ह्यातून होणारी अवजड वाहतूकही शहरातूनच होत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. या शहराकडे कामगार, कष्टकरी व नागरिकांचा असलेला ओढा पाहता, शहराची वाढ सुनियोजित करण्यासाठी महानगर प्रदेशाची घोषणा झाली. महानगर नियोजन समितीच्या निवडणुकाही झाल्या. त्यानंतर महानगर प्रदेशचे घोडे कशात अडकले, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मराठवाड्याचे आरोग्य बहुअंशी घाटी रुग्णालयावरच अवलंबून आहे. मराठवाड्यालगतच्या जळगाव व अहमदनगर जिल्ह्यांतूनही मोठ्या संख्येने रुग्ण येथे येतात. घाटीला निधीची गरज आहे. शहरात महापालिकेचे स्वतंत्र रुग्णालय नाही. सिव्हिल हॉस्पिटलची उभारणीही धीम्यागतीने सुरू आहे. हे २०० खाटांचे रुग्णालय पूर्णत्वास येण्यासाठी फक्त १८ कोटींची गरज आहे. या प्रदेशाला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते; परंतु संतपीठाची घोषणा होऊन चाळीस वर्षे उलटली, तरीही संतपीठाचे काम पूर्णत्वास येत नाही. संतपीठाची इमारत उभी झाली; परंतु त्यातून अभ्यासक्रम सुरू व्हायला आणखी किती वर्षे लागतील, हे आज तरी सांगता येत नाही.