शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
5
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
6
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
7
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
8
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
9
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
10
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
11
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
12
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
13
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
14
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
15
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
16
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
17
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
18
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
19
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
20
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले

शहरात फडकणार सर्वात उंच तिरंगा

By admin | Updated: October 5, 2014 00:50 IST

औरंगाबाद : या शहराने राष्ट्रगीत गायनाचा विश्वविक्रम स्थापन करून आपले नाव गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंदविले.

औरंगाबाद : सुमारे अडीच वर्षांपूर्वी आपल्या राष्ट्रगीताला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या शहराने राष्ट्रगीत गायनाचा विश्वविक्रम स्थापन करून आपले नाव गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंदविले. हा विश्वविक्रम स्थापन करून शहरातील नागरिकांनी आपले नाव या देशात आणि जगात उंचावले. देशप्रेमाची ही प्रचीती पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. आता आपल्या शहरात सर्वात उंच तिरंगा फडकाविण्याचा निर्धार राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रीय प्रतीके ही कोणत्याही देशातील नागरिकांचा अभिमानच असतो. राष्ट्राभिमान जागविण्याचे काम ही प्रतीके करीत असतात. २५ जानेवारी २०१२ रोजी अगदी पहाटेच लाखो पावले गारखेड्यातील विभागीय क्रीडा संकुलाच्या दिशेने चाललेली दिसली. संपूर्ण शहरातून नागरिक शिस्तबद्ध रीतीने क्रीडा संकुलाकडे येत होते. दुचाकी, चारचाकी वाहनाने तसेच पायी लोक येत होते. जणू काही सैन्य युद्धावर निघाले आहे, असे ते दृश्य होते. शिस्तबद्ध रीतीने आणि प्रचंड उत्साही वातावरणात आपण राष्ट्रगानाचा जागतिक विक्रम केला. अगदी पहाटेपासूनच ‘जन गण मन’ गाण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. याआधी सर्वाधिक संख्येने राष्ट्रगीत गायनाचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. हा विक्रम कोणत्याही परिस्थितीत मोडायचाच, असा निर्धार शहरातील नागरिकांनी आधीच केला होता. त्यामुळे २५ जानेवारी २०१२ रोजी एक अभूतपूर्व असा जनसमुदाय क्रीडा संकुलात जमा झाला. सर्व वातावरण देशभक्तीने प्रफुल्लित झाले होते. प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड आणि शंकर महादेवन यांच्या देशभक्तीपर गाण्यांनी या वातावरणात आणखी चैतन्य निर्माण केले. राष्ट्रगीत गायनाचा विश्वविक्रम होऊन त्याची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्याचे जेव्हा गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकार्डच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले त्यावेळी अख्खे क्रीडा संकुल जल्लोषात न्हाऊन गेले. ‘राष्ट्रगान-राष्ट्र अभिमान’ या उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेले हे अभियान म्हणजे औरंगाबादच्या आधुनिक इतिहासातील एक सोनेरी पानच ठरले. जगात अनेक देशांत त्या- त्या देशाचे राष्ट्रध्वज उंचच उंच फडकत आहेत. देशाभिमान आणि देशप्रेमाचे ते प्रतीक मानले जाते. आपला तिरंगा तर सर्वांना ‘जान से प्यारा’ असाच आहे. झंडा ऊंचा रहे हमारा... देशाचा राष्ट्रध्वज असलेला तिरंगा सर्वात उंचावर फडकविण्याचे अभियान राबविण्याचा निर्धार राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रगीत गायनाच्या विश्वविक्रमातही त्यांचे मोठे योगदान राहिले. शहरातील नागरिकांनी अडीच वर्षांपूर्वी दाखविलेल्या देशप्रेमामुळे सर्वच जण भारावून गेले. हीच प्रेरणा आणि उत्साहामुळे आता सर्वात उंच तिरंगा फडकविण्याचे अभियान सुरू करण्यात येणार आहे. शहरात सर्वात उंच असा राष्ट्रध्वज फडकविण्याच्या ठिकाणी एक उद्यानही विकसित होईल. शिवाय ‘फ्लॅग म्युझियम’ उभारण्याच्या दिशेनेही प्रयत्न केले जातील. देशप्रेमाचा हा संकल्प पूर्ण करण्यात येईल. देशाचा तिरंगाही असाच डौलाने उंचावर फडकावा, या निर्धाराने ‘झंडा ऊंचा रहे हमारा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाद्वारे देशप्रेमाचा आदर्श शहरवासीय घालून देणार आहेत. प्रत्येकाला अभिमानच वाटेल देशप्रेमाची ऊर्मी काय असते ते या शहराने ‘राष्ट्रगीत गायन’ अभियानात दाखवून दिले आहे. शहरात सर्वात उंच तिरंगा फडकविण्याचे जे अभियान सुरू होणार आहे, त्यामुळे या शहराची मान आणखी उंचावली जाणार आहे. मला खात्री आहे की, या शहरातील प्रत्येक नागरिक या अभियानात आपले योगदान देईल. सर्वात उंच तिरंगा फडकविण्याचे ठिकाण, तिथला परिसर आणि उंच तिरंगा पाहून प्रत्येक नागरिकाला आपल्या शहराचा आणि त्या ठिकाणचा गौरवच वाटेल. अर्थात, हे होणार आहे ते केवळ या शहरातील नागरिकांमुळेच. -राजेंद्र दर्डा