शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

मनधरणीचा आज शेवटचा दिवस

By admin | Updated: October 1, 2014 00:44 IST

लातूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावेळी मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा १ आॅक्टोबर शेवटचा दिवस आहे़

लातूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावेळी मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा १ आॅक्टोबर शेवटचा दिवस आहे़ कोण, किती मते घेऊ शकतो, याची प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी चाचपणी सुरू केली आहे़ त्यानुसार अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यासाठी विनवणी केली जात आहे़ दोन दिवसांत भ्रमणध्वनीवर संपर्क साधून ‘मन’धरणी करणारे उमेदवार आज अपक्षांना प्रत्यक्ष भेटी देऊन विनवणी करणार आहेत़ लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात १७८ उमेदवारांनी २७२ अर्ज दाखल केले होते़ त्यापैकी ३२ जणांचे अर्ज बाद झाले आहेत़ अर्जाच्या छाननीनंतर कोण कोण निवडणुकीच्या रिंगणात राहणार याची उत्सुकता लागलेल्या मतदारांना आज चित्र स्पष्ट होणार आहे़ नामनिर्देशनपत्र दाखल करताना एकमेकांना पाण्यात पाहणारे उमेदवार अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्षांना गळ लावून समर्थक वाढविण्याच्या तयारीत आहेत़ लातूर शहर मतदारसंघात सर्वाधिक ४६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते़ त्यापैकी ६ जणांचे अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत़ मंगळवारी रात्री उशिरापर्यंत राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे समर्थक अपक्षांच्या संपर्कात होते़ लातूर, उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा व लातूर ग्रामीण मतदारसंघातील बहुतांश अपक्षांनी मंगळवारपर्यंत प्रमुख उमेदवारांना तळ्यात-मळ्यात ठेवले होते़ (प्रतिनिधी)लातूर शहर विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून रिंगणात असलेले माजी खा़ डॉ़ जनार्दन वाघमारे, अ‍ॅड़ बळवंत जाधव, अ‍ॅड़ मनोहरराव गोमारे हे माघार घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ भाजपाचे अ‍ॅड़ बळवंत जाधव माघार घेणार की अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे़ लातूर ग्रामीण मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या आशाताई भिसे या माघार घेतील, अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे़ त्यांच्या उमेदवारीकडे लक्ष लागले आहे़ भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत़ पक्षाने एबी फॉर्म दिलेले उमेदवार अपक्षांच्या मनधरणीत आहेत़ काही ‘हौसी’ उमेदवार स्वत:हूनच कोण काय देतो, याची चाचपणी करीत मंगळवारी फिरत होते़अपक्ष उमेदवारात जास्त मते घेण्याची शक्यता असलेल्या उमेवारांची राजकीय पक्षांत मनधरणी सुरू आहे़ निवडून आल्यावर तुम्हाला हवे ते पद देऊ़ तुमची इच्छा पूर्ण करू, असे आश्वासन दिले जात आहे़ तर काही अपक्षांनी आपल्या दुतामार्फत राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडे सेटलमेंटचे प्रस्ताव दिले आहे़ नवख्या असलेल्या काही उमेदवारांनी सर्वच राजकीय पक्षांचे दार ठोठावले आहे़ कोण कोणाला ‘किती’ समर्थन देतो, त्यावरून पाठिंबे निश्चित होणार आहेत़ काही ठिकाणी उमेदवारी राहु द्या म्हणून तर काही ठिकाणी काढून घेण्यासाठी विनवणी केली जात आहे़