शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

अधिग्रहणांची अडीच कोटींची देयके थकली

By admin | Updated: April 8, 2016 00:27 IST

लातूर : लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून पर्यायी उपाययोजना करण्याचे काम सुरू असले,

लातूर : लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून पर्यायी उपाययोजना करण्याचे काम सुरू असले, तरी दिवसेंदिवस टँकर व अधिग्रहणांची संख्या वाढत आहे. लातूर जिल्ह्यातील १० तालुक्याला ११४१ अधिग्रहणे व २४० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी शासनाकडून आलेला निधी अपुरा पडत असल्याने आणखी २ कोटी ६९ लाख ९७ हजार रुपयांच्या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे काही गावांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. या वाढत्या टंचाईपासून नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी ७३१ गावांत ११४१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर १८१ गावे आणि ४१ वाड्या अशा एकूण २२२ ठिकाणी २४० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लातूर तालुक्यातील २९ गावे व एका वाडीवर ४० टँकरद्वारे १०९ गावांमध्ये १८२ विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. औसा तालुक्यातील २० गावे आणि दोन वाड्यांवर २३ टँकरद्वारे आणि ११५ गावांमध्ये १६५ विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा सुरू केला आहे. रेणापूर तालुक्यातील १५ गावे आणि ४ वाड्यांवर २० टँकरद्वारे आणि ६७ गावांमध्ये ९६ विहिरींचे अधिग्रहण करून पाणी दिले जात आहे. उदगीरमधील २६ गावे आणि १४ वाड्यांवर ३८ टँकर आणि ७४ गावांकरिता १११ विहिरी, अहमदपूर तालुक्यातील २९ गावे व ८ वाड्यांवर ४२ टँकर तर १०२ गावांकरिता १३७ विहिरी, चाकूर तालुक्यातील १९ गावांत २३ टँकर आणि ७० गावांकरिता ९५ विहिरी, देवणी तालुक्यातील १२ गावे आणि तीन वाड्यांवर १२ टँकरद्वारे आणि ३६ गावांमध्ये ५७ विहिरी, जळकोटमधील १४ गावे व ७ वाड्यांवर २० टँकर तर ३७ गावांत ५१ विहिरी, निलंग्यातील १२ गावे आणि दोन वाड्यांमध्ये १७ टँकर आणि ९७ गावांकरिता २११ विहिरी, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ५ गावांमध्ये ५ टँकर आणि २४ गावांमध्ये ३७ विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दिवसेंदिवस पाण्याची टंचाई वाढत असल्यामुळे या वाढत्या टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी टँकर व अधिग्रहणाची संख्या वाढवावी लागत आहे. यासाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा, यासाठी प्रलंबित २ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची धावपळ सुरू आहे. (प्रतिनिधी)