शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शहरात तीन लाख घरे, अधिकृत नळधारक केवळ १ लाख ४० हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:02 IST

औरंगाबाद : शहरात दरवर्षी किमान दहा हजार नवीन घरांची भर पडत आहे. सध्या महापालिका हद्दीत तीन लाख मालमत्ता आहेत. ...

औरंगाबाद : शहरात दरवर्षी किमान दहा हजार नवीन घरांची भर पडत आहे. सध्या महापालिका हद्दीत तीन लाख मालमत्ता आहेत. या तुलनेत नळ कनेक्शनची संख्या फक्त १ लाख ४० हजार आहे. ५० हजारांपेक्षा अधिक अनधिकृत नळ आहेत. महापालिकेला पाणीपुरवठ्यासाठी दरवर्षी ८० ते ९० कोटी रुपये खर्च करावे लागतात. त्यातुलनेत पाणीपट्टीतून २५ ते ३० कोटी रुपये जमा होतात. पाणीपट्टीची थकबाकी ३२१ कोटीपर्यंत पोहोचली आहे.

शहराच्या पाणीपुरवठ्यात महापालिकेचे आर्थिकरीत्या कंबरडे मोडले जात आहे. मागील अनेक वर्षांपासून महापालिकेला आर्थिक तूट सहन करावी लागते. अनधिकृतरीत्या नळकनेक्शन घेणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहर चारही दिशेने झपाट्याने वाढत आहे. मागील अनेक वर्षांपासून महापालिकेने नवीन वसाहतींमध्ये जलवाहिन्या टाकले आणि पाणीपुरवठा करणे बंद केले. २००पेक्षा अधिक वसाहतींना मागील आठ वर्षांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरच्या पाणीपुरवठ्यावर महापालिका दरवर्षी तीन ते चार कोटी रुपये यावर खर्च करीत आहे. मालमत्ता करातील जवळपास ७० टक्के रक्कम पाणीपुरवठ्यावर खर्च होते. त्यामुळे विकासकामांसाठी महापालिकेकडे पैसे शिल्लक राहत नाहीत. अनधिकृत नळ कनेक्शन महापालिकेसाठी सर्वांत मोठी डोकेदुखी आहे. अनधिकृत नळ अधिकृत करण्यासाठी प्रशासनाने अनेकदा वेगवेगळ्या योजना राबविल्या मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ज्या नागरिकांचे अधिकृत आहेत त्यातील ७० टक्के नागरिक पैसेच भरत नाहीत. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत महापालिकेकडून वसुलीसाठी जोरदार प्रयत्न करण्यात येतात. मात्र त्यात फारसे यश येत नाही. पाणीपट्टी थकीत असलेल्या मालमत्ता धारकांचे नळ कनेक्शन खंडित करण्यास राजकीय मंडळींकडून विरोध करण्यात येतो. त्यामुळे दरवर्षी पाणीपट्टी थकबाकी चा आकडा वाढतच चालला आहे. निवासी मालमत्ताधारकांकडे २६४, तर व्यावसायिक मालमत्ताधारकांकडे ५६ कोटींची थकबाकी आहे. चालू आर्थिक वर्षात १ लाख ४० हजार नळकनेक्शनधारकांकडून ६० कोटींची मागणी करण्यात येत आहे.

ठळक आकडे

१७,०००,०० लोकसंख्या

३,०००,०० एकूण घरे

१,४०,००० अधिकृत नळधारक

५०००० अनधिकृत नळ

शहरात दरवर्षी २ ते ३ हजाराांनी अनधिकृत नळकनेक्शनची संख्या वाढत आहे. याला महापालिका प्रशासनासोबत राजकीय मंडळींची मोठ्या प्रमाणात साथ आहे. महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला, तर नागरिकांपेक्षा सर्वाधिक ओरड राजकीय मंडळींकडून करण्यात येते. त्यामुळे या संवेदनशील विषयाकडे महापालिका प्रशासनाने फारसे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.

पाण्याची गळती कमी प्रमाणात

जायकवाडी ते नक्षत्रवाडी या ६० किलोमीटर अंतरावर ठिकठिकाणी अत्यल्प प्रमाणात पाण्याची गळती आहे. शहरातही लिकेजचे प्रमाण फारसे नाही. पाण्याचे ऑडिट करताना अनधिकृत नळ डोळ्यासमोर ठेवून ४० टक्के पाण्याची गळती गृहीत धरण्यात येते. कारण अनधिकृत नळ कनेक्शनमधून जाणाऱ्या पाण्याचे पैसे महापालिकेला मिळत नाहीत.

वसुलीसाठी सर्वाधिक प्रयत्न सुरू

मालमत्ता कर आणि पाणीपट्टीसाठी महापालिकेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. नियमित वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त स्वतंत्र टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. दररोज पाच ते आठ लाखांपर्यंत वसुली होत आहे. तास फोर्सने अनेक ठिकाणी नळकनेक्शन खंडित केले आहेत. मार्चअखेरपर्यंत पूर्वीच्या तुलनेत वसुली जास्त होईल.

अपर्णा थेटे, उपायुक्त महापालिका

३२१ कोटींची थकबाकी

मागील २५ ते ३० वर्षांमध्ये महापालिकेने पाणीपट्टी वसुलीकडे कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. प्रामाणिकपणे आणि स्वतःहून जे नागरिक पाणीपट्टी भरतात त्यावरच महापालिकेने आज पर्यंत समाधान मानले. महापालिकेच्या या भूमिकेमुळे पाणीपट्टीची थकबाकी आकाशाला गवसणी घालत आहे. ३२१ कोटी रुपये नागरिकांकडे पाणीपट्टीचे थकीत आहेत. दरवर्षी यंदा प्रमाणे वसुलीसाठी लक्ष दिले असते तर एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी राहिली नसती.