शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दहा क्ंिवटल मिरची पावडर गायब

By admin | Updated: November 16, 2014 00:36 IST

शेषराव वायाळ ,परतूर परतूर रेल्वेस्थानकातून मिरची पावडरच्या पन्नास गोण्या एका व्यक्तीेने नेल्याने व त्या व्यक्तीचा आता थांगपत्ता लागत नसल्याने या मिरची पावडरचे गुढ वाढले आहे.

शेषराव वायाळ ,परतूरपरतूर रेल्वेस्थानकातून मिरची पावडरच्या पन्नास गोण्या एका व्यक्तीेने नेल्याने व त्या व्यक्तीचा आता थांगपत्ता लागत नसल्याने या मिरची पावडरचे गुढ वाढले आहे. पंधरा दिवस उलटले, तरी दाद ना फिर्याद, रेल्वेच्या या कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. हैद्राबादहून परतूरच्या स्थानकात आलेल्या ५० गोणी मिरची पावडरचा थांगपत्ता लागत नसल्याने पाठवणारा मालक व रेल्वेस्थानकातील अधिकारी व पोलिस त्रस्त झाले आहेत. यातील गुढ म्हणजे हैद्राबादहून मिरची पावडर पाठवणारा रवि पाटील व घेणाराही परतूरच्या नावाने रवि पाटीलच आहे. २९ आॅक्टोंबर २०१४ रोजी या पन्नास गोण्यांचे आरक्षण करण्यात आले व ३० आॅक्टोबर २०१४ रोजी या गोण्या परतूर रेल्वेस्थानकात आल्या. यानंतर ह्या गोण्या शेख सलिम शेख जाफर रा. जिंतूर हा एक बाँन्ड देवून घेवून गेला. रेल्वे आरक्षणातील कोणताही माल नेतांना बुकिंग पावती जवळ असणे बंधनकारक असते. मात्र या व्यक्तीजवळ पावती नसल्याने बोगस बाँड देवून ही व्यक्ती मिरची पावडरच्या गोण्या घेवून गेली असल्याचा अंदाज रेल्वेचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. या मालाविषयी, मिरची पावडर पाठवणारा मुळ मालक रेल्वे विभागाकडे चौकशी करीत आहे. रेल्वे विभागाकडून त्यास उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. या मिरची पावडरची किंमत दीड ते दोन लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. पंधरा दिवस उलटले तरी, या प्रकरणी काहीच फिर्याद किंवा चौकशी होत नसल्याने या पावडर विषयी आता गुढ वाढू लागले आहे. ही पावडर पाठवणारा व घेणारा एकच कसा, बाँड देवून माल विनापावतीचा स्टेशन मास्तरने दिलाच कसा, माल घेवून जाणारा कोण, मिरची पावडर कोणासाठी आली होती आदी प्रश्न रेल्वेचे अधिकारी व रेल्वे पालिस यांना सतावत आहेत.