शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

दहा क्ंिवटल मिरची पावडर गायब

By admin | Updated: November 16, 2014 00:36 IST

शेषराव वायाळ ,परतूर परतूर रेल्वेस्थानकातून मिरची पावडरच्या पन्नास गोण्या एका व्यक्तीेने नेल्याने व त्या व्यक्तीचा आता थांगपत्ता लागत नसल्याने या मिरची पावडरचे गुढ वाढले आहे.

शेषराव वायाळ ,परतूरपरतूर रेल्वेस्थानकातून मिरची पावडरच्या पन्नास गोण्या एका व्यक्तीेने नेल्याने व त्या व्यक्तीचा आता थांगपत्ता लागत नसल्याने या मिरची पावडरचे गुढ वाढले आहे. पंधरा दिवस उलटले, तरी दाद ना फिर्याद, रेल्वेच्या या कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. हैद्राबादहून परतूरच्या स्थानकात आलेल्या ५० गोणी मिरची पावडरचा थांगपत्ता लागत नसल्याने पाठवणारा मालक व रेल्वेस्थानकातील अधिकारी व पोलिस त्रस्त झाले आहेत. यातील गुढ म्हणजे हैद्राबादहून मिरची पावडर पाठवणारा रवि पाटील व घेणाराही परतूरच्या नावाने रवि पाटीलच आहे. २९ आॅक्टोंबर २०१४ रोजी या पन्नास गोण्यांचे आरक्षण करण्यात आले व ३० आॅक्टोबर २०१४ रोजी या गोण्या परतूर रेल्वेस्थानकात आल्या. यानंतर ह्या गोण्या शेख सलिम शेख जाफर रा. जिंतूर हा एक बाँन्ड देवून घेवून गेला. रेल्वे आरक्षणातील कोणताही माल नेतांना बुकिंग पावती जवळ असणे बंधनकारक असते. मात्र या व्यक्तीजवळ पावती नसल्याने बोगस बाँड देवून ही व्यक्ती मिरची पावडरच्या गोण्या घेवून गेली असल्याचा अंदाज रेल्वेचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. या मालाविषयी, मिरची पावडर पाठवणारा मुळ मालक रेल्वे विभागाकडे चौकशी करीत आहे. रेल्वे विभागाकडून त्यास उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. या मिरची पावडरची किंमत दीड ते दोन लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. पंधरा दिवस उलटले तरी, या प्रकरणी काहीच फिर्याद किंवा चौकशी होत नसल्याने या पावडर विषयी आता गुढ वाढू लागले आहे. ही पावडर पाठवणारा व घेणारा एकच कसा, बाँड देवून माल विनापावतीचा स्टेशन मास्तरने दिलाच कसा, माल घेवून जाणारा कोण, मिरची पावडर कोणासाठी आली होती आदी प्रश्न रेल्वेचे अधिकारी व रेल्वे पालिस यांना सतावत आहेत.