शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

शिकवण्यांचे फुटले पेव

By admin | Updated: June 30, 2014 00:36 IST

मल्हारीकांत देशमुख, परभणी एक काळ असा होता की, विद्यार्थी कच्चा असेल तर त्याला एखाद्या विषयाची शिकवणी लावली जायची. ती देखील चोरुन,शिकवणी लावणे हे हुशार मुलांचे लक्षण मानले जात नसे.

मल्हारीकांत देशमुख, परभणीएक काळ असा होता की, विद्यार्थी कच्चा असेल तर त्याला एखाद्या विषयाची शिकवणी लावली जायची. ती देखील चोरुन, लपून. शिकवणी लावणे, गाईडचा वापर करणे हे हुशार मुलांचे लक्षण मानले जात नसे. शहरात दोन-चार शिकवणी वर्ग असायचे. आता तर गल्लीबोळात शिकवण्यांची दुकाने निघालीत. शाळेत असतील नसतील तेवढे विद्यार्थी शिकवणीवर्गाला दिसून येतात. शिकवणीला प्रतिष्ठा तर आलीच परंतु ती अनिवार्यही झाली. इयत्ता पहिलीपासून बारावीपर्यंत शहरी भागातील पालक शिकवणी लावतातच. एखाद्या विद्यार्थ्यास शिकवणी नाही हे ऐकल्यावर आश्चर्य व्यक्त होते. गरीबातला गरीब विद्यार्थी देखील माध्यमिक स्तरावर शिकवणी लावतोच.मार्क्स ओरिएंटेड शिक्षणप्रणाली जास्तीत जास्त मार्क्स कसे कमावता येतील, या स्पर्धेत विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या पालकांचाच जास्त सहभाग दिसून येतो. आपला पाल्य स्पर्धेत मागे नको या एकमेव हव्यासापोटी पहिलीपासून शिकवणी, वेगवेगळ्या कोचिंग, अ‍ॅरोबिकपासून नृत्य, नाट्य, संगीत, अक्षरसुधारपासून कुंगफू कराटेपर्यंत मुलांना गुंतविले जाते. मुलांच्या आवडीपेक्षा पालकांच्याच अपेक्षांचे ओझे मुलांच्या माथी मारले जाते. या संदर्भाने ‘लोकमत’ने शहरी भागात शिकवणी लावण्याचे प्रमाण व त्याचे कारणे शोधताना शहराच्या विविध भागातील पालकांचे मते जाणून घेतली. सर्वेक्षणानुसार ७९ टक्के पालकांनी आपली मुले खाजगी शिकवणीला जात असल्याचे सांगितले. त्याचबरोबर खाजगी शिकवणींचे समर्थनही केले.खाजगी शिकवणीमुळे आपल्या पाल्याच्या गुणवत्तेत सुधारणा कितपत झाली, या प्रश्नाचे उत्तर देताना ७० टक्के पालकांनी सकारात्मक तर १० टक्के पालकांनी गुणवत्तेबद्दल आशावाद मांडला. गुणवत्तेशिवाय शिक्षण हा केवळ टाईमपास त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवणी लावलीच पाहिजे, हा काळ स्पर्धेचा आहे, असेही काही पालकांनी ठणकावून सांगितले. शिकवणीचा वेळ किती तास असावा, या प्रश्नाचे उत्तर देताना ६५ टक्के पालकांनी शिकवणी तीन तासांपेक्षा जास्तवेळ नसावी तर २५ टक्के पालकांनी शिकवणी किमान ४ तास असावी, असे म्हटले आहे. खाजगी शाळा शिफ्टमध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाच तास रहावे लागते. शिकवणीमध्ये तीन तास जावेत, अशी पालकांची अपेक्षा आहे. याचा अर्थ आजच्या पालकांना आपली मुलं सतत एंगेज रहावित, असे वाटते.मुलांना खाजगी शिकवणी का लावली, या प्रश्नाचे उत्तर देताना तब्बल ६० टक्के पालकांनी मुलांचा घरी अभ्यास होत नसल्याचे स्पष्ट केले. तर, २५ टक्के पालकांनी शाळेत व्यवस्थित शिकवित नसल्याचे सांगितले़ मुलांचा घरी अभ्यास होत नाही, ही पालकांना मुलांच्या अभ्यासाकडे पूर्ण वेळ देता येत नाही, याचेच चिन्ह आहे. त्यामुळे दोन्हींचा विचार केल्यास एकूण तब्बल ६० टक्के पालक आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी वेळ देऊ शकत नसल्याचे स्पष्ट होते.विशेष म्हणजे २५ टक्के पालकांनी शाळेत व्यवस्थित शिकवत नसल्याचेही कारण दिले आहे. बदलतोय पालकांचा कलआपला पाल्य स्पर्धेत मागे नको या एकमेव हव्यासापोटी पहिलीपासून शिकवणी, वेगवेगळ्या कोचिंग, अ‍ॅरोबिकपासून नृत्य, नाट्य, संगीत, अक्षर सुधारपासून कुंगफू कराटेपर्यंत मुलांना गुंतविले जाते.उजळणी गरजेची...इंग्रजी माध्यमाला पसंती मिळू लागली. शिक्षणाचा खर्च वाढत गेला. आईवडील दोघांनाही नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर जावे लागले. चांगल्या शाळांमध्ये मुलांना घातले असले, तरी घरी त्यांची उजळणी घेणे गरजेचे असतेच. बदलत्या परिस्थितीनुसार पालकांना मुलांच्या अभ्यासाकडे पुरेसे लक्ष देणेही शक्य होत नाही. त्यामुळे खाजगी शिकवण्याकडे पालकांचा ओढा वाढला.