शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

जिल्ह्यातील तहसीलदारांचे खाणपट्टयांना अभय

By admin | Updated: September 24, 2014 00:44 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ८७ दगड खदानींची मोजणी उपसंचालक भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय व औरंगाबाद पथकाने खदानीची तपासणी करुन संबधित खानपट्टाधारकांने केलेल्या

 

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ८७ दगड खदानींची मोजणी उपसंचालक भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय व औरंगाबाद पथकाने खदानीची तपासणी करुन संबधित खानपट्टाधारकांने केलेल्या उत्खननाचा खदाननिहाय अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला होता. त्यानंतर तो अहवाल संबधित तहसीलदारांना देऊन अवैध उत्खनन केलेल्या खानचालकांकडून दंड लावून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर संबधित तहसीलदारांनी खानचालकावर ५४ कोटी ५३ लाखावर दंड लावला होता.मात्र प्रत्यक्षात केवळ ५ कोटी ५७ लाखावर रुपये वसूल केले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी वारंवार आदेश दिले होते. याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिल्ह्यातील खदानींची तपासणी जून महिन्यात करण्यात आली होती.यात जिल्ह्यातील ८७ खदानींची मोजणी उपसंचालक भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय व औरंगाबाद पथकाने खदानीची तपासणी करुन संबधित खानपट्टाधारकांने केलेल्या उत्खननाचा खदाननिहाय अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला होता. यात गौण गौण खनिज स्वामित्वधन भरणा केलेल्या प्रमाणात अधिक गौण उत्खनन खदानधारकाने विनापरवाना केल्याचे दिसून आले होते. याची पडताळणी करण्यासाठी संबधित तहसीलदाराना याचा अहवाल प्रशासनाच्या वतीने देण्यात आला होता. अहवालानुसार संबधित कालावधीत उत्खनन व संबधित कालावधीत भरलेले गौण खनिज स्वामित्वधन याची पडताळणी करुन उर्वरित गौण खनिज उत्खनन अवैध समजून कार्यवाही करुन याचा अहवाल संबधित तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले होते. यात २३ वाळूघाट व ७४ खाणपट्टे चालकांकडून ५४ कोटी ५३ लाख ४६ हजार ८५६ रुपयांचे अवैध उत्खनन झाल्याचे तहसीलदारांनाच्या तपासणी मधुन समोर आले होते. मात्र प्रत्यक्ष आठ तालुक्यातील तहसीलदारांना केवळ संबधित खाननचालकाडून केवळ ५ कोटी ५७ लाखावर रुपये वसूल केले असल्याची माहिती समोर आली आहे. यातुन संबधित तहसीलदार वाळूघाट व खाणपट्टे चालकांना अभय देत आहे का असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी) जिल्ह्यातील ५० खानपट्टया चालकांनी विना परवाना उत्खनन , दोन चालकांनी मुदत संपल्यानंतरही उत्खनन, करारनामा परवाना आदेशातील अटी व शर्तीच्या उल्लघनाबाबतची ५ प्रकरणे असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. भूम , कळंब व उमरगा तहसीलदारांनी थोडीफार कार्यवाही करुन दंड वसूल केला तर उर्वरित तहसीलदारांनी कोणतीच कार्यवाही केलेली नाही हे विशेष. जिल्ह्यातील ८७ दगड खदानी चालकानी अवैध उत्खनन केलेल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला दोन महिन्याखाली उपसंचालक भूविज्ञान व खनिकरण संचलनालय यांनी दिला होता. कारवाई करून दंडाची रक्कम वसूल करण्याचे आदेश ११ जुलै रोजी दिले होते.