शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

जिल्ह्यातील तहसीलदारांचे खाणपट्टयांना अभय

By admin | Updated: September 24, 2014 00:44 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ८७ दगड खदानींची मोजणी उपसंचालक भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय व औरंगाबाद पथकाने खदानीची तपासणी करुन संबधित खानपट्टाधारकांने केलेल्या

 

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ८७ दगड खदानींची मोजणी उपसंचालक भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय व औरंगाबाद पथकाने खदानीची तपासणी करुन संबधित खानपट्टाधारकांने केलेल्या उत्खननाचा खदाननिहाय अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला होता. त्यानंतर तो अहवाल संबधित तहसीलदारांना देऊन अवैध उत्खनन केलेल्या खानचालकांकडून दंड लावून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर संबधित तहसीलदारांनी खानचालकावर ५४ कोटी ५३ लाखावर दंड लावला होता.मात्र प्रत्यक्षात केवळ ५ कोटी ५७ लाखावर रुपये वसूल केले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी वारंवार आदेश दिले होते. याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिल्ह्यातील खदानींची तपासणी जून महिन्यात करण्यात आली होती.यात जिल्ह्यातील ८७ खदानींची मोजणी उपसंचालक भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय व औरंगाबाद पथकाने खदानीची तपासणी करुन संबधित खानपट्टाधारकांने केलेल्या उत्खननाचा खदाननिहाय अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला होता. यात गौण गौण खनिज स्वामित्वधन भरणा केलेल्या प्रमाणात अधिक गौण उत्खनन खदानधारकाने विनापरवाना केल्याचे दिसून आले होते. याची पडताळणी करण्यासाठी संबधित तहसीलदाराना याचा अहवाल प्रशासनाच्या वतीने देण्यात आला होता. अहवालानुसार संबधित कालावधीत उत्खनन व संबधित कालावधीत भरलेले गौण खनिज स्वामित्वधन याची पडताळणी करुन उर्वरित गौण खनिज उत्खनन अवैध समजून कार्यवाही करुन याचा अहवाल संबधित तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले होते. यात २३ वाळूघाट व ७४ खाणपट्टे चालकांकडून ५४ कोटी ५३ लाख ४६ हजार ८५६ रुपयांचे अवैध उत्खनन झाल्याचे तहसीलदारांनाच्या तपासणी मधुन समोर आले होते. मात्र प्रत्यक्ष आठ तालुक्यातील तहसीलदारांना केवळ संबधित खाननचालकाडून केवळ ५ कोटी ५७ लाखावर रुपये वसूल केले असल्याची माहिती समोर आली आहे. यातुन संबधित तहसीलदार वाळूघाट व खाणपट्टे चालकांना अभय देत आहे का असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी) जिल्ह्यातील ५० खानपट्टया चालकांनी विना परवाना उत्खनन , दोन चालकांनी मुदत संपल्यानंतरही उत्खनन, करारनामा परवाना आदेशातील अटी व शर्तीच्या उल्लघनाबाबतची ५ प्रकरणे असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. भूम , कळंब व उमरगा तहसीलदारांनी थोडीफार कार्यवाही करुन दंड वसूल केला तर उर्वरित तहसीलदारांनी कोणतीच कार्यवाही केलेली नाही हे विशेष. जिल्ह्यातील ८७ दगड खदानी चालकानी अवैध उत्खनन केलेल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला दोन महिन्याखाली उपसंचालक भूविज्ञान व खनिकरण संचलनालय यांनी दिला होता. कारवाई करून दंडाची रक्कम वसूल करण्याचे आदेश ११ जुलै रोजी दिले होते.