शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

दुष्काळाच्या मागणीसाठी गाठले तहसील कार्यालय

By admin | Updated: July 19, 2014 00:39 IST

पालम : तालुक्यात जुलै महिना संपत आला तरी पाऊस पडलेला नाही. श्ोतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे वाया गेले आहे. यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करावा

पालम : तालुक्यात जुलै महिना संपत आला तरी पाऊस पडलेला नाही. श्ोतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे वाया गेले आहे. यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी माजी खा. सुरेश जाधव यांच्यासह शेकडो शेतकरी व सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी तहसील कार्यालय गाठून कैफियत मांडली आहे. पालम तालुक्यात अजूनही चांगला पाऊस पडलेला नाही. अल्पश: पावसावर खरिपाची पेरणी उरकून घेतली आहे. पेरणीनंतर पाऊस उघडल्याने हजारो रुपये खर्चून पेरणी पूर्णत: वाया गेली आहे. उगवलेली कवळी रोपे पाण्याअभावी वाळून जात आहेत. कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतावरील शेतसारा माफ करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत करावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, भारनियमन बंद करावे, बँकांची व सावकाराची कर्ज वसुली थांबवावी, गारपीटग्रस्त वंचित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून मजुरांचे स्थलांतर थांबवावे, पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावावा, दुबार पेरणीसाठी बियाणे व रासानिक खताचा पुरवठा करावा, बोगस बियाणांची विक्री थांबवावी यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार डॉ. भगवान आगे यांना देण्यात आले आहेत. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा माजी खा. सुरेश जाधव, प्रभाकरराव सिरस्कर, दत्तराव जवळेकर, अ‍ॅड. विजयकुमार शिंदे, अ‍ॅड. सुनील देशपांडे, पं.स. सदस्य नामदेव कदम, बंडू जाधव, किशोर कदम, सुभाष जाधव, भीमराव इतनर, माधव निळे, मन्मथ काळे, भारत इतनर, लिंबाजी पौळ आदींनी दिला आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांनी मांडले गाऱ्हाणेपालम तालुक्यात अजूनही पाऊस झालेला नाही. मध्यंतरी हलकासा पाऊस झाला होता. पाऊस पडेल या आश्ोने शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु दररोज आता आकाशाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी बियाणांवर केलेला खर्च बियाणे न उगविण्याची भिती यासह विविध समस्या तहसीलदारांसमोर मांडल्या आहेत. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी वाईट प्रसंग ओढवल्याची माहिती दिली.