शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

अविश्वासाची तलवार म्यान

By admin | Updated: November 18, 2014 01:08 IST

औरंगाबाद : मनपा आयुक्त पी.एम. महाजन यांच्या विरोधात अविश्वास आणण्यासाठी उपसण्यात आलेली सत्ताधारी, विरोधकांची तलवार म्यान झाली आहे.

औरंगाबाद : मनपा आयुक्त पी.एम. महाजन यांच्या विरोधात अविश्वास आणण्यासाठी उपसण्यात आलेली सत्ताधारी, विरोधकांची तलवार म्यान झाली आहे. आयुक्तांनी लेखाधिकारी संजय पवार यांच्याकडील धनादेश लिहिण्याचे अधिकार काढून ते मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांच्याकडे दिले आहेत. यासोबतच महावीर पाटणी यांच्याकडे प्रशासकीय अधिकारीपदाचा पदभार देण्यात आला आहे. तसेच अय्युबखान यांच्याकडे आस्थापना अधिकारी-१ या पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत लेखाधिकारी संजय पवार यांच्याकडील पदभार काढण्याचे आदेश महापौरांनी दिले. १३ नोव्हेंबर रोजी विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात पवारांच्या चहापानावरून सेटलमेंटची चर्चा रंगली. १४ नोव्हेंबर रोजी आयुक्तांसोबत महापौर, विरोधी पक्षनेत्यांमध्ये पवार यांच्यात पदभार काढण्यावरून बाचाबाची झाली होती. तसेच माजी आ. जैस्वाल यांनी आयुक्तांना लेखाधिकारी पवार यांचा पदभार काढण्यासाठी पत्र दिले होते. १५ नोव्हेंबर रोजी आयुक्तांसोबत सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीत विकासकामांच्या संचिका, लेखा विभागातील पदावनतीवरून चर्चा झाली होती. तारेवरची कसरत : बजेटआले ५० टक्क्यांवर मनपाला आगामी काळात तारेवरची कसरत करून खर्च भागवावा लागणार आहे. मनपाला सर्व मार्गांनी मिळणारे उत्पन्न ४०० कोटींच्या आसपास जाणार आहे. यंदाचे बजेट ८०० कोटींचे आहे. शासनाकडून १०० कोटींचे अनुदान मिळाले, तर परिस्थिती सुधारेल; अन्यथा नाही, असा दावा सूत्रांनी केला. २०१५ मध्ये महापालिकेच्या निवडणुका असल्यामुळे या सभेचे हे अंतिम बजेट ठरणार आहे. शिल्लक कामांमुळे आर्थिक नियोजनाची घडी विस्कटली आहे. ४५ कोटींचे रस्ते, ४६४ कोटींची भुयारी गटार योजना, समांतरसाठी दरमहा साडेपाच कोटी रुपये, पथदिव्यांसाठी मनपाला प्राधान्यक्रम देऊन खर्च करावा लागणार आहे. याव्यतिरिक्त २०१२-१३ च्या अर्थसंकल्पातील १०० कोटींच्या शिल्लक कामांचा निपटारा अजून झालेला नाही. त्यातच २०१३-१४ च्या अर्थसंकल्पातील १०० कोटी रुपयांची कामे शिल्लक आहेत. २०१४ या वर्षात लोकसभा, विधानसभा, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ या निवडणूक झाल्या. ५ महिने निवडणूक आचारसंहितेत गेले. ७ महिने पालिका पदाधिकाऱ्यांना विकासकामांसाठी होते. त्यातून साडेचार महिने संपले आहेत. एप्रिल २०१५ मध्ये मनपा निवडणुका आहेत. त्यामुळे पदाधिकारी, नगरसेवकांचा कामे होत नसल्यामुळे तिळपापड होतो आहे.