शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
2
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
5
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
6
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
7
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
8
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
9
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
10
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
11
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
12
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
13
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
14
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
15
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
16
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
17
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
18
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
19
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
20
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
Daily Top 2Weekly Top 5

अविश्वासाची तलवार म्यान

By admin | Updated: November 18, 2014 01:08 IST

औरंगाबाद : मनपा आयुक्त पी.एम. महाजन यांच्या विरोधात अविश्वास आणण्यासाठी उपसण्यात आलेली सत्ताधारी, विरोधकांची तलवार म्यान झाली आहे.

औरंगाबाद : मनपा आयुक्त पी.एम. महाजन यांच्या विरोधात अविश्वास आणण्यासाठी उपसण्यात आलेली सत्ताधारी, विरोधकांची तलवार म्यान झाली आहे. आयुक्तांनी लेखाधिकारी संजय पवार यांच्याकडील धनादेश लिहिण्याचे अधिकार काढून ते मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांच्याकडे दिले आहेत. यासोबतच महावीर पाटणी यांच्याकडे प्रशासकीय अधिकारीपदाचा पदभार देण्यात आला आहे. तसेच अय्युबखान यांच्याकडे आस्थापना अधिकारी-१ या पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत लेखाधिकारी संजय पवार यांच्याकडील पदभार काढण्याचे आदेश महापौरांनी दिले. १३ नोव्हेंबर रोजी विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात पवारांच्या चहापानावरून सेटलमेंटची चर्चा रंगली. १४ नोव्हेंबर रोजी आयुक्तांसोबत महापौर, विरोधी पक्षनेत्यांमध्ये पवार यांच्यात पदभार काढण्यावरून बाचाबाची झाली होती. तसेच माजी आ. जैस्वाल यांनी आयुक्तांना लेखाधिकारी पवार यांचा पदभार काढण्यासाठी पत्र दिले होते. १५ नोव्हेंबर रोजी आयुक्तांसोबत सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीत विकासकामांच्या संचिका, लेखा विभागातील पदावनतीवरून चर्चा झाली होती. तारेवरची कसरत : बजेटआले ५० टक्क्यांवर मनपाला आगामी काळात तारेवरची कसरत करून खर्च भागवावा लागणार आहे. मनपाला सर्व मार्गांनी मिळणारे उत्पन्न ४०० कोटींच्या आसपास जाणार आहे. यंदाचे बजेट ८०० कोटींचे आहे. शासनाकडून १०० कोटींचे अनुदान मिळाले, तर परिस्थिती सुधारेल; अन्यथा नाही, असा दावा सूत्रांनी केला. २०१५ मध्ये महापालिकेच्या निवडणुका असल्यामुळे या सभेचे हे अंतिम बजेट ठरणार आहे. शिल्लक कामांमुळे आर्थिक नियोजनाची घडी विस्कटली आहे. ४५ कोटींचे रस्ते, ४६४ कोटींची भुयारी गटार योजना, समांतरसाठी दरमहा साडेपाच कोटी रुपये, पथदिव्यांसाठी मनपाला प्राधान्यक्रम देऊन खर्च करावा लागणार आहे. याव्यतिरिक्त २०१२-१३ च्या अर्थसंकल्पातील १०० कोटींच्या शिल्लक कामांचा निपटारा अजून झालेला नाही. त्यातच २०१३-१४ च्या अर्थसंकल्पातील १०० कोटी रुपयांची कामे शिल्लक आहेत. २०१४ या वर्षात लोकसभा, विधानसभा, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ या निवडणूक झाल्या. ५ महिने निवडणूक आचारसंहितेत गेले. ७ महिने पालिका पदाधिकाऱ्यांना विकासकामांसाठी होते. त्यातून साडेचार महिने संपले आहेत. एप्रिल २०१५ मध्ये मनपा निवडणुका आहेत. त्यामुळे पदाधिकारी, नगरसेवकांचा कामे होत नसल्यामुळे तिळपापड होतो आहे.