शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

‘स्वाईन फ्लू’चा उद्रेक; प्रशासन गाफील !

By admin | Updated: February 16, 2015 00:52 IST

लातूर : स्वाईन फ्लूचा एच१ एन१ व्हायरस जिल्ह्यात सक्रिय झाला आहे. आतापर्यंत सात जणांचा बळी गेला आहे. यातील चौघा जणांचा अहवाल स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आहे

लातूर : स्वाईन फ्लूचा एच१ एन१ व्हायरस जिल्ह्यात सक्रिय झाला आहे. आतापर्यंत सात जणांचा बळी गेला आहे. यातील चौघा जणांचा अहवाल स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आहे. तर अन्य एकाचा निगेटिव्ह अहवाल आला आहे. तर दोघांचा अन्य आजाराने मृत्यू झाल्याचे निदान झाले आहे. एकंदर, ४० ते ४५ रुग्णांनी स्वाईन फ्लू संशयित म्हणून उपचार घेतले आहे. असे असतानाही प्रशासन गाफिलच आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागात ताळमेळ नसल्याने स्वाईन फ्लूची भीती रुग्णांमध्ये निर्माण झाली आहे.लातूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्वोपचार रुग्णालय वैद्यकीय शिक्षण खात्याकडे आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभागाकडे जिल्हा रुग्णालय नाही. त्यामुळे रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण खात्याच्या सर्वोपचार रुग्णालयाकडे आहे. जिल्ह्यात उदगीर, निलंगा येथे सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपजिल्हा रुग्णालय आहे. या रुग्णालयात स्वाईन फ्लूसदृश आजारावर उपचाराची सुविधा आहे. निलंगा व मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात स्वाईन फ्लू उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु, जनजागरणाचा अभाव दिसत आहे. काय करावे, काय करू नये, या संदर्भात नागरिकांमध्ये प्रबोधन होण्याची गरज आहे. परंतु, रुग्णालय अधिकारी-कर्मचारी मर्यादितच बैठका घेतल्या जात आहेत. त्यापुढे या दोन्ही विभागाची मजल गेलेली नाही. त्यामुळे संशयित रुग्णांची संख्या वाढतच आहे. शाळा, महाविद्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी या रोगासंदर्भात समज-गैरसमज दूर करण्यासाठी कार्यशाळा घेण्याचे नियोजन आहे. परंतु, प्रशासनाकडून असल्या कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाची प्रत्येकी एक बैठक झाली. त्यानंतर बैठक नाही की, प्रबोधन नाही. मनपाची यंत्रणाही बेफिकीर आहे. त्यांचे सहा केंद्र नावालाच आहेत. त्यात ना रुग्ण ना कोणी तपासणीला जाते. सुविधा नसल्याने ही स्थिती आहे. (प्रतिनिधी)सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत ४५ संशयित रुग्णांवर उपचार करण्यात आले. यात चौघा जणांचा मृत्यू झाला. त्यांचा अहवालही पुण्याच्या प्रयोगशाळेकडून पॉझिटिव्ह आला आहे. तर दोघा रुग्णांचा खाजगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला आहे. त्यांच्या अहवालाबाबत दोन्हीही विभाग अनभिज्ञ आहेत. अन्य एका रुग्णाचा संशयित स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इतके रुग्ण वाढत असताना सामान्य प्रशासन आणि आरोग्य प्रशासन गाफिल असल्याचेच दिसत आहे. आणखी किती रुग्णांचा बळी गेल्यानंतर यांना जाग येणार आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.सद्य:स्थितीत सर्वोपचार रुग्णालयात एकूण आठ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, तिघे संशयित स्वाईन फ्लू आहेत. आठपैकी पाच रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. तरीही आरोग्य यंत्रणा जनजागृतीकडे दुर्लक्ष करीत आहे. शिवाय, आयसोलेटेड वॉर्डातही सुविधांचा अभाव आहे.स्वाईन फ्लू का होतो, त्याची कारणे काय आहेत, काय करायला हवे या संदर्भात होर्डिंग्ज, बॅनर्स, जनजागरण रॅली काढून जनजागृती करणे आवश्यक आहे. मात्र जिल्हा शल्य चिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्त्याखाली असलेला प्रशासन विभाग गाफिल आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. सातपैकी चौघांच्या मृत्यूचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. अन्य तिघांच्या अहवालात वेगवेगळी मृत्यूची कारणे असली, तरी ते स्वाईन फ्लू संशयित म्हणूनच दाखल झालेले होते. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून जनजागृती करावी, अशी मागणीही काही संघटनांनी केली आहे.