शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

जिल्ह्यातील रोहित्रांना आता आॅईलचे ग्रहण

By admin | Updated: November 16, 2014 00:35 IST

गजेंद्र देशमुख , जालना महावितरणकडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार कायम सुरुच आहेत. आता महावितरणकडे आॅईल नसल्याचे कारण देत रोहित्रांची दुरुस्ती थांबविली आहे.

गजेंद्र देशमुख , जालनामहावितरणकडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार कायम सुरुच आहेत. आता महावितरणकडे आॅईल नसल्याचे कारण देत रोहित्रांची दुरुस्ती थांबविली आहे. महावितरणच्या विभाग एक व दोन मध्ये २५० पेक्षा जास्त रोहित्रे दुरुस्तीसाठी आहेत. दरम्यान, रत्नागिरी येथून आॅईल मागविल्याचे अधीक्षक अभियंत्यांनी सांगितले.शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत रोहित्र देणे बंधनकारक असतांनाही कधी तंत्रज्ञ तर कधी आॅईलचे करणामुळे रोहित्र मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. दोन्ही विभागात ६३ व १०० केव्हीएच्या रोहित्रांची दुरुस्ती केली जाते. कैन्हयानगर येथील कार्यशाळेत रोहित्रांची दुरुस्ती तसेच इतर कामे होतात.या दोन्ही विभागाकडे चार चार तालुके देण्यात आले आहेत. जळालेली रोहित्र दुरूस्तीसाठी पाठविणे व ते शेतकऱ्यांना देण्याची जबाबदारी संबंधित विभागाकडे आहे. काही दिवसांपूर्वी लोकमतने रोहित्रांची समस्या प्रकर्षाने मांडून शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडली होती. ग्रामीण विभाग एक अंतर्गत जालना, बदनापूर, भोकरदन आणि जाफराबाद या तालुक्याचा समावेश आहे. या चारही तालुक्यात ६३ व १०० चे मिळून २५० पेक्षा जास्त रोहित्र केवळ आॅईल अभावी पडून आहेत. रोहित्रांमध्ये आॅईलचे काम महत्वाचे काम आहे. कुलंटचे काम केले जाते. (कॉईल थंड करण्यासाठी आॅईलचे कार्य महत्व पूर्ण असते) उच्च तपमानात रोहित्र सुरक्षित ठेवण्याचे तसेच इन्सुलेशन म्हणून आॅईल वापरतात. महिन्याकाठी शेकडो लिटर आॅईल रोहित्रांसाठी लागते. परंतु काही महिन्यांपासून येथील केंद्रात आॅईलचा ठणठणाट आहे. शुल्क भरुनही रोहित्र मिळेनाविभाग एक व दोन अंतर्गत २५० पेक्षा जास्त रोहित्रे केवळ आॅईलअभावी अनेक दिवसांपासून दुरुस्तीसाठी रखडली आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी महावितरणकडे दुरुस्ती शुल्क भरल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनीच सांगितले. १०० केव्हीच्या रोहित्राला ३० हजार तर ६३ केव्हीचे रोहित्रासाठी २० हजार रुपये आकारले जातात. एवढी रक्कम भरुनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे.जिल्ह्यातील जळालेल्या या अडीचशे रोहित्रावरील सुमारे सात हजार शेतकऱ्यांचे कृषीपंप विजे अभावी बंद आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे पिकांना पाणी देण्याचा मोठा प्रश्न आहे. त्यातच अनेक गावात योग्य दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने पंप सोबतच रोहित्रेही खाक होत आहेत. खरीप पिकांना पाणी न मिळाल्याने पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली. रबीचे पीक तरी हाती लागावे म्हणून शेतकरी वाटेल ते करीत आहेत. महावितरणच्या तारीख पे तारीखमुळे शेतकरी वैतागला आहेत. काही रोहित्रांची तांत्रिक पद्धतीने दुरुस्ती होत नसल्योन ते बसविताच काही तासात पुन्हा जळते. परत दुुरस्तीसाठी पाठविण्यासाठी मोठा वेळ खर्ची करावा लागतो.