शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

रविवार बाजारातील गर्दी ओसरली

By admin | Updated: October 6, 2014 00:41 IST

औरंगाबाद : गरिबांचा निराला बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आठवडी बाजारातील गर्दी रविवारी ओसरली होती.

औरंगाबाद : गरिबांचा निराला बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आठवडी बाजारातील गर्दी रविवारी ओसरली होती. सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरूअसल्याने ग्रामीण भागातील ग्राहक या बाजाराकडे फिरकलेच नाहीत. त्यात दुपारनंतर पावसाने हजेरी लावल्याने आलेले ग्राहकही पांगले. याचा आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम झाला. भाजीपाल्यापासून ते टीव्हीपर्यंत सबकुछ जिथे मिळते, त्या मोंढ्यातील जाफरगेट परिसरात भरणाऱ्या रविवारच्या बाजाराची ग्राहक आतुरतेने वाट पाहत असतात. दर रविवारी विक्रेते व ग्राहक यांची येथे एवढी गर्दी होते की, परिसरात पायी चालणेही कठीण होऊन जाते. लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या या आठवडी बाजारात आज मात्र वेगळेच चित्र पाहावयास मिळाले. सकाळपासूनच या परिसरात तुरळक ग्राहकी दिसून आली. दुपारनंतर गर्दी वाढत असते; पण तसे झाले नाही. रविवारी या बाजारातून पायी चालणे कठीण असते; पण आज अनेक जण वाहन घेऊन थेट येथे आले होते. वर्दळच नसल्याने वाहतूक जाम होण्याचा प्रश्नच नव्हता. त्यात दुपारी ४ वाजेनंतर पावसाने हजेरी लावली. परिणामी, बाजारात असलेली ग्राहकीही पांगली. यामुळे अनेकांनी सायंकाळ होण्याच्या आतच गाशा गुंडाळला. भाजी विक्रेते हरिभाऊ जोगदंड यांनी सांगितले की, आज ९०० रुपयांची भाजी विक्रीसाठी आणली होती. सायंकाळपर्यंत सर्व भाजी विक्री होत असते. मात्र, आज ३४० रुपयांचाच धंदा झाला. कटलरीचे साहित्य विकणारे शेख मोहंमद म्हणाले की, निवडणुकीचा परिणाम बाजारावर दिसून आला. विशेषत: ग्रामीण भागातील ग्राहकी हमाल, कष्टकरी नागरिक आज दिसलेच नाहीत. अनेक जण निवडणूक प्रचारात काम करीत असल्याचे कळाले. नईम पठाण या ग्राहकाने सांगितले की, दर आठवडी बाजारात भाजी व अन्य साहित्य खरेदीसाठी येथे येत असतो. मात्र, आज गर्दी कमी असल्याचे आढळून आले. एरव्ही धक्के खात येथून जावे लागत असे; परंतु आज मोकळे फिरून आम्ही भाज्या व अन्य साहित्य खरेदी केले.