शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

रविवार बाजारातील गर्दी ओसरली

By admin | Updated: October 6, 2014 00:41 IST

औरंगाबाद : गरिबांचा निराला बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आठवडी बाजारातील गर्दी रविवारी ओसरली होती.

औरंगाबाद : गरिबांचा निराला बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आठवडी बाजारातील गर्दी रविवारी ओसरली होती. सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरूअसल्याने ग्रामीण भागातील ग्राहक या बाजाराकडे फिरकलेच नाहीत. त्यात दुपारनंतर पावसाने हजेरी लावल्याने आलेले ग्राहकही पांगले. याचा आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम झाला. भाजीपाल्यापासून ते टीव्हीपर्यंत सबकुछ जिथे मिळते, त्या मोंढ्यातील जाफरगेट परिसरात भरणाऱ्या रविवारच्या बाजाराची ग्राहक आतुरतेने वाट पाहत असतात. दर रविवारी विक्रेते व ग्राहक यांची येथे एवढी गर्दी होते की, परिसरात पायी चालणेही कठीण होऊन जाते. लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या या आठवडी बाजारात आज मात्र वेगळेच चित्र पाहावयास मिळाले. सकाळपासूनच या परिसरात तुरळक ग्राहकी दिसून आली. दुपारनंतर गर्दी वाढत असते; पण तसे झाले नाही. रविवारी या बाजारातून पायी चालणे कठीण असते; पण आज अनेक जण वाहन घेऊन थेट येथे आले होते. वर्दळच नसल्याने वाहतूक जाम होण्याचा प्रश्नच नव्हता. त्यात दुपारी ४ वाजेनंतर पावसाने हजेरी लावली. परिणामी, बाजारात असलेली ग्राहकीही पांगली. यामुळे अनेकांनी सायंकाळ होण्याच्या आतच गाशा गुंडाळला. भाजी विक्रेते हरिभाऊ जोगदंड यांनी सांगितले की, आज ९०० रुपयांची भाजी विक्रीसाठी आणली होती. सायंकाळपर्यंत सर्व भाजी विक्री होत असते. मात्र, आज ३४० रुपयांचाच धंदा झाला. कटलरीचे साहित्य विकणारे शेख मोहंमद म्हणाले की, निवडणुकीचा परिणाम बाजारावर दिसून आला. विशेषत: ग्रामीण भागातील ग्राहकी हमाल, कष्टकरी नागरिक आज दिसलेच नाहीत. अनेक जण निवडणूक प्रचारात काम करीत असल्याचे कळाले. नईम पठाण या ग्राहकाने सांगितले की, दर आठवडी बाजारात भाजी व अन्य साहित्य खरेदीसाठी येथे येत असतो. मात्र, आज गर्दी कमी असल्याचे आढळून आले. एरव्ही धक्के खात येथून जावे लागत असे; परंतु आज मोकळे फिरून आम्ही भाज्या व अन्य साहित्य खरेदी केले.